Monday, December 29, 2014

Wear your best look

I was travelling in the local back home, at the end of the day, a very important day in my life. I had got my dream job that day, when I was least expecting it. A guy with average looks, but some above average intelligence, working in a good suburban hotel in Mumbai, made it to the international chain of hotels.

I got that job without approaching for it, without giving an interview, without any effort. Well, not actually without effort. Of course it was result of some efforts. Some small things you do every other day, but those which mattered.

I was thinking about a conversation I had with my Dad a couple of years ago. It was another important day in my life. It was my first day at job in the hotel I was working till today. I woke up with excitement, got ready quickly, and finished my breakfast with very big bites. My mother yelled at me to slow down. After breakfast I took her blessings, and went to my father. I touched his feet to take his blessings.

“Why aren’t you shaved? This is your first day at your job. Do you realize that?” asked my dad disapproving my rough look.

“It doesn’t matter dad. Nobody in my batch shaves every day. It is common now.” I answered.

“It matters. And you will shave before leaving for office.” He ordered.

“No dad, not today. I am getting late, one minute more and I will miss my local.” I resisted.

“I will drop you to office. But you have to shave.” He insisted.

And I complied, but showing every sign of frustration. He was noticing it. I got ready again. I was little angry with him for killing my excitement on my first working day. We got into the car, he started driving.

“I never told how I met your mother, did I?”

“No. But why do you have to tell me now?” I was curious about his story, but still not in mood to hear it.

“Because you need to understand something.” With that he took a long pause.

“Yours was an arranged marriage right?”

“Yes. We met through a family friend of ours, and relative of your mom.”

“Like most of the arranged marriages in India.” I thought.

Father’s Story

“Gokhle uncle was an old friend of your grandpa. He had come to Mumbai for some meeting. He was staying at your mom’s place. After his meeting he came to our place to meet papa.”

“I had just started working then. I came back home as usual, and saw him in our hall talking to papa. Papa introduced me to him. I touched his feet in respect, and went inside. Papa was proudly talking about my achievements in college and my first job in a reputed bank. He looked impressed.”

“I went to my room, changed my clothes, and wore casual ones. I came back to dining hall; they were ready and waiting for me. They were discussing something, but stopped at once when I entered the room, and were smiling at me.”

“We had dinner together. Papa asked me to drop Gokhle Uncle to where he was staying. When I took the car keys, papa asked me to change into something decent. I reluctantly did so and left with uncle.”

“When we reached there, uncle asked me to come inside. He wanted to introduce me to the family. I couldn’t think of any reason for that. But I didn’t want to disobey my papa’s old friend. I went inside. Few guests were already in the hall.”

“From what it seemed like, the guests had come to see Gokhle uncle’s niece, means your mom. I looked at the boy and the girl. The boy seemed to be rich, wearing a nice suit and gold chain. The girl was damn beautiful. I liked her. But I was standing there when she was seeing other boy, considering him for marriage.”

“I was feeling awkward there. Gokhle uncle took me to guest room for some time, till the other guests left. Then we came into the hall. Uncle introduced me to everyone, even to your mom. They asked me some general questions, I told them about myself, had some conversation and left.”

“Few days later, I was surprised to know that Uncle had taken me there with a purpose. He was impressed with me, and wished I married his niece. It further shocked me that the girl had also said yes to me. I had liked her no doubt, so I was bound to say yes. But I was wondering how she preferred me over that rich guy.”

“After our marriage, I asked your mom this question on our honeymoon.”

She said, “Yes, that guy was pretty rich. He came wearing that suit, and gold chain which was easily available for him. But he had not shaved. It seemed to me that he didn’t care much about the fact that he was going to see a girl. Whereas you clearly didn’t know that why you came to our place, but still you were clean shaven, properly dressed. I thought you were a disciplined guy. So I picked you. But why are you asking this?”

“I am not complaining, dear. I was just curious.” I answered and changed the topic. And so his story ended.

Back to present

“Are you trying to tell me she said yes, just because you were clean shaved and dressed?”

“Well in our time son, you had to judge with such small things only. We didn’t have the privilege of meeting a girl alone to talk, like you guys have these days.” Dad taunted.

“Not again with that generation gap thing dad.”

“No, that’s not point today. It’s just that you should be presentable always. You never know when a girl or an opportunity will enter your life. You should be prepared. We are not men with looks to die for. We are normal people. To be dressed properly, to shave regularly is our way to look our best. That’s my point. Wear your best look.”

“Ok. I get it dad.” I said though I didn’t get it that day.

I got it today. From that day onwards, though I didn’t like it, I started shaving regularly, and being well dressed. Eventually it became a habit. I worked hard, rose through the ranks in my hotel. I made good contacts with our suppliers, clients. I was good at talking. My boss relied on me to deal with them. I was thinking since past few days, that it’s time to move on if I want to grow further.

And then this day, the senior manager of GTC International came to meet me at my hotel. He said he wanted discuss some important matter and took me out for lunch. Throughout the main course, he discussed about many general things. I was waiting for him to come to the point. And then while having desserts he offered me my dream job. I was stunned.

“Don’t be so surprised.” He said, and continued. “You deserve it. You are good at dealing with people. I have been observing you and few other candidates since last few days. You are always presentable, you make a good impression. That’s what we want for our Vendor Relationship Manager. Not like boys of your generation who don’t care about how they look. I hope you accept our offer.”

“Of course I will. Thanks a lot for this offer.” Was all I could say!

The small thing dad taught me really paid off. I couldn’t thank him enough for this. Yes these things matter. Not all of us are model material, but we can groom ourselves. We can wear our best look. Will you? #WillYouShave?

This post is a part of #WillYouShave activity at BlogAdda in association with Gillette

Monday, November 10, 2014

स्वच्छ भारत अभियान : आमचा सहभाग

गेल्या रविवारी मी माझ्या मित्रांसोबत देशव्यापी स्वच्छ भारत अभियानात सहभागी झालो. (या अभियानाबद्दल वाचण्यासाठी इथे क्लिक करा.) हे अभियान सुरु झाल्यापासुन यात सहभागी होण्याचे माझ्या मनात होते.

माझा मित्र अक्षय देशपांडे आणि त्याच्या ऑफिसमधल्या मित्रांनी सामाजिक उपक्रम हाती घेण्याच्या उद्देशाने "उमंग" या नावाने एक ग्रुप बनवला आहे. आणि ते वेळोवेळी रक्तदान, अनाथालय, वृद्धाश्रम, मूक बधीरांची शाळा यांना भेट देऊन मदत करणे अशा प्रकारे कार्य करत राहतात. 

त्याला या अभियानात नक्की रस असणार अशी माझी खात्री होती. त्यामुळे मी सर्वप्रथम त्याच्याशीच याविषयी बोललो आणि माझ्या अपेक्षेप्रमाणे या "उमंग" ग्रुपचा स्वच्छ भारत अभियानाचा कार्यक्रम ठरलेला होता. 

त्यातल्या सर्वांनी आपल्या घराजवळ फिरून कचरा पडलेल्या जागा हेरून ठेवल्या. त्यातल्या काही आम्ही अभियान सुरु करेपर्यंत साफ झाल्या होत्या. :D हि म्हटली तर अडचण, पण नक्कीच सुखद होती. नगरपालिकेचे लोक आपले काम पार पाडत असल्याची खुण होती. 

रविवारी सकाळी आम्ही ठरवलेल्या जागांपैकी पहिल्या जागी पोचलो. उमंगच्या सदस्यांशी हि माझी पहिलीच भेट होती. पिंपळे सौदागर, रहाटणी भागातल्या रस्त्यावर एका कोपऱ्यावरची हि जागा होती. मोकळीच जागा असल्यामुळे ती कचरा टाकण्याची अनधिकृत जागा बनलेली होती. आम्ही आमचे झाडू, कचऱ्याच्या पिशव्या, हातमोजे बाहेर काढले आणि काम सुरु केले. 

हळूहळू लोकांचे लक्ष आमच्याकडे जायला लागले. काही आपल्या जागेवरून, काही जवळ येउन आम्हाला पाहत होते. काही आमच्याशी येउन बोललेसुद्धा. समोरच्या घरातल्या लोकांकडून आमच्याकडे नसलेली सुपली मिळाली. आमचे काम चालू होते. 

तिथे नगरपालिकेचा एक सफाई कर्मचारी जवळ आला. लोकांनी त्याला हे तुम्हाला सहकार्य करतायत, त्यांची मदत करा म्हणून त्याला दटावून आमच्याकडे पाठवले. त्याने ४ वर्षापासून मला कपडे दिले नाहीत, पगारवाढ दिली नाही म्हणून कुरबुर केली, पण थोडी मदतसुद्धा केली. 

आम्ही साफ करत असल्याचे पाहूनसुद्धा एक माणूस आमच्यासमोर येउन कचरा टाकून गेला. आम्ही त्याला बोलायला लागताच निर्लज्जपणे काहीतरी उत्तरे देत कचरा तसाच सोडून निघून गेला. 

तिथे केसांचे किती तरी झुपके पडलेले होते. ते पाहून आम्ही जवळच्या कटिंग सलूनमध्ये समजवण्यासाठी गेलो. त्यांनी काही कबुल तर केले नाही, आम्ही गाडीतच कचरा टाकतो. त्या समोरच्या सलूनमध्ये जाऊन बघा म्हणून कटवले. दुसऱ्या कटिंग सलूनमध्ये पण तीच गत. 

कबुली तर नाही, पण लोक येउन आपल्याला बोलतायत हि जाणीव तरी त्यांना होईल अशा आशेने आम्ही निघालो. 

एवढा कचरा मोकळा पडलेला पाहून आम्ही नगरसेवकाला भेटून तिथे कचराकुंडीची व्यवस्था करण्याची विनंती करावी असा विचार केला. पण तिथे फिरतीवर असलेल्या नगरपालिकेच्या सुपरवायझरकडून समजले कि तिथे आधी कचरा कुंडी होती, पण ती जागा ज्यांची आहे त्या लोकांनी विरोध करून ती हटवली. अधिकृत कचराकुंडी असताना ती त्या मालकाला चालली नाही. पण आता ती नसतानासुद्धा लोक केवढा कचरा टाकून ती जागा घाण करत होते, हे त्या मालकाला कसे चालते असा प्रश्न आम्हाला पडला. 

आम्ही आजूबाजूच्या घरात तिथे कचरा टाकू नका अशी विनंती करून आलो. त्यांनी आमचे ऐकून घेतले. पण त्यांनी इथे राहणाऱ्या लोकांपेक्षा येणारे जाणारे, गाडीवरून जाणारे लोक जास्त कचरा फेकून जातात अशी तक्रार केली. 

तिथली सफाई करून आम्ही पुढे निघालो. त्याच रस्त्यावर अजून एका ठिकाणी अशीच कचरा टाकण्याची अनधिकृत जागा बनली होती. ती आम्ही साफ केली. त्या कचऱ्यात चहाचे कप खूप असल्यामुळे आम्ही बाजूच्या चहावाल्याला तिथे कचरा टाकू नका म्हणून विनवले. इथेही तोच अनुभव आला. कोडगेपणे त्याने नुसते ऐकून घेत फक्त हो ला हो केले. 

आम्ही आधीच्या जागेवर पुन्हा चक्कर मारून आलो. लोकांच्या सांगण्याप्रमाणे रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या लोकांनी थोडा कचरा तिथे फेकलेला होता. आम्ही तो पुन्हा उचलून साफ केला. 





मग आम्ही औंधला गेलो. तिथेच सर्वात जास्त वेळ लागला. तिथे एक मोठी कचराकुंडी होती. ती गच्च भरलेली होती, आणि त्यामुळे लोकांनी तिच्या आजूबाजूला भरपूर कचरा टाकला होता. त्या कुंडीच्या अवतीभवती बऱ्याच दूरपर्यंत कचरा पसरला होता. इथे पोहचेपर्यंत आमची संख्यासुद्धा वाढली होती. 

आम्ही काम सुरु केलं. सगळ्यांनी मिळून कचरा मोठ्या पिशव्यांमध्ये गोळा केला. कचऱ्याला कोणी तरी आग लावलेली होती. ती मधून मधून भडकत होती. बराच वारा सुटला होता. धूर पसरत होता. आम्हाला झाडायचं होतं त्याच्या विरुद्ध दिशेने वाहून वारा सगळी धूळ परतवत होता. आम्ही बराच वेळ काम सुरु ठेवलं. 

तिथे पसरलेला जवळपास सगळा कचरा साफ करून भरून ठेवला. आमची सफाई चालू असताना जवळच्या दोन मॉलमधले कर्मचारी कचरा घेऊन आले. रोजप्रमाणे आपली पोती उलटी करून निघण्याचा त्यांचा विचार दिसत होता. पण आम्ही त्यांना रोखले. आणि त्यांनी पण मग जेव्हा गाडी येईल तेव्हा त्यातच कचरा टाकण्याचा निर्णय घेतला. 

तिसरी जागा साफ केल्यानंतर आम्ही हिप हिप हुर्रे करून एकमेकांचे अभिनंदन केले. घरी परत येताना आज काही तरी चांगलं काम केल्याचं समाधान होतं आणि पुन्हा करण्याची ईच्छा होती.



स्वच्छ भारत अभियान : गरज

पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेवर आल्यापासुन त्यांनी कैक चांगल्या गोष्टी सुरु केल्या. विदेश दौऱ्यावरचा खर्च कमी करण्यासाठी लवाजमा कमी करणे. सरकारी बाबूंना वेळेवर येण्यास भाग पडणे. उच्च अधिकाऱ्यांसोबत जातीने बैठकी घेऊन त्यांना त्यांची कल्पनाशक्ती वापरून सरकारी कामकाज सुलभ सुकर करण्यास प्रोत्साहन देणे. पंतप्रधान जन धन योजना. सांसद ग्राम विकास योजना. आणि एक देशातल्या प्रत्येक नागरिकाने हातात घेण्याजोगे आणि घ्यावेच असे स्वच्छ भारत अभियान.

मोदी सरकारने एक चैतन्याची लहर या देशात आणल्याचे त्यांचे विरोधक असलेले केजरीवाल सुद्धा मान्य करतात.

स्वातंत्र्य दिनी याची घोषणा मोदींनी केली, आणि २ ऑक्टोबर २०१४ रोजी गांधी जयंतीच्या निमित्ताने हे अभियान स्वतः दिल्लीत झाडू हाती घेऊन सुरु केले. आपल्या सहकाऱ्यांना, देशातल्या नागरिकांना आणि त्यांनी ९ इतर सेलिब्रिटीजना यात सहभागी होण्याचे आवाहन केले. प्रत्येकाला स्वतः सहभागी होत आणखी ९ जणांना आवाहन करण्याची विनंती करून साखळी पद्धतीने याचा प्रसार करण्याचा प्रयत्न केला.

याला त्या सर्व सेलिब्रिटीजकडून चांगला प्रतिसाद मिळाला. त्यांनी आणखी लोकांना आमंत्रित केले. अनिल अंबानी, अमिताभ बच्चन, शशी थरूर, सचिन तेंडूलकर, सलमान खान अशा अनेक प्रथितयश मोठ्या लोकांनी यात उत्साहाने सहभाग नोंदवला.

मोदींचे विरोधक याला देखावा म्हणून टीका करतात. काँग्रेसवाले मोदी सरकारने बाकी सर्व गोष्टीप्रमाणेच हि गोष्ट आमच्याकडूनच उचलली आणि श्रेय लाटण्याचा प्रयत्न केला असा आरोप करतात. त्यांनी यात सक्रिय सहभाग तर नोंदवला नाहीच. पण मोदींनी नामांकित केलेले शशी थरूर यांनी या अभियानात सहभागी झाले म्हणून आणि मोदींचे कौतुक केले म्हणून त्यांना पक्ष प्रवक्ते या पदावरून बडतर्फ केले.

आणखी काही लोक मोदी सांगताहेत त्यात नवे काय? गाडगे बाबा, गांधीजी यांनी हा संदेश आधीच देऊन ठेवला आहे. मग मोदींनी सांगण्या आधी का केली नाही स्वच्छता? असा सवाल करत आहेत.

हि सगळी निष्क्रिय बडबड आहे. संदेश कोणी आधी दिला, कोणी नंतर दिला, कोणाच्या सांगण्यावरून कोणी स्वच्छता केली या सगळ्यापेक्षा स्वच्छतेबद्दल वाढणारी जागरूकता महत्वाची आहे. होणारी स्वच्छता महत्वाची आहे.

भारतात अनेक आरोग्याचे प्रश्न हे स्वच्छतेशी निगडीत आहेत. मग ती घरातली स्वच्छता असो वा रस्त्यावरची. स्वच्छता राखल्याने मलेरिया, डेंग्यू, चिकन गुनिया असे अनेक साथीचे रोग आपोआप नियंत्रणात येतील.

भारतीयांची नागरी मानसिकता खूप अविकसित आहे. आपण आपल्या घरात जशी स्वच्छतेशी काळजी घेऊ तशी बाहेर घेत नाही. घराबाहेर आपण कुठलीच जबाबदारी घेत नाही. आपल्या घरून कचरा बाहेर गेला कि प्रश्न संपला.

ह्या उदासीनतेमुळेच, आपण ज्या प्रशासकीय यंत्रणेकडे हि जबाबदारी सोपवली आहे, ते लोक फायदा उठवतात. प्रश्न विचारणारे लोक नसल्यामुळे कचरा तसाच पडून राहतो. वेळोवेळी स्वच्छता होत नाही. राजकारणी मंत्री जिथून जातील तिथेच या यंत्रणा जाग्या होताना दिसतात.

जास्तीत जास्त नागरिक स्वच्छतेबद्दल सजग होताना दिसले, त्यासाठी रस्त्यावर येताना दिसले तर आपोपाप या यंत्रणांवरचा दबाव आणि वचक वाढेल. त्यांना आपले काम चांगले करण्यास सहकार्यसुद्धा मिळेल आणि प्रेरणासुद्धा.

स्वच्छता हि कोणी सांगण्याची गरज नसलेली प्राथमिक गोष्ट आहे. आपणास जो नेता/संत आवडतो त्याच्या नावाने आपण स्वच्छता करावी. मोदी फक्त निमित्त आहेत, सुरुवात आहेत. उद्या मोदी सरकार गेले तरी हे अभियान सुरु राहावे.

या अभियानातल्या आमच्या सहभागाबद्दल वाचण्यासाठी इथे क्लिक करा. 

Saturday, November 8, 2014

An Opportunity Lost

Last week I had an opportunity to do shopping worth 5000 bucks for free. How? But I lost it. How? Well this is the story about that opportunity lost.

I keep participating in blogging contests organized by blogadda. They have many interesting contests organized with many partnering brands. There are some opportunities where you can get a copy of a book to review. I love to participate in these activities, and I have received lovely gifts and goodies from blogadda for that.

This time blogadda arranged one activity with quikr.com. We all know about quikr.com a mega buy and sell portal, which acts as matchmaker of buyers and sellers.

The activity was like this. A shortlisted blogger will shop a few items worth 5000 from quikr. He would write a blog about his experience about the site, and the items he purchased. Once the entry is validated against all the rules, he will get his 5000 back.

I was shortlisted for this activity, and I confirmed my participation. I was excited. I immediately called my wife and told her the news. I started looking for all the items on quikr. I asked my wife to do the same. The site first asks you for your location and then shows you the items for sale in your area.

There are many categories and subcategories like electronics, furniture, books, vehicles, and you have many options to shortlist your items using many filters. It is good practice to upload pictures of items you want to sell.

What could you possibly buy in 5000? There are a lot of things. But I didn’t want any random thing just because I was going to get it for free? Someone told me a cleaning funda. Our home should be occupied with only those things which are actually useful, which satisfy some need. Any other thing that is there for no reason, and unused, you should get rid of it.

The portal like quikr is started for this very purpose. To get rid of something that is better sold than used at your place.

So when I started actually looking for stuff to buy, I started realizing lot of constraints. The first thing I could think of is some furniture items and books.
I recently did small makeover of my house with some new furniture items. So there were only 2-3 kinds of small furniture items like a corner stand, centre table on our wish list. I surfed a lot for this. The thing with the furniture is, suitability. There are two ways to decorate your house.

Either you do it once and for all, with help of interior designer, or your own creativity and a big hole in your pocket. Or you keep purchasing the stuff according to priority as you go on over time. I am following the second route.

This way even though you don’t have the option to select a theme and follow uniformity in designs of different items, but the theme automatically shapes up with the items you already have. You have to keep this theme in mind when you purchase next, so that it suits well in your current home interior.

I came across many likeable items I was looking for, but they weren’t suitable to the theme our house needed. Some were in far off areas of Pune.

Then I realized the second constraint, i.e. locations. I stay in one corner of Pune, and work in another. The items were located in third, fourth, corner of Pune and so on. On a weekday, there was no way I could go and collect these items.

I found out another feature of quikr, to filter by locations. I entered the areas nearby my residence, and narrowed down the list. Although this eased the item hunt, it reduced the choice I had.
Simultaneously I was looking for books also. I love reading, and was excited with the number of books I could purchase with this amount. But the books available were mostly English books by Indian authors like Chetan Bhagat, Shiva Trilogy, which I have read and have already in my collection. Some of them actually seemed to be pirated copies.

The previous problems prevailed here. I couldn’t have picked up the items on weekday, on weekend I had some plans with guests coming over. This activity got side lined in my work and weekend plans, and I missed my deadline.

I regret the lost opportunity. More than that, I regret that I failed to inform blogadda about me being unable to finish the activity, or else it could have benefited someone else willing to participate. Sorry blogadda and quikr for the blunder. L

I thank blogadda to give me this opportunity to write this post of redemption. This is just to feel better about it. As they say, opportunity never knock your door twice.

Tuesday, October 21, 2014

मन आकाशाचे व्हावे

डॉ. प्रकाश बाबा आमटे या चित्रपटाची सध्या सगळीकडे चर्चा चालू आहे. आमटे कुटुंबियांचे महान कार्य या निमित्ताने पुन्हा एकदा जगासमोर आले आहे. अनेक लोक या चित्रपटामुळे प्रेरित झाले असतील.

अशावेळी मी एका तुलनेने छोट्या चित्रपटाकडे तुमचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न करतोय. हा चित्रपट काही वर्षांपूर्वी येउन गेला. नाव "बोक्या सातबंडे". 

हा दिलीप प्रभावळकरांच्या "बोक्या सातबंडे" या पुस्तकांवर आधारित होता. आपल्याकडे बालसाहित्य हा तसा दुर्लक्षित प्रकार आहे. किंवा फारसा गांभीर्याने न घेतला जाणारा प्रकार आहे. जे साहित्य मराठीत उपलब्ध आहे, त्यात "बोक्या सातबंडे"  हि मालिका खूप चांगल्या साहित्यापैकी एक आहे. 

चिन्मयानंद उर्फ "बोक्या सातबंडे" हे दिलीप प्रभावळकर यांनी निर्माण केलेले काल्पनिक पात्र. मुंबईमधला एक खोडकर, प्रेमळ आणि संवेदनशील असा मुलगा. तो आणि त्याची मित्रांची टोळी, त्यांचे प्रताप… त्याचे खोड्यांना काहीसे वैतागलेले पण चांगल्या कामात पाठीशी उभे राहणारे आई बाबा, आजी, दादा. या सगळ्यांच्या गोष्टी या मालिकेत त्यांनी लिहिल्या होत्या. 

जितकी हि पुस्तकांची मालिका गाजली, तशीच बऱ्याच वर्षापूर्वी यावर एक टीव्ही मालिकासुद्धा बनली होती.

यातला बहुतेक कथाभाग हा मुळ पुस्तकातलाच आहे. लहान मुलांसाठी आणि मोठ्यांसाठीसुद्धा हा एक सुंदर चित्रपट आहे. 

आपल्याकडे लहान मुलांना अतिशय आचरट किंवा अतिगोड अशा भूमिका देण्याचा प्रघात आहे. त्याविरुद्ध इथे बहुतेक मुलं वास्तविक, आणि निरागस दाखवली आहेत. बाल्य कसं असावं याचं उत्तम उदाहरण आहे. 

क्रिकेट खेळताना बोक्या आणि त्याच्या मित्रांचा बॉल एका आजीआजोबांच्या घरी जाऊन पडतो. ते आजोबा अतिशय खडूस म्हणून प्रसिद्ध असतात. सगळ्याच मुलांनी त्यांच्याकडून बोलणी खाल्लेली असतात. त्यांच्याकडून बॉल परत आणण्याची जबाबदारी बोक्यावर येउन पडते. बोक्या त्यांच्याकडे जातो आणि त्यांच्याबद्दल त्याचं कुतूहल जागृत होतं. आणि बोक्याचा प्रामाणिकपणा त्या आजी आजोबांना भावतो. 

त्यांचा मुलगा कित्येक वर्षांपासुन अमेरिकेत जाऊन राहतोय. इथे हे दोघेच त्याची वाट बघत बसलेत असं त्याला समजतं आणि त्याला त्यांच्याबद्दल ममत्व वाटायला लागतं. तो त्यांना आनंद मिळावा म्हणून त्यांना जाऊन भेटायला लागतो. घरी काही खास केलं कि त्यांना नेउन देतो. बोक्यामुळे त्यांना खुप समाधान मिळतं. 

असंच एकदा त्याला आपल्या घरातली कामवाली बाई, तिच्या घरची परिस्थिती त्याला समजते. तिच्या मुलांना वाढदिवस साजरा करणे, बाहेर फिरायला जाणे, या गोष्टी आपल्याला जितक्या सहज मिळतात तितक्या त्यांना मिळत नाहीत ह्याची त्याला जाणीव होते. आणि मग त्याच्या सुट्ट्यात तो त्याच्या मित्रांना घेऊन अशा मुलांसाठी काहीतरी करण्याचा प्रयत्न करतो. 

त्यांना समजावून सांगताना  "मोठ्यांना स्वतःहून काही सुचत नाही. आणि आपल्याला सुचलेलं काही आवडत नाही" हे बोक्याचं वाक्य पुरेसं बोलकं आहे. 

यात काही खूप महान असं दाखवलेलं नाही. अगदी छोट्याछोट्याच पण आपल्याला सहज जमतील अशा गोष्टी आहेत. आपण संवेदनशील बनून राहिलो तर आपल्याला आणि लोकांना आनंद मिळेल अशा गोष्टी आपण किती सहजपणे करू शकतो हे यात छान दाखवलेलं आहे.

या चित्रपटात वापरलेलं पार्श्वसंगीत खूप सुंदर आणि मनाचा ठाव घेणारं आहे. सुरेश वाडकर यांनी गायलेलं "मन आकाशाचे व्हावे" हे गीत अगदी सहजरित्या या चित्रपटाचा संदेश देतं.

हल्ली बरीचशी मुलं कम्प्युटर, स्मार्टफोन यामध्येच गुंग असतात. घरातल्या लोकांशी संवाद, आपल्याकडे येणाऱ्या जाणाऱ्या लोकांशी चांगल्या गप्पा, त्यांच्यामध्ये रस घेणे या गोष्टी अभावानेच दिसतात. मुलांमध्ये संवेदनशीलता, आणि अशा जाणीवा निर्माण व्हाव्यात म्हणून थोडे प्रयत्न सुद्धा करायला हवेत. 

हा चित्रपट आपल्या कुटुंबातल्या मुलांना नक्की दाखवा. आणि तुम्ही सुद्धा पहा.

Monday, October 20, 2014

आमटेमय

काल रात्री "डॉ. प्रकाश बाबा आमटे" पाहिला. तुमच्यापैकी अनेकांनी हा चित्रपट नक्कीच पाहिला असणार, किंवा पाहण्याचा बेत तरी असेल. नसेल पाहिला तर जरूर पहा.

हा चित्रपट पाहुन आलेल्यांपैकी अनेक लोकांसारखाच माझाही अनुभव होता. मनस्थितीसुद्धा तशीच. स्तिमित. निशब्द. अंतर्मुख.

बाबा आमटे या महापुरुषाच्या या सुपुत्राने त्यांच्या लौकिकाला शोभेल अशी कामगिरी केली, आणि अवघ्या जगाला काहीतरी शिकवून जाइल असे आयुष्य जगले.

आपल्या हुशारीच्या बळावर, डॉक्टरकिची पदवी हातात असताना, शहरात, उच्चभ्रु दवाखान्यात काम करत आरामात आयुष्य काढण्याची संधी असताना, प्रकाश नावाचा तरुण आपल्या वडिलांचा आदर्श घेऊन हेमलकसासारख्या दुर्गम भागात आदिवासींची सेवा करण्याचा निर्णय घेतो. किती विलक्षण आहे हे.

असे निर्णय सहज घेत येत नाहीत. किती मोह असतात माणसाला, आपल्याला… त्या सर्वावर पाणी सोडुन अशा ठिकाणी आयुष्य काढणे सोपी गोष्ट नाही.

आणि त्यांना तितकीच मोलाची साथ दिली त्यांच्या पत्नी मंदा आमटे यांनी. प्रकाश आमटे कोण आहेत, त्यांची पार्श्वभूमी, आणि पुढचं आयुष्य कसं असणार याची पर्वा न करता त्याही या सर्वात सहभागी झाल्या आणि उत्तम कार्य केलं.


हे निर्णय घ्यायला एकवेळ सोपे म्हणता येतील इतके ते निभवायला अवघड असतात. प्रकाश आमटेंना कदाचित आई बाबांच्या संस्कारांमुळे मोह माहित नसतील. आणि बाबांसारखी मोठी समाजसेवा करण्याचं आकर्षण असेल. मंदा आमटे यांनी कदाचित प्रकाशवरच्या प्रेमामुळे, स्वतःच्या तत्वांमुळे, इच्छेमुळे हा निर्णय घेतला असेल. निर्णयापर्यंत आपण कसेही पोचलो तरी, निर्णयानंतरच प्रवास सुरु होतो.

आणि त्यांच्या इतक्या खडतर प्रवासात कधी तरी कंटाळा येणं, उबग येणं, भ्रमनिरास होणं, आणि यातून परत फिरणं शक्य होतं. ते त्या दोघांनीही केलं नाही.

हेमलकसात गेल्यावरसुद्धा आदिवासींनी त्यांना उपचार करू देण्यात २-३ वर्ष गेली. ते तितके दिवस थांबले. स्वतःला कशात तरी गुंतवून घेऊन तिथेच तळ ठोकून राहिले.

आणि एकदा कामाला सुरुवात झाली कि, त्याला फक्त वैद्यकीय सेवेच्या मर्यादा राहिल्या नाहीत. आधी आदिवासी लोकांवर उपचार. मग त्याचं अंधश्रद्धा निर्मुलन. त्यांच्यासाठी स्वच्छता, आरोग्य इत्यादींचं प्रशिक्षण. त्यांच्या मुलांसाठी प्राथमिक शिक्षण.

आणि हे सर्व करताना संस्कृती, भाषा यामुळे आदिवासींशी संवाद साधण्यात, त्यांचा विश्वास संपादन करण्यात ज्या अडचणी आल्या त्या सर्वांचा यशस्वी सामना केला.

आदिवासी लोकांचं सरकारी अधिकारी, तस्कर, ठेकेदार अशा अनेक लोकांकडून विविध पातळीवर आणि विविध प्रकारे शोषण होतं. ह्यातूनच त्यांच्यातले अनेक लोक नक्षलवादी गटात ओढले जातात. आमटेंनी त्यांच्यासाठीसुद्धा भेदभाव न करता काम केले. प्रयत्न केले.

संधी दिली तर माणूस किती बदलू शकतो, याचं उदाहरण म्हणून डॉ. पुरू पुंगाटी यांची कथा चित्रपटात दाखवली आहे. पोलिसांच्या छळामुळे नक्षलवादी गटात जाउन पोचलेला एक अल्पवयीन मुलगा आमटेंना भेटतो. आमटे त्याला मार्ग दाखवतात आणि तो पुढे एक डॉक्टर बनतो. हा कथाभाग सर्वांनाच थक्क करून सोडतो.

अशा मदती खेरीज आदिवासींना त्याचं शोषण होऊ नये म्हणून, सरकारकडून लुटले जाऊ नये म्हणूनसुद्धा त्यांचे प्रयत्न दिसतात. आणि हे सर्व अगदी त्यांच्या स्वभावानुसार शांतपणे, हसत हसत. कुठेही लढ्याची भाषा नाही , आणि क्रांतीचा आव नाही.

त्यांची सेवा माणसांपुरती सुद्धा राहिली नाही. प्राण्यांचेसुद्धा उपचार केले. स्वतः माणसांचे डॉक्टर असून, प्राण्यांचे उपचार शिकून घेतले. या प्रयत्नातुन प्राण्यांचे अनाथालय उभे राहिले. एरवी हे प्राणी स्वतः मेले, शिकाऱ्याने मारले तरी दखल न घेणाऱ्या सरकारला ह्या प्राण्यांच्या अनाथालायाचा मात्र जाच होतो.

इतक्या दुर्गम ठिकाणी, जिथे इतर डॉक्टर जायला तयारच होत नाहीत, तिथे हे डॉक्टर दाम्पत्य सर्व प्रकारचे उपचार करण्याचा प्रयत्न करत असताना, गरज पडल्यास आहे त्या साधन आणि औषधांचा वापर करून शस्त्रक्रिया करत असताना सरकारला त्यांच्या परवान्यांची आठवण होते.

परवाने आहेत ते डॉक्टर जाण्यास तयार नाहीत. आपल्याकडे सर्व प्रकारचे अधिकार असतानासुद्धा आपण प्राण्यांचे अनाथालय, उपचार केंद्र अशी कुठलीही सुविधा उपलब्ध केलेली नाही. हे लक्षात न घेता केवळ स्वतःच्या अहंकारापायी सरकारी अधिकारी आमटेंना परेशान करतात तेव्हा खरंच संताप येतो.

अशा कृतघ्नपणाचा सामना करूनसुद्धा आपलं कार्य करण्याचं बळ आमटे कुटुंबिय कसे गोळा करत असतील याचं खुपच आश्चर्य आणि कौतुक वाटतं.

आपल्याला अनेक गोष्टीचं आकर्षण असतं. सुंदर घर. घरातल्या सुबक वस्तु. शानदार गाडी. पैसा. गुंतवणूक. या सगळ्याच्या पाठीमागे आपण आयुष्यभर धावतो. आणि आयुष्य सुंदर बनवायचा प्रयत्न करतो.

पण या सगळ्याकडे पाठ फिरवुन सुद्धा हे लोक इतकं सुंदर आयुष्य जगताना दिसतात, ते पाहून जाणीव होते कि आयुष्याला सुंदर बनवण्याची ताकद कुठल्या वस्तुत नाही तर आपल्या माणसांत आहे. आपल्या कामात आहे. आपण निवडलेल्या मार्गात आहे.

चित्रपट संपतो तेव्हा सर्व जण शांत असतात. काही लोक टाळ्या वाजवुन दाद देण्याचा प्रयत्न करतात. पण हा शांतपणा, हे भारावलेपण आपण इथेच थांबवायला नको. घरी येउन आपण पुन्हा नेहमी सारखंच जगायला लागलो तर काय फायदा?

प्रकाश आमटे एकटे नाहीत, त्यांचे आई बाबा, भाऊ सर्व कुटुंबीय आणि साथीदार ग्रेट आहेत. असे अनेक लोक आहेत. अशा अनेक संस्था आहेत. आपण सर्वच त्यांच्याइतका त्याग करून सेवा करू शकत नाही. पण आपण अशा लोकांच्या कामात हातभार लावू शकतो. आपला वेळ देऊ शकतो. पैशाच्या स्वरुपात योगदान देऊ शकतो. अशा कुठल्या तरी चांगल्या कामात सहभागी होऊ शकतो.

हा चित्रपट कसा आहे, अभिनय कसा आहे, दिग्दर्शन कसं आहे… याचा वस्तुनिष्ठ विचार मला करता येत नाही. एवढंच सांगतो, या सर्व लोकांचा हि कथा सर्वांसमोर मांडण्याचा प्रयत्न अतिशय प्रामाणिक आहे. आमटे कुटुंबियांच्या विशाल कार्याला हि एक सलामी आहे. त्यांनी खूप मोठा विचार यातून मांडलेला आहे. आणि तुम्हाला विचार करण्यास भाग पडतो. आमटेमय करून सोडतो.

Tuesday, October 7, 2014

अजि म्या पंतप्रधानास पाहिले

दसऱ्याच्या निमित्ताने चार दिवसाच्या सुटीवर आम्ही औरंगाबादला गेलो होतो. औरंगाबादला पोचल्यावर पहिल्याच सकाळी पेपरमधून कळलं कि देशाचे नवनिर्वाचित पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी शहरात सभा घेत आहेत. हि बातमी वाचताच मला आनंद झाला. 

लोकसभा निवडणुकीच्यावेळी मोदींची अनेक भाषणे आणि मुलाखती टीव्हीवर तुकड्यातुकड्यात पाहिली होती. त्यांच्या उत्कृष्ट वक्तृत्व आणि हजरजवाबीपणाची प्रचितीसुद्धा आली होती. आता त्यांना प्रत्यक्ष बघण्याची आणि ऐकण्याची संधी चालून आली होती. मी ताबडतोब माझ्या मित्रांना हे कळवलं आणि जायचा बेत ठरवला. 

दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी हि सभा होती. आणि त्याच दिवशी मोदी बीड, औरंगाबाद, मुंबई अशा तीन सभा घेणार होते. औरंगाबादची सभा नेमकी कधी होणार याबद्दल मात्र संभ्रम होता. पेपर मधली बातमी, त्याच पेपरमध्ये भाजपाची जाहिरात, आणि त्या सभेच्या प्रचारार्थ आलेले एस.एम.एस या सगळ्यामध्ये वेगवेगळी वेळ दिली होती. लोकांना जमा होण्यास पुरेसा वेळ मिळावा म्हणून लवकरची वेळ दिली असावी असा आम्ही अंदाज बांधला. पण या प्रकारामुळे आपण घरून कधी निघावे ते कळत नव्हते. 

योगायोगाने त्याच दिवशी दुपारी आमच्या मतदारसंघातल्या भाजपाच्या उमेदवाराची बायको काही महिला कार्यकर्त्यांसोबत आमच्या घरी प्रचारासाठी येउन गेली. त्यांच्याकडून कळले कि मोदींच्या भाषणाची वेळ ४ वाजताची असली तरी सभा दुपारपासूनच सुरु होणार आहे, आणि जागा मिळण्यासाठी त्यांनी लवकरच जा म्हणून सांगितले. 

त्या दिवशी मला बरे वाटत नव्हते. म्हणून जावे कि नाही असेही वाटत होते. पण पंतप्रधान आपल्या घरापासून इतक्या जवळच्या ठिकाणी येउन भाषण करणार आहेत,  आपल्याला सुद्धा सुटीच आहे. असा योग पुन्हा सहज कधी यावा असा विचार करून शेवटी जायचाच निश्चय केला. 

माझे मित्र अक्षय, जयदीप, गिरीश यांच्यासोबत मी निघालो. सभेच्या ठिकाणी, गरवारे मैदानाकडे जाणाऱ्या सर्व रस्त्यांवर भरपूर गर्दी, आणि कडक बंदोबस्त होता. तिकडे सामान्य नागरिकांच्या गाड्या नेण्यालासुद्धा बंदी होती. आम्ही दूर रस्त्यावरच गाडी लावली आणि चालत मैदानाकडे निघालो. हजारो लोक त्याच दिशेने चालले होते. मला अगदी वारीची आठवण आली. 

काही कार्यकर्ते प्रचाराची पत्रके वाटत होते. लोक ती घेऊन रस्त्यावरच टाकत होते. मला भारतीय लोकांच्या वागण्यातला विरोधाभास पुन्हा जाणवला. ज्या नेत्याच्या सभेसाठी हे लोक इतक्या दुरून उत्साहाने चालले होते, त्याच नेत्याने आदल्याच दिवशी दिलेला स्वच्छ भारताचा संदेश त्यांनी पायदळी तुडवला होता. 

सभा आधीच सुरु झाली होती. मैदान बरचसं भरलं होतं. औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यातले उमेदवार मंचावर होते. एक एक करून त्यांचा परिचय दिला जात होता. त्यांना बोलण्यासाठी दोन मिनिटे वेळ दिला जात होता. झाडून सगळे उमेदवार आज मोदीसाहेबांसोबत मंचावर उभे राहण्याची संधी मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त करीत होते. 

सर्व उपस्थित जनता तेथे फक्त मोदींसाठीच जमली होती हे स्पष्ट होते. उमेदवारांच्या बोलण्याकडे कोणाचे हि लक्ष  नव्हते. लोक आतापेक्षा चांगली जागा मिळतेय का याच प्रयत्नात होते (आम्ही सुद्धा :D) आणि मोदींच्या नावाचा घोष करत होते. कॅमेरा आपल्या दिशेने फिरला कि नाचून किंवा हात हलवून प्रतिसाद देत होते. मधून मधून निवेदक मोदी साहेबांचे हेलिकॉप्टर बीडहून निघाले, औरंगाबादला पोचले, अशी माहिती देत होते. 

अखेर मोदी सभास्थळी पोचले आणि पूर्ण वातावरण बदलले. गोंधळ घालणारे प्रेक्षक थोडे शांत झाले. सत्कार वगैरे पार पडल्यावर मोदींनी मराठीतून भाषण सुरु केले, आणि दोन तीन वाक्ये मराठीत बोलून सगळ्यांना जिंकून घेतले. आणि मग त्यांच्या शैलीत हिंदीत भाषा केले. भाषण बरेचसे त्यांच्या अमेरिकेतल्या भाषणासारखेच होते. पण तरी त्यात जिवंतपणा होता. 



आतापर्यंत झालेल्या सगळ्या बाकी लोकांच्या भाषणात आणि त्यांच्या भाषणातला दर्जात्मक फरक लगेच दिसून येत होता. लोकांना काही प्रश्न विचारून त्यांना सभेत गुंतवून ठेवण्याची, आपल्या बाजूने वळवण्याची, आपले मुद्दे लोकांकडूनच वदवून घेण्याची त्यांची हातोटी जबरदस्त आहे. बाळासाहेब ठाकरे यांची अशी सभा अनुभवता येणार नाही याचं मला थोडंसं वाईट वाटलं. 


भाषणाच्या शेवटी मोदींनी स्वच्छ भारत अभियानाचा पुन्हा एकदा संदेश दिला. उपस्थित सर्वांना त्या ठिकाणी कचरा न करण्याची, आणि असलेला कचरा उचलून नेण्याची विनंती केली. तरी बहुतांश लोक खुर्च्या अस्ताव्यस्त करून, कचरा तसाच टाकून निघाले. काही भाजपचे कार्यकर्ते येऊन लोकांना प्रोत्साहन द्यायला कचरा गोळा करू लागले. मग काही लोकांनी स्वयंस्फूर्तीने कचरा उचलण्यास आणि खुर्च्या नीट लावण्यास सुरुवात केली. मी आणि माझ्या मित्रांनी भरपूर वाकड्यातिकड्या पडलेल्या खुर्च्या उचलून नीट लावून ठेवल्या. गिरीश म्हणाला, कि सगळ्यांनाच लगेच समज येणं अवघडच आहे, पण इथल्या दोन टक्के लोकांना जरी समज आली तरी बस. पडेल हळू हळू फरक. 

महाराष्ट्रात कोणाचे सरकार येईल? मोदी सरकार वचनाला कितपत जागेल, किती विकास करेल? या प्रश्नांची उत्तरे येणारा काळच ठरवेल. पण लोकांचा विश्वास संपादित करून, त्यांच्यात उत्साह जागवण्याचे कौशल्य त्यांच्याकडे नक्कीच आहे. मनमोहन सिग यांच्यानंतर अशा प्रकारचा नेता पंतप्रधानपदी येणे हा देशासाठी एक सुखद बदल आहे. 

तर अशा प्रकारे मी प्रथमच भारताच्या पंतप्रधानाला प्रत्यक्ष  पाहिले आणि ऐकले, आणि हा प्रसंग दीर्घ काळ माझ्या स्मरणात राहील.

Tuesday, September 23, 2014

Team Blog-O-Holics : Week 2 : Post 11 : Game Of Blogs : By Blogadda

This post is my installment in a story written and continued by my team of bloggers, Blog-O-Holics for 'Game of Blogs' by blogadda.com

Read this story from the start here. Part 1 (by Dola)
The previous part of this story : Part 10 (by Rubina)

---

Jennifer was heading towards the hospital. She had missed the first appointment with Tara, because of that hooded guy. Agreed, he had a point. She had let her guard down in the new city. She was not as vigilant as she ought to be. But that wasn’t the correct time she thought.

He could’ve picked any other day to teach her that lesson. She couldn’t have said this to him, even though he was the reason of her missed appointment. And later Tara herself was kidnapped. That Cyrus guy Jennifer met on the station had rescued her from some strange location.

The news was all over the media. Jennifer noted down the hospital of her hospital, and decided she must meet her there. She bought some fruits for the patient. I must make special efforts to better my impression on her, Jennifer reasoned with herself.

This time she was extremely careful and made sure nobody was following her. She reached hospital and located the reception to ask her about Tara’s room number. There she saw a small girl asking the same question.

---

Roohi was very upset with her dad. First, he had let her mom get into trouble. And when she was back he was not letting her to meet her in hospital. He was making all excuses to keep her from going to hospital.

She was trying really hard to figure out why her dad was behaving so strangely from the day mom vanished? She remembered the last time when her mom was admitted to hospital suffering from malaria, she had stayed with her in hospital for one whole night, and went to school directly from there. Then why she wasn’t allowed this time? She was even elder now.

There was one more reason for her being mad at her dad. Her birthday was approaching. Every year they would celebrate her birthday in grand manner, with all her friends, mom and dad’s friends and relatives. Although dad would work hard to make it memorable, it was mom’s innovative ideas that made the celebrations special.

This time, her mom went missing, came back, admitted to a hospital but her dad wasn’t taking her to visit. Mom wasn’t around for any planning and dad was not even uttering a word. She wasn’t worried about celebrations at all. She didn’t even know whether mom would be there for her birthday. She was desperate to see her.

I must go to hospital on my own, if dad is not allowing me, Roohi decided. She knew in which hospital mom was being treated. She made  a “Get well soon” card for her mom. She took her savings in her piggy bank with her in school. After school, without waiting for dad, she took a rickshaw to the hospital.
At the reception, she asked the lady at the counter about her mom’s room number. A young girl came and also asked about her mom. The lady answered both of them at the same time.

“Tara mam left without letting us know. We are also looking for her.”

---
Read the next part of story : Part 11 (by Santosh)

Me and my team are participating in ‘Game Of Blogs’ at BlogAdda.com. #CelebrateBlogging with us.

Sunday, August 31, 2014

रॅंपेज

"साहेब.. ते माझा रूट बदलायचं बघा की.. किती दिवसांपासून मागे लागलोय तुमच्या. माझी झोप होईना झाली नीट. आता मुलीचं लग्न ठरलंय. लय कामं लागणार माझ्यामागं आता. काहीच सुधरत नाय सध्या.. करा की एवढं काम."

निरकर त्यांच्या कदमसाहेबांना विनवत होता. कदम वैतागले होते.

"बघू म्हटलं नाय का रे तुला.. कशाला माझ्यामागे भुणभुण लावतोय. आता याद्या निघतिल काही दिवसात तेव्हा बघू ना."

"अहो साहेब याद्या आलरेडी ठरल्यात म्हणून कानावर आलं माझ्या. ज्याला हवं ते करून घेतलय सगळ्यांनी. मग माझं पण काम करा ना त्यात."

"कोणी सांगितलं तुला?.. अजुन मलासुद्धा माहीत नाही यादीत कोण आहे कोण नाही.. कुठल्यातरी बाजारगप्पा  ऐकून माझं डोकं नको खाऊ. चल निघ आता. कामं आहेत खूप."

निरकर हिरमोड होऊन निघाला. निरकर एसटीचा ड्राइवर होता. गेले बरेच दिवस त्याला दूरच्या रुटवर नेमलेला होता. आणि अशीच बरेच दिवस त्याची लांब लांब पल्ल्याच्या मार्गावरच नेमणूक होत होती.
म्हणून तो कंटाळलेला होता. अशा सततच्या प्रवासाने त्याला पाठदुखी सुरू झाली होती. महिन्यातला अर्ध्याहून अधिक वेळ त्याचा मुक्काम बाहेरगावी एसटीच्या गलिच्छ स्थानकांमधे असे.

आता मुलं मोठी झाली होती. बापाला ऐकेनाशी झाली होती. आणि ती मोठी कधी झाली ह्याचाही त्याला पत्ता लागला नव्हता. बायको सोशिक आणि शांत होती. पण इतक्या वर्षाच्या धकाधकीच्या संसारात बहुतांश वेळ नवरा दूरच असल्यामुळे ती आता अलिप्त झाली होती.

निरकरला आता थोडा आराम हवा होता. जवळचा कुठला तरी रूट. जेणेकरून त्याला रोज घरी तरी येता येईल. थोडावेळ घरी घालवता येईल. आता मुलीचं लग्न ठरलंय. त्याची कामं उरकता येतील. पण हे काही केल्या जुळून येत नव्हतं. कोणत्या न कोणत्या कारणामुळे त्याच्या रूटची बदली सारखी अडत होती.

लग्नाची कामे तशीच पुढे सरकत होती. मुलाकडच्या लोकांनी थेट हुंडा मागितला नव्हता. पण लग्न कसे झाले पाहिजे, मानपान कसे झाले पाहिजेत हे मात्र बजावून सांगितले होते.

अशी थकवणारी नोकरी सांभाळून हि कामे करताना निरकरचा जीव जिकिरीस आला होता. लग्नात बरीच उसनवारसुद्धा करावी लागली होती. कसंबसं लग्न पार पडलं. पाहुणे गेले. सुटीचे मोजकेच दिवस राहिले होते.
निरकर दुपारचा घरी आराम करत होता. समोर धाकटा मुलगा रवि कम्प्युटरवर गेम खेळत बसला होता. कार बंदुका मारामाऱ्या असा त्याचा टाईमपास चालू होता.

त्याचे बारावीला दोन पेपर राहिले होते. आता पुढच्या खेपेस ते द्यायचे होते म्हणून तो निवांत बसला होता. निरकर विचार करत होता आपलं आयुष्य हे असं चाललय. पोरांना शिकवून काही अपेक्षा ठेवावी म्हटली तर आपले चिरंजीव हे असे. खूप हट्ट करून त्याने हा कम्प्युटर घ्यायला लावला होता. वापरलेलाच घेतला असला तरी निरकरला तो जडच गेला होता. आणि गेम खेळण्यापलीकडे त्याचा काही वापर दिसत नव्हता. विचार करता करता त्याला संताप आला. काही तरी बोलायला म्हणून त्याने हाक मारली.

"ए रव्या"

मुलगा उत्तर देणार तेवढ्यात फोन वाजला. रवीने उठून फोन घेतला. निरकर फोन संपेपर्यंत म्हणून गप बसला. आणि परत विचार करायला लागला. अभ्यासात गती नव्हती पोराला पण तसा वाईट नव्हता. घरात असला कि हसवायचा सगळ्यांना. ताईच्या लग्नात खूप मेहनत केली होती त्याने. निरकरच्या गैरहजेरीत कितीतरी कामे मार्गी लावली होती. वय फार नसलं तरी समज होती. आता ताई गेल्यापासून जरा शांत शांतच होता. आत्ता नको बोलायला. निरकरचा राग निवळत होता. पण अभ्यासाचं काय? जाऊ देत. १२वि होऊ देत. आणखी शिकतो म्हटला तर बघू. नाहीतर देऊ कुठेतरी चिटकवून नोकरीला. असं रडतपडत आपण तरी किती शिकवणार? डोक्यातले विचार शांत होताना निरकरचं मुलाच्या बोलण्याकडे लक्ष गेलं. 

"अरे काही नाही यार. बोर होत होतं. गेम टाकलाय नवा. व्हाईस सिटी. भारीये एकदम. मिशनचं टेन्शन नाय. टॉमी नावाचा हिरो आहे. फॉरेनचा भाई असतो. तो व्हाईस सिटीत येतो आणि छोट्यामोठ्या सुपाऱ्या घेतो. अमक्याची गाडी फोड. बँक लुट असले भारी मिशन असतात. आणि टाईमपास करायला तर एकदम बेष्ट. शहरात फिरायचं मस्त.  गाड्या फिरवायच्या वाटेल त्या. आणि लोकांना उगाच मारायचं. आणि आपलं डोकं सटकलेलं असेल ना तर रॅंपेज घ्यायचं. एका मिनिटात ३० लोकांना मारायचं. पोलिस मिलिटरी सगळ्यांना मारायचं. कत्तल नुसती. सगळा राग निघून जातो त्या लोकांवर."

निरकर ऐकत होता. फोन संपल्यावर रवीने स्वतःच विचारलं.

"काय म्हणत होते पप्पा?"

"अरे एवढा कम्प्युटर घेतला घरात. जर बापाला पण शिकव कि."

"मागे दाखवलं होतं ना. गाणे कसे लावायचे. पिक्चर कसा बघायचा ते."

"ते झालं रे. आता हा गेम कसा खेळायचा शिकव कि."

आज  दिवसाढवळ्या पिउन आले कि काय अशा नजरेने रवीने पप्पांकडे पाहिलं. पण त्यांचं डोकं सटकायला मिनिटभर लागणार नाही हे लक्षात आलं आणि तो मुकाट्याने त्याच्या पप्पांना गेम शिकवायला लागला.

निरकर सगळं शिकत होता. गेम कसा लावायचा. रस्त्यावर कोणाची पण गाडी कशी हिसकावून घ्यायची. गेममधल्या शहरात बंदूक कुठून घ्यायची. मिशन कुठून सुरु होतं. निरकर हळूहळू खेळायला लागला आणि त्याला नवाच चाळा लागला.

त्याला त्या गेममध्ये रॅंपेज विशेष आवडलं होतं. कुठलंही एक हत्यार घ्यायचं, आणि लोकांना मारत सुटायचं. कधीतर नुसती हाणामारी करायची. तर कधी एखादी गाडी घेऊन रस्त्यात सगळ्यांना चिरडून टाकायचं.

हे कदमसाहेब, हा तो हरामखोर कंडक्टर, हि जावयाची खडूस आत्या, हा घरमालक असा सगळ्या जगावरचा राग निरकर त्या गेममध्ये काढायला लागला.

निरकरची बदली झाली. आधीपेक्षा अंतर कमी होतं खरं. पण रस्ता अतिशय खराब. त्याची पाठदुखी काही कमी होईना. पण आता घरी काही वेळ तरी मिळत होता. पण लवकरच तो दूर होता तोच बरा होता असं घरच्यांना वाटायला लागलं .

त्याचं पिणं वाढलं होतं. आणि गेम खेळणंसुद्धा. कार्ट्याने बापाला काय नवीन खूळ लावून दिलं म्हणून निरकरची बायको वैतागायची आणि रविवर भडकायची. नवरातर तिच्याकडे  काही लक्ष देत नव्हता. कधी नव्हे ते जास्त वेळासाठी घरी येऊ लागलेला नवरा असा विचित्र नादी लागलेला पाहून तिचा हिरमोड झाला. काही भानगड वगैरे करत नाही एवढंच नशीब समजून ती गप्प राहायची.

रविपण हैराण झाला होता. आता माझ्यापेक्षा जास्त माझे पप्पाच गेम खेळतात असं तो मित्रांना सांगायचा. त्याच्या मम्मीसारखंच कुठून बुद्धी झाली आणि पप्पांना गेम शिकवला असं त्याला वाटत होतं.

आता निरकर कोपऱ्यावरच्या प्लेस्टेशनमध्ये बॉक्सिंगवाला गेमपण खेळायला लागला. देशी दारूचा अड्डा आणि ते प्लेस्टेशन अशा दोन्ही ठिकाणी त्याची उधारी झाली.

तो पूर्ण जीव लावून बॉक्सिंग खेळायचा. जोरजोराने शिव्या देत गेममधल्या स्पर्धकाला ठोसे मारायचा. हे कोण कुठले काका येउन खेळत बसतात यामुळे तिथली लहान पोरं वैतागली होती. त्यांचं येणं कमी झालं तेव्हा त्याला प्लेस्टेशनचा दरवाजा बंद झाला.

शेवटी रवीने त्याला तसाच एक गेम घरीच कम्प्युटरवर टाकून दिला. निरकर खुश झाला. पोरगा काहीतरी कामाला आला.

हे गेम शिकल्यापासून त्यांचं बोलणंच जवळपास बंद झालं होतं. आधी निरकर दूर असल्यामुळे आणि त्याच्या तापट स्वभावामुळे मुलं त्याला घाबरून दूर पळायची. पण तो आधी त्यांच्यावर ओरडायचा तरी. आता ताईपण लग्न करून गेली. आणि निरकरचा सगळा राग, सगळी निराशा गेममधेच निघायला लागली. ते रागवण्यापुरतं बोलणंपण बंद झालं.

रवीचा निकाल लागला. एक पेपर निघाला पण एक पुन्हा राहिला. निरकर काहीच बोलला नाही. त्या दिवशी मात्र त्याने गेम खेळून रॅंपेजमध्ये शेकडो रस्त्यावरचे लोक, पोलिस, मिलिटरीवाले मारून टाकले.

आता पोरांना धाक होता तो पण नाही. करंट्याने आणखी एक वर्ष वाया घातले आणि बाप असा कम्प्युटरला चिकटलेला हे बघून मात्र बायको प्रचंड संतापली आणि तिचं निरकरशी जोरदार भांडण झालं.

काही दिवस कोणाचंच चित्त थाऱ्यावर नव्हतं. तशातच निरकरने ड्युटीवर असताना एका गावाकडे टपरीवर बस  चढवली. गाववाल्यांनी जमून त्याला मारहाण केली. पुण्यातल्या एका दवाखान्यात त्याला दाखल केलं. एसटीने त्याला सस्पेंड करून टाकलं. चौकशीची टांगती तलवार त्याच्या डोक्यावर लटकावली.

एखाद दोन छोट्यामोठ्या घटना वगळता निरकरच्या कारकिर्दीत हा पहिलाच अपघात होता. पण हल्ली त्याचं पिणं वाढलंय हे सगळ्यांनाच माहित होतं. त्याने पिउन गाडी चालवली असावी असा संशय होता. आणि त्याचं वागणं पण अशात खूप बदललं होतं. अगदी घुम्यासारखा राहत होता तो. डोक्यावर काहीतरी परिणाम झाला असावा असा सगळ्यांचा समज झाला होता.

पैशाची अडचण होतच होती. बायकोने हि संधी साधून कम्प्युटर विकून टाकला. रवीनेसुद्धा थोडासाही विरोध केला नाही. उलट स्वतःच गिऱ्हाईक शोधून आणला. आता तर पप्पा सस्पेंड झालेत. घरी आले कि कम्प्युटर सोडणार नाहीत हि भीती त्यालासुद्धा होती.

कम्प्युटर विकल्याचं निरकरला कळलं आणि नवरा बायकोमध्ये पुन्हा खडाजंगी झाली. पण आता काही इलाज नव्हता. घरी येउन निरकर त्रस्त झाला.

कोणीतरी घरी येउन निरकरला सुचवलं कि कदमसाहेबांना जरा बाहेर जेवायला ने. चिकन खाऊ घाल. थोडी दारू पाज. आणि विनंती कर पुन्हा कामावर घ्या म्हणून.

निरकरला खर्च नको वाटत होता. पण बायकोच्या आग्रहामुळे त्याने कदमसाहेबांना बोलावलं आणि जवळच्या बारमध्ये घेऊन गेला. ती जागा पाहूनच साहेबांनी नाक मुरडलं. पण निरकरच्या विनंतीमुळे आत येउन तरी बसले. त्या बारमध्ये निरकरची आधीचीच उधारी होती. आता तो सस्पेंड झालाय हे त्या मालकालासुद्धा कळलं होतं. आधीची उधारी तर जाऊच दे हा आजचं बिलसुद्धा उधारी करून बुडवणार असं समजून मालकाने हुज्जत घालायला सुरु केली. आधीची उधारी दे आणि मगच आज ऑर्डर घेईन असं तो म्हणायला लागला. यावरून निरकरची आणि त्याची हमरातुमरी झाली. या तमाशामुळे कदम साहेब भडकले आणि काही न खातापिताच निघून गेले.

दुसऱ्या दिवशी निरकर कदमांची माफी मागायला गेला. त्यांनी त्याचा अपमान करून हाकलून लावलं. कालचा तमाशा ते विसरायला तयार नव्हते. चार चौघांसमोर त्यांनी निरकरचा मोठा अपमान केला.

निरकर बाहेर पडला. आणि कोपऱ्यात जाऊन बसला. त्या अपमानामुळे त्याला प्रचंड राग आला होता. पण त्याला काही बोलता आलं नव्हतं. नोकरीचा प्रश्न होता. पण तरी असा अपमान करावा? हा आत्ताचा अपघात सोडला तर त्याच्या कारकिर्दीत ठपका लावावा असं काहीच नव्हतं. देतील त्या रुटवर मुकाट्याने त्याने गाडी चालवली होती. घराबाहेर राहून घर चालवलं होतं. आणि हे सगळं करून मिळालं काय? मुलगी लग्न करून गेली. मुलगा बिनकामाचा. बायकोने बोलणं टाकलं होतं. आणि एक छोटा अपघात झाला. त्या हरामखोर गाववाल्यांनी इतका मारला. ते कमी कि काय म्हणून या लोकांनी सस्पेंड केलं. कधी कोणाला मखलाशी करायला गेलो नाही. पण कधी नाही ते काल त्या भडव्या कदमला दारू पाजायला गेलो तर बारवाल्याने काशी केली. त्याचं भांडण तर माझ्याशी होतं. त्यात या कदमला भडकायला काय झालं? त्याचा राग धरून या माजोरड्याने  आक्ख्या डीपार्टमेंटसमोर इज्जत काढली होती.

निरकर संतापाने लालेलाल झाला होता. त्याचा श्वास एकदम जोरजोराने सुरु झाला होता. समोर एक बस थांबली. ड्रायव्हर खाली उतरून ऑफिसमध्ये एन्ट्री करायला गेला. निरकर अचानक उठला आणि समोरच्या बसमध्ये चढला. ड्रायव्हरने बहुतेक पटकन जाऊन यायचं म्हणून बस सुरूच ठेवली होती.

इतकी वर्षे गांड घासली इथे. एक छोटा अपघात झाला म्हणून सस्पेंड करतात साले. चार चौघात लाज काढतात. थांबा दाखवतो आज ह्यांना. निरकर बेभान झाला होता. त्याने जोरात गाडी वळवली. काही लोक गाडीत चढायला येतच होते ते घाबरून बाजूला झाले आणि थोडक्यात बचावले. निरकरने गेटजवळ एका बसला कट मारून बस स्थानकातून बाहेर काढली. आणि राँग साईडमध्ये घुसवली.

भरपूर प्रवासी बस पकडायला घाईघाईत रस्ता पार करून चालले होते. रिक्षावाले कोपऱ्यावर थांबले होते. गाड्या विरुद्ध दिशेने येत होत्या. सिग्नलसाठी हळूहळू थांबत होत्या. कोणालाहि एसटीची एक बस इतक्या वेगात या बाजूने येईल अशी अपेक्षा नव्हती.

निरकर सगळ्यांना चिरडत उडवत निघाला. बस पकडायची का हरामखोरांनो पकडून दाखवा हि बस. रोजची किटकिट किटकिट साली. इथे थांबवा. तिथे थांबवा. धक्के बसतायत हळू चालवा. पकडा बस भडव्यांनो.

आता लोकांनी आरडाओरडा सुरु केला होता. सगळे लोक त्याला हातवारे करून थांबायला सांगत होते. पण त्याला आता कशाचंच भान नव्हतं. एक ट्राफिक पोलिस दांडा घेऊन हिम्मतीने अडवा आला त्याला चिरडून निरकरने बस तशीच पुढे नेली.

मेन रोडवर गाडी आली आणि गाड्यांना ठोकर देत निघाली. कार जीप कितीही चांगल्या असल्या तरी बससमोर त्यांचा काय टिकाव लागणार?

लोक नुसते ओरडत होते. थांबवा. वाचवा. रोको. गाड्यांच्या धडकीमुळे आणि राँग साईडमध्ये घुसल्यामुळे निरकरची बस थोडी मंदावत होती. तेवढ्यात एक धडक बसलेल्या कारचा ड्रायव्हर ओरडला "अबे पागल हो गया क्या भोसडीके?" आणि निरकर पुन्हा पेटला.

पूर्ण जोर लावून त्याने पुन्हा बस पुढे नेली. जवळच्या पोलिस चौकीतले पोलिस रस्त्यावर आले होते. त्यांनी गाड्या मध्ये घातल्या. गाडीवर गोळ्या झाडल्या पण काही उपयोग झाला नाही. एका पोलिस वॅनने बसला जोरात धडक दिली. आणि गाडी थोडी जागीच थांबली.  त्याचा फायदा घेऊन एक मुलगा जीवावर उदार होऊन बसमध्ये घुसला.

निरकरशी त्याची झटापट झाली. मारामारीत शेवटी निरकर त्याच्यापुढे कमजोर ठरला. आणि शेवटी ते काही मिनिटांचेच भयंकर मृत्युचे तांडव थांबले.

निरकरला मारत त्या मुलाने बाहेर काढले. निरकरने बसच्या मागे पाहिले. किती गाड्या उडवल्या. किती माणसे चिरडली काही हिशोब नव्हता. समोरचे दृश्य अगदी व्हाईस सिटी गेममधल्यासारखे दिसत होते. पोलिसांनी निरकरला मारत मारत आत घेतले.

दिवसभर टीव्हीवर तीच न्यूज झळकत होती. निरकरच्या घरी हे कळलं तेव्हा ते अगदी हवालदिल झाले. रवि पोलिस चौकीत पप्पांना भेटायला गेला तेव्हा ते एवढंच म्हणाले.

"रव्या, लय भारी रॅंपेज केलं आज. बस घेऊन धिंगाणा घातला फुल रस्त्यावर."

Monday, August 25, 2014

Happiness is

Among all trending things on social media, I like one particular trend. To define happiness. We see a lot of posts, images, trying to define what happiness is. A lot of people started posting in the same fashion, when they were happy.

"Happiness is meeting your old friends after a lot of years."

"Happiness is returning to your hometown, and tasting mom's special dishes."

"Happiness is hanging around with your favorite lot, and lose the count of hours."

These people are trying to express what happiness means for them. And that's why I like this trend. When it is easy to name reasons for anger, sorrow and boredom, this trend made people think of reasons of happiness, things which make them happy.


Image Source : homejelly.com
Suddenly, we find so many reasons to be happy. You may be sad about something, and you see someone happy just because he is eating at home, or because he met his old friend, or because he watched a movie of his favorite film star. You may realize that you also have the thing which others are feeling happy about. You may start to feel happy for some time.

I did a basic course (YES+) in Art Of Living, when I was in college. One thing I learnt there (out of many good things) had a huge impact on me. The mentor of that course, Dinesh Bhaiya, asked everyone, "when will you be happy?"

Participants answered with their reasons for happiness. Somebody said he will happy when he will complete his graduation, and somebody said when he will get a job, somebody wanted a bike and so on. 

Then the mentor pointed out, nobody answered that I am happy now. Everybody was waiting for something to happen to be happy. Does that mean you are sad now? Can't you be happy before those things happen? Is your happiness solely dependent on that thing? It was an awakening question.

When we say I will feel happy when this X thing happens, we actually postpone our happiness till that thing happens. Some things take less time, some things like graduation, or even graduation of your children will take years to happen. Shouldn't we feel happy throughout the course?

Then he started explaining. Happiness is a feeling. You can feel happy now. You must stop waiting for something to happen. You should free your happiness of any condition, any target. Even though you'll fail, you will have heart breaks, people will hurt you, still you will have some or the other reason to be happy. 

It does not mean you stop having aims. You must have them, and work hard to achieve them. But don't make your happiness depend on it. Feel happy now. When you achieve what you want, you'll feel happier. But irrespective of your achievements, feel happy, spread happiness. 

When somebody asks you how are you? Don't give a formal "I am good", or a dull reply. Say "Super Fantastic", "Fabulous". When you feel happy, you should make others smile with you.

After doing that course, for some days I also used to reply "Super Fantastic". But later, I automatically returned to routine answers. But this happiness thing has lingered in my mind since then. It has made a great change in the way I feel and take things. For me, happiness is NOW.

Friday, August 22, 2014

डागाळलेला चंद्र

आत्ता अशातच पोर्णिमा होऊन गेली. त्याधीपासून आणि त्यानंतरही काही दिवस चंद्र खूपच सुंदर दिसत होता. आणि सुदैवाने मला जवळपास रोज त्याचं दर्शन झालं. आणि विशेष म्हणजे त्याच्या सर्व डागांसह तो खूप सुंदर वाटत होता.

लहानपणापासून चंद्र म्हणजे सुंदर, सौंदर्याची एक उच्च उपमा म्हणजे चंद्रासम सौंदर्य, असं आपल्या डोक्यात कायमचं कोरलं गेलंय. अनेक कवितांमधून, फिल्मी गाण्यांमधून, ललित लेखांमधून, आणि आणखी कशा कशातून. दर कोजागिरीला आपण त्याची पूजासुद्धा करतो.  

लहानपणी चंद्रावरचे डाग सश्यासारखे दिसतात म्हणून चंद्रदेवाच्या मांडीवर ससा बसलेला असतो अशी कथासुद्धा मी ऐकली होती. पुराणात चंद्राच्या डागांची सुद्धा एक कथा आहे. चंद्राने उंदरावरून जाणाऱ्या गणपतीची खिल्ली उडवली म्हणून गणपतीने त्याला पूर्ण निस्तेज होण्याचा शाप दिला. पश्चातापदग्ध चंद्राने क्षमा मागितल्यानंतर मग गणपतीने त्याला शापातून मुक्त केलं, पण काही डाग तसेच राहिले, ह्या धड्याची आठवण राहावी म्हणून. 

कळायला लागल्यावर डाग असलेल्या चंद्राला इतकं सुंदर म्हणून का चढवून ठेवलंय असा प्रश्न पडतो. नितळ चेहऱ्याच्या एखाद्या लावण्यावातीची तुलना अशा डागाळलेल्या चंद्राशी केली तर काहीसं आश्चर्यच वाटतं. पण डाग असुनही एखादी गोष्ट सुंदर वाटू शकते हे कळायला अजून बरीच समज यावी लागते. 

चंद्राला निरखून पाहताना मनात चंद्र आणि आयुष्य याचा एकत्रित विचार सुरु झाला. आणि जाणवलं कि आपण चंद्रासारखेच आहोत. लहान असतो तेव्हा सुरक्षित वातावरणात, घराच्या आवारात आपला वावर असतो. बरचसं आयुष्य आपल्या आई-बाबांच्या सावली मध्ये जातं. पण त्यातून बाहेर पडून स्वतः प्रकाशमान व्हायचा प्रयत्न करतो, तेव्हा आपल्या प्रकाशाइतकेच आपले डाग सुद्धा जगासमोर येतात. 

अगदी निरभ्र असं आयुष्य कोणाला जगता आलंय? गुण अवगुण, आणि सुख दुःख अशा दोन्ही आलेखांवर आपला आयुष्य आणि व्यक्तिमत्व दोन्हीकडे झुकलेलं असतंच. अगदी सामान्यांपासून असामान्यांपर्यंत सर्वांनी गुणांमुळे, कर्तृत्वामुळे यश आणि लोकांचं प्रेम मिळवलं, तितकंच अवगुणांमुळे, नशिबामुळे दुःख आणि रोषसुद्धा पत्करला. "जगी सर्व सुखी असा कोण आहे?" हा प्रश्न समर्थांना सुद्धा पडला. आणि सुर्यावरही डाग आहेतच, पण तो दूर असल्यामुळे आणि अत्यंत तेजस्वी असल्यामुळे ते दिसत नाहीत एवढंच. 

पण डाग असले तरीही प्रकाश देता येतो, हे चंद्रच आपल्याला शिकवतो. चंद्राचा प्रकाश स्वतःचा नसतो, परावर्तीत असतो, तसंच आपलंसुद्धा नाही का? आपणसुद्धा अनेक गोष्टींसाठी अनेक लोकांवर अवलंबून असतो. ती लोक आपली कामे पार पाडतात म्हणूनच आपण आपला कार्यभाग साधू शकतो. 

आपल्याकडे काही महत्वाचे सण जसे कि राखी पोर्णिमा, गुरु पोर्णिमा, कोजागिरी पोर्णिमा असे पौर्णिमेलाच ठेवले आहेत. या प्रत्येक दिवशी चंद्र वेगवेगळ्या तर्हेने अतिशय सुंदर दिसतो. त्या सणांच्या मूळ उद्देशा इतकाच चंद्राचे सौंदर्य साजरे करणे हा सुद्धा एक सुप्त हेतू नसेल कशावरून?

चंद्रासारखे आपण कलेकलेने वाढत जातो, मोठ्यांच्या सावलीमधून बाहेर पडता पडता आयुष्याची पोर्णिमा गाठतो. आणि पुन्हा कलेकलेने कमी होत आकाशातून गायब होऊन जातो. पण चंद्र पहायची सवय असलेल्यांना त्या जागी अमावास्येलासुद्धा गोल पोकळी दिसत राहते. 

सौंदर्य-दृष्टी आली तर चंद्र त्याच्या सर्व डागांसह सुंदर वाटतो. नजरेतच सर्व काही आहे. ती नजर असलेले लोकच डागाळलेल्या चंद्राला आणि कुठे न कुठे उण्या पडणाऱ्या आयुष्यालासुद्धा सुंदर म्हणू शकतात.

Wednesday, August 13, 2014

रघु देसाई

रघु देसाईचं आतापर्यंतचं आयुष्य एकदम छान गेलं. फक्त सध्याच्या फेजबद्दल तो थोडा नाखूष होता. रघु देसाई काही महिन्यापूर्वीच जुनी कंपनी सोडून आमच्या कंपनीत जॉईन झाला होता. त्याने त्या कंपनीमध्ये खूप मजा केली होती. तिथलं वातावरण त्याला आवडत होतं, त्या कंपनीकडून तो ऑनसाईटपण जाऊन आलेला होता. त्याला आमच्या कंपनीमधलं वातावरण फारसं पसंत पडलं नव्हतं. त्याच्या मते आधीचीच कंपनी छान होती.

"वहापे बहोत ऐश करते थे रे... अपने बाप कि जान्गीर थी जैसे, यहापे साला दिन रात मराओ, फिर भी काम खतमहि नही होता. सबको गधेजैसे काम करनेकि आदत है यहा, टाईमपे घर निकलो, तो ऐसे देखते है कि सामनेसे आठवा अजूबा जा रहा है." अशी त्याची कुरकुर चालायची.

एकदम गप्पिष्ट माणूस होता तो. त्याच्या बे-मध्ये बऱ्याचदा गप्पांचे अड्डे जमलेले असायचे. आजूबाजूच्या दिल्लीकडच्या, पंजाबी वगैरे पोरांसोबत गप्पा मारताना तो तिकडे असतानाच्या आठवणी काढायचा. तिकडचे किस्से सांगायचा. तिकडे वातावरण किती मस्त असतं, तिकडचे लोक किती बिनधास्त असतात. तिथे त्याच्या ऑफिसजवळच तो राहायचा, आणि तिथे आजूबाजूला खाण्यापिण्याच्या गोष्टींची कशी रेलचेल असायची वगैरे गोष्टी सांगत रमायचा.  मुंबईला शिव्या द्यायचा. जाण्यायेण्यात इतका वेळ जातो म्हणून वैतागायचा. त्याच्या  आधीचंच शहर जास्त चांगलं होतं. 

त्याने तिकडे बॅंचलर लाइफ़ एन्जॉय केली होती. आता लग्न झाल्यावर कशी वाट लागते हे सांगायचा, अजून अविवाहित असलेल्या मुलांना "ऐश करा लेको, हेच दिवस आहेत" अशा आशयाचे डोस पाजत राहायचा. त्याचे तसले दिवस सरल्याची खंत त्याच्या चेहऱ्यावर उघड दिसत असे. आणि ती त्याच्या बोलण्यामधूनही लपत नसे. त्याच्या मते आधीचंच आयुष्य छान होतं.

त्याचं एकदा कुठल्यातरी मित्राशी फोनवर बोलणं चालू होतं. लवकरच कुठला तरी लाँग विकेंड येणार होता. तो मित्र सुटीवर मूळ गावी चालला होता. तो यालापण चलायला सांगत असावा. हा त्याला हताश सुरात म्हणत होता "तुमचं काय साहेब.. असेल तर ट्रेनमध्ये बुकिंगच्या बर्थवर नाहीतर बिनधास्त खाली पेपर टाकून जाताल गावाला. आम्ही आता फॅमिलीवाले. बुकिंग मस्ट झालंय. असं जाऊ शकत नाही. आणि एकट्याने जायचा विषय जरी काढला तरी बायको जीव घेईल."

तो एकटा असताना सुटीच्या दिवशी दुसरं काही नसेल तर ऑफिसला येऊन नेटवर टाईमपास करत असे, पण आता कामासाठी विकेंडला ऑफिसला यावं लागलं तरी त्याची बायको कुरकुर करायची, आणि मग तो चिडून यायचा. कधी उशिरा थांबावं लागलं आणि बायकोचा फोन आला कि वेडावाकडा चेहरा करून फोन वर बोलायचा, आणि आम्हाला हसवायचा. त्याची आधीची एकट्याची लाइफ सही होती, असं त्याला मनापसून वाटतं.


एव्हाना आमच्या प्रोजेक्टची डेवलपमेंट संपून टेस्टिंग सुरु झालं होतं. टेस्टर लोक सगळे एपीआय (सॉफ्टवेअरचा एक भाग) टेस्ट करून त्यातले बग्स, इश्युज रेज करायचे. ते आम्हा डेवलपर लोकांना सोडवण्यासाठी असाईन व्हायचे. रघुने बरेच मोठे एपीआय डेवलप केले असल्यामुळे त्याला बरेच इश्युज यायचे, आणि तो वैतागायचा. दिवसभर टेस्टर लोकांना लाखोली वाहत इश्यू सोडवत बसायचा.



त्या एपीआयमध्ये मला कळायला लागल्यावर मलाही इश्यू मिळायला लागले. मग तो गमतीने म्हणायचा "यार तूहि लेले न सारे इश्युज, इतना अच्छा जावाका (जावा : प्रोग्राम लिहिण्याची भाषा) चँप है.. मै  टेस्ट लीड को बोल देता हु, अभी इसके आगे मेरे एपीआयमे कुछ इश्यू आता है, तो सिधा तेरेकोही देनेको.. मेरेको झंझटहि नही चाहिये" हे याला त्याला चँप म्हणून काम करून घेण्याची त्याची खास स्टाइल होती.

कोणालाही काम सांगताना त्या व्यक्तीला कितपत ज्ञान आणि अनुभव आहे याचा विचार न करता अगदी बारीकसारीक सूचना द्यायचा. "काम सुरु करताना कोड लेटेस्ट घे" "किवर्डस कैपिटलमध्ये टाक" इ. समोरच्याच्या अकलेचा असं सन्मान करण्याचं त्याचं कारण "बाद मे लफडा नही चाहिये" असं असायचं. 

रघुला शिकवण्याची आवड उपजतच. त्यामुळे संधी मिळेल तिथे प्रत्येकाला निःशुल्क शिकवण्याचं अखंड व्रत त्याने घेतले आहे. टीममधले सहकारी, टेस्टर लोक, बॉस कोणालाही त्यांचे काम आणखी चांगले कसे करता येईल, त्यांना प्रगतीस कुठे वाव आहे, हे तो अगदी उत्साहाने शिकवत असतो. यामुळे तो कंपनीसाठी एक अमूल्य असेट आहे. :D 

त्याचं स्वतःचं काम किती व्यवस्थित आहे हे दाखवण्याचा त्याला छंदच आहे. कुठल्याही चर्चेत, "मेरे सिस्टमपे तो मैने ऐसा सब कर के रखा है.." "मै ना इसको ऐसे ऐसे करता हु, तो क्या है ना टाईम बच जाता है" अशी वाक्य तो येता जाता कोणावरही फेकतो.

ब्लेम गेम मध्ये तर तो एक कसलेला पटू आहे. सरकारी खात्यात, जिथे फक्त इकडून तिकडे काम टोलवणे हे मुख्य कौशल्य लागतं, तिथे त्याने टोलवाटोलवीची महान कामगिरी करून दाखवली असती. आयटी कंपनीमधेही काही कमी होत नाही हे सर्व. पण टोलवण्याआधी थोडे तरी काम करावं लागतंच.

रघुकडे काही असं काम आलं कि रघु ताबडतोब त्याचा फडशा पाडून, चेंडू दुसरीकडे टोलवून देई. आणि दुसरीकडून काही विलंब झाला कि याचा ठणाणा सुरु. बॉसशी काही बोलायला जावं आणि तो जागेवर नसेल, किंवा त्याने मेलला लवकर उत्तर दिले नाही तर त्यालाही सुनवायला मागे पुढे पाहत नाही. मग बाकीच्या पामरांची काय कथा.

रघूच्या लेखी काम देणारा म्हणजे शत्रू.. त्यामुळे त्याला काम देणाऱ्याला रिकामं न राहू देणं हे त्याचं कर्तव्य असल्यागत तो वागे. प्रत्येक छोट्या बाबतीत वरून मंजुरी आल्याशिवाय स्वतः पुढे जात नसे. म्हणजे कामाला उशीर झाला तर तो बॉसने शंकेचं लवकर समाधान केलं नाही म्हणून, आणि कामात चूक झाली तर विचारूनच केलं होतं अशी बोंब ठोकायला तो मोकळा.

काही दिवसांनी काही एफएस, डीएस ( थोडक्यात क्लायेंटच्या गरजा, अपेक्षा आणि त्या पूर्ण करण्यासाठी डेवलपरला सूचना असलेले कागदपत्र  ) मध्ये चुका ध्यानात आल्या, त्या बदलण्याचं काम होतंच, त्यात परत क्लायेंटने बऱ्याच गरजा बदलून आमचं आणखी काम वाढवलं.

तेव्हा रघु आयुष्यालाच वैतागला होता. "क्या कामा करते रे ये लोग, दस बार डीएस चेंज करेंगे, और दस बार हमे उसकेलीये बैठना होगा दस घंटे, साला एक बार बैठो ना जी भरके क्लायेंटके साथ, ठीक से एकही ढंग का डीएस बनाओ, हम भी एकही बार कुछ घंटे मे बना देंगे उसको.. ये क्या रोज कि मगजमारी, रोज कुछ चेंज करो, रोज उसको टेस्ट करो, इश्युज निकालो तबतक नया चेंज आ जाता है..."

असाच रडतपडत तो प्रोजेक्ट संपला. नंतरच्या प्रोजेक्टमध्ये रघु दुसऱ्या टीममध्ये गेला होता. त्याच्या अनुभवामुळे त्याला आता काही डीएस बनवायचं काम दिलं होतं. मी सहज त्याला भेटायला गेलो तेव्हासुद्धा  तो वैतागलेलाच होता.

" साला क्या टीम है यार, पकाते है बहोत. डीएस बनानेको दिया है मुझे.. हर रिव्यू मे कुछ न कुछ मिल जाता है इनको.. पक गया मै. कोई और बनाये तो अच्छा है यार. बस पढनेका और प्रोग्राम बनानेका. ये फालतू काम है एकदम. अपना पेहलेका काम अच्छा था यार, मजा आता था करनेमे, टीम भी अच्छा था.. ये क्या......"

रघु देसाईचं आतापर्यंतचं आयुष्य एकदम छान गेलं. फक्त सध्याच्या फेजबद्दल तो थोडा नाखूष आहे.

Saturday, August 9, 2014

जकार्ताच्या आठवणी : ९ : परत मातृभूमीला

शनिवारी आम्ही बांडुंगला जाउन आलो आणि रविवार मी खरेदी आणि सामान बांधणीसाठी राखून ठेवला होता. दुसऱ्याच दिवशी म्हणजे सोमवारी माझं परतीचं विमान होतं. मी घरातली मंडळी आणि मित्रांसाठी काही भेटवस्तू आणि स्मृतीचिन्हे घेतली. कारण हि माझी पहिलीच विदेश यात्रा होती. 

भारतात आता चित्र झपाट्याने बदलत असलं तरीसुद्धा विदेश यात्रा हि अजूनही विशेष गोष्ट समजली जाते. माझे बाबा मागे एकदा कामानिमित्त जपानला गेले होते, आणि त्याची खूप हवा झाली होती. सगळ्यांनी शुभेच्छा द्यायला फोन केले. ज्या लोकांना हे जाऊन आल्यावर समजलं ते आधी का नाही सांगितलं  म्हणून नाराज झाले होते. 

मी आयटीमध्ये काम करतो त्यामुळे मी कधी न कधी ऑनसाईट जाणार हे तर आम्हाला माहीतच होतं. पण म्हणतात त्याप्रमाणे पहिली ट्रीप हि सगळ्यांसाठीच खास असते. आणि माझ्यासाठी सुद्धा खास आहे. हा खूपच छान अनुभव होता. माझ्या ऑफिसमधले असे लोक ज्यांना आता याचं काही अप्रूप राहिलेलं नाही, त्यांनासुद्धा माझा उत्साह पाहून लक्षात येत होतं कि हि माझी पहिलीच वेळ आहे. 

मी कामाच्या बाबतीत बरंच काही शिकलो. नव्या जागा पाहिल्या. तिथे भरपूर मजा केली. मी एक महिना एकटाच राहत होतो म्हणून स्वतःलाच स्वयंपाक करून घ्यावा लागायचा. त्यामुळे माझा स्वयंपाक सुधरला. 

तंत्रज्ञानामुळे आता गोष्टी खूपच सोप्या झाल्या आहेत. गुगलने एकहाती कित्येक उपयोगी सॉफ्टवेअर बनवले आहेत. गुगलचे नकाशे जगात कुठेही जायला मदत करतात. गुगलची भाषांतर सेवा बऱ्याच भाषांमध्ये उपलब्ध आहे. एखाद्या भाषेचा पॅक लोड करून घेतला तर इंटरनेट नसताना पण हि सुविधा वापरता येते. त्यात व्याकरणातल्या चुका होत असतीलहि, पण कामचलाऊ वाक्ये तर नक्कीच बनवता येतात. हि सुविधा मला तिथल्या टॅक्सीवाल्यांशी बोलताना खूप उपयोगी पडली. 

आणि गुगलच्या प्राथमिक सर्चच्या सुविधेबद्दल नव्याने काय बोलावं? या कशाहीबद्दलची माहिती मिळवण्याच्या शक्तीने सर्व जगात एक क्रांतीच झाली आहे. मला खरच आधीच्या काळातल्या लोकांनी ज्यांनी या कुठल्याही सुविधा न वापरता जगात प्रवास केला असेल, त्याचं आश्चर्यच वाटतं. ज्या लोकांनी हि तंत्रे बनवली, आणि ज्या लोकांनी या तंत्रांशिवाय यश मिळवलं अशा दोन्ही प्रकारच्या लोकांना माझा सलाम. 

खूप सिनेमे पाहण्याचा पण एक वेगळाच फायदा आहे. विमानतळ, तिथले सुरक्षेसाठीचे चेक्स, बाहेरच्या देशातल्या गोष्टी या पुन्हापुन्हा पाहून आपल्याला नकळत त्याबद्दल ओळख होत जाते. एरवी सगळं काही प्रथमच पाहताना जो गोंधळ उडतो तो कमी होतो. 

मी पुन्हा क्वालालम्पुरमार्गेच परत आलो. माझी क्वालालाम्पुरहून मुंबईला जाणारे विमान एक तास उशिरा निघाले. तिथे वाट पाहताना खूप कंटाळा आला. विमान हवेत गेल्यावरसुद्धा हवामानामुळे खूप त्रास झाला. सगळ्यांनाच हरवलेल्या MH ३७० विमानाची घटना आठवत होती. आम्हाला निघायलाच आणि रस्त्यात हवामानामुळे बराच उशीर झाल्यामुळे मुंबई विमानतळावर पोहोचण्याची वेळ चुकली होती. बाकीच्या विमानांना पुढे जाण्याची संधी मिळाली होती. मग त्यामुळे आम्ही थोडावेळ मुंबईमधेच आकाशात घिरट्या घालत होतो. मी मुंबईमधल्या जागा ओळखण्याचा प्रयत्न करत होतो. 

मुंबई अशा प्रकारे पाहण्याचा अनुभव छान होता. भरपूर वेळ हवेत घालवून शेवटी आमचं विमान मुंबईमध्ये उतरलं आणि मी माझ्या मातृभूमीत परतलो. :)