Monday, November 10, 2014

स्वच्छ भारत अभियान : आमचा सहभाग

गेल्या रविवारी मी माझ्या मित्रांसोबत देशव्यापी स्वच्छ भारत अभियानात सहभागी झालो. (या अभियानाबद्दल वाचण्यासाठी इथे क्लिक करा.) हे अभियान सुरु झाल्यापासुन यात सहभागी होण्याचे माझ्या मनात होते.

माझा मित्र अक्षय देशपांडे आणि त्याच्या ऑफिसमधल्या मित्रांनी सामाजिक उपक्रम हाती घेण्याच्या उद्देशाने "उमंग" या नावाने एक ग्रुप बनवला आहे. आणि ते वेळोवेळी रक्तदान, अनाथालय, वृद्धाश्रम, मूक बधीरांची शाळा यांना भेट देऊन मदत करणे अशा प्रकारे कार्य करत राहतात. 

त्याला या अभियानात नक्की रस असणार अशी माझी खात्री होती. त्यामुळे मी सर्वप्रथम त्याच्याशीच याविषयी बोललो आणि माझ्या अपेक्षेप्रमाणे या "उमंग" ग्रुपचा स्वच्छ भारत अभियानाचा कार्यक्रम ठरलेला होता. 

त्यातल्या सर्वांनी आपल्या घराजवळ फिरून कचरा पडलेल्या जागा हेरून ठेवल्या. त्यातल्या काही आम्ही अभियान सुरु करेपर्यंत साफ झाल्या होत्या. :D हि म्हटली तर अडचण, पण नक्कीच सुखद होती. नगरपालिकेचे लोक आपले काम पार पाडत असल्याची खुण होती. 

रविवारी सकाळी आम्ही ठरवलेल्या जागांपैकी पहिल्या जागी पोचलो. उमंगच्या सदस्यांशी हि माझी पहिलीच भेट होती. पिंपळे सौदागर, रहाटणी भागातल्या रस्त्यावर एका कोपऱ्यावरची हि जागा होती. मोकळीच जागा असल्यामुळे ती कचरा टाकण्याची अनधिकृत जागा बनलेली होती. आम्ही आमचे झाडू, कचऱ्याच्या पिशव्या, हातमोजे बाहेर काढले आणि काम सुरु केले. 

हळूहळू लोकांचे लक्ष आमच्याकडे जायला लागले. काही आपल्या जागेवरून, काही जवळ येउन आम्हाला पाहत होते. काही आमच्याशी येउन बोललेसुद्धा. समोरच्या घरातल्या लोकांकडून आमच्याकडे नसलेली सुपली मिळाली. आमचे काम चालू होते. 

तिथे नगरपालिकेचा एक सफाई कर्मचारी जवळ आला. लोकांनी त्याला हे तुम्हाला सहकार्य करतायत, त्यांची मदत करा म्हणून त्याला दटावून आमच्याकडे पाठवले. त्याने ४ वर्षापासून मला कपडे दिले नाहीत, पगारवाढ दिली नाही म्हणून कुरबुर केली, पण थोडी मदतसुद्धा केली. 

आम्ही साफ करत असल्याचे पाहूनसुद्धा एक माणूस आमच्यासमोर येउन कचरा टाकून गेला. आम्ही त्याला बोलायला लागताच निर्लज्जपणे काहीतरी उत्तरे देत कचरा तसाच सोडून निघून गेला. 

तिथे केसांचे किती तरी झुपके पडलेले होते. ते पाहून आम्ही जवळच्या कटिंग सलूनमध्ये समजवण्यासाठी गेलो. त्यांनी काही कबुल तर केले नाही, आम्ही गाडीतच कचरा टाकतो. त्या समोरच्या सलूनमध्ये जाऊन बघा म्हणून कटवले. दुसऱ्या कटिंग सलूनमध्ये पण तीच गत. 

कबुली तर नाही, पण लोक येउन आपल्याला बोलतायत हि जाणीव तरी त्यांना होईल अशा आशेने आम्ही निघालो. 

एवढा कचरा मोकळा पडलेला पाहून आम्ही नगरसेवकाला भेटून तिथे कचराकुंडीची व्यवस्था करण्याची विनंती करावी असा विचार केला. पण तिथे फिरतीवर असलेल्या नगरपालिकेच्या सुपरवायझरकडून समजले कि तिथे आधी कचरा कुंडी होती, पण ती जागा ज्यांची आहे त्या लोकांनी विरोध करून ती हटवली. अधिकृत कचराकुंडी असताना ती त्या मालकाला चालली नाही. पण आता ती नसतानासुद्धा लोक केवढा कचरा टाकून ती जागा घाण करत होते, हे त्या मालकाला कसे चालते असा प्रश्न आम्हाला पडला. 

आम्ही आजूबाजूच्या घरात तिथे कचरा टाकू नका अशी विनंती करून आलो. त्यांनी आमचे ऐकून घेतले. पण त्यांनी इथे राहणाऱ्या लोकांपेक्षा येणारे जाणारे, गाडीवरून जाणारे लोक जास्त कचरा फेकून जातात अशी तक्रार केली. 

तिथली सफाई करून आम्ही पुढे निघालो. त्याच रस्त्यावर अजून एका ठिकाणी अशीच कचरा टाकण्याची अनधिकृत जागा बनली होती. ती आम्ही साफ केली. त्या कचऱ्यात चहाचे कप खूप असल्यामुळे आम्ही बाजूच्या चहावाल्याला तिथे कचरा टाकू नका म्हणून विनवले. इथेही तोच अनुभव आला. कोडगेपणे त्याने नुसते ऐकून घेत फक्त हो ला हो केले. 

आम्ही आधीच्या जागेवर पुन्हा चक्कर मारून आलो. लोकांच्या सांगण्याप्रमाणे रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या लोकांनी थोडा कचरा तिथे फेकलेला होता. आम्ही तो पुन्हा उचलून साफ केला. 





मग आम्ही औंधला गेलो. तिथेच सर्वात जास्त वेळ लागला. तिथे एक मोठी कचराकुंडी होती. ती गच्च भरलेली होती, आणि त्यामुळे लोकांनी तिच्या आजूबाजूला भरपूर कचरा टाकला होता. त्या कुंडीच्या अवतीभवती बऱ्याच दूरपर्यंत कचरा पसरला होता. इथे पोहचेपर्यंत आमची संख्यासुद्धा वाढली होती. 

आम्ही काम सुरु केलं. सगळ्यांनी मिळून कचरा मोठ्या पिशव्यांमध्ये गोळा केला. कचऱ्याला कोणी तरी आग लावलेली होती. ती मधून मधून भडकत होती. बराच वारा सुटला होता. धूर पसरत होता. आम्हाला झाडायचं होतं त्याच्या विरुद्ध दिशेने वाहून वारा सगळी धूळ परतवत होता. आम्ही बराच वेळ काम सुरु ठेवलं. 

तिथे पसरलेला जवळपास सगळा कचरा साफ करून भरून ठेवला. आमची सफाई चालू असताना जवळच्या दोन मॉलमधले कर्मचारी कचरा घेऊन आले. रोजप्रमाणे आपली पोती उलटी करून निघण्याचा त्यांचा विचार दिसत होता. पण आम्ही त्यांना रोखले. आणि त्यांनी पण मग जेव्हा गाडी येईल तेव्हा त्यातच कचरा टाकण्याचा निर्णय घेतला. 

तिसरी जागा साफ केल्यानंतर आम्ही हिप हिप हुर्रे करून एकमेकांचे अभिनंदन केले. घरी परत येताना आज काही तरी चांगलं काम केल्याचं समाधान होतं आणि पुन्हा करण्याची ईच्छा होती.



स्वच्छ भारत अभियान : गरज

पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेवर आल्यापासुन त्यांनी कैक चांगल्या गोष्टी सुरु केल्या. विदेश दौऱ्यावरचा खर्च कमी करण्यासाठी लवाजमा कमी करणे. सरकारी बाबूंना वेळेवर येण्यास भाग पडणे. उच्च अधिकाऱ्यांसोबत जातीने बैठकी घेऊन त्यांना त्यांची कल्पनाशक्ती वापरून सरकारी कामकाज सुलभ सुकर करण्यास प्रोत्साहन देणे. पंतप्रधान जन धन योजना. सांसद ग्राम विकास योजना. आणि एक देशातल्या प्रत्येक नागरिकाने हातात घेण्याजोगे आणि घ्यावेच असे स्वच्छ भारत अभियान.

मोदी सरकारने एक चैतन्याची लहर या देशात आणल्याचे त्यांचे विरोधक असलेले केजरीवाल सुद्धा मान्य करतात.

स्वातंत्र्य दिनी याची घोषणा मोदींनी केली, आणि २ ऑक्टोबर २०१४ रोजी गांधी जयंतीच्या निमित्ताने हे अभियान स्वतः दिल्लीत झाडू हाती घेऊन सुरु केले. आपल्या सहकाऱ्यांना, देशातल्या नागरिकांना आणि त्यांनी ९ इतर सेलिब्रिटीजना यात सहभागी होण्याचे आवाहन केले. प्रत्येकाला स्वतः सहभागी होत आणखी ९ जणांना आवाहन करण्याची विनंती करून साखळी पद्धतीने याचा प्रसार करण्याचा प्रयत्न केला.

याला त्या सर्व सेलिब्रिटीजकडून चांगला प्रतिसाद मिळाला. त्यांनी आणखी लोकांना आमंत्रित केले. अनिल अंबानी, अमिताभ बच्चन, शशी थरूर, सचिन तेंडूलकर, सलमान खान अशा अनेक प्रथितयश मोठ्या लोकांनी यात उत्साहाने सहभाग नोंदवला.

मोदींचे विरोधक याला देखावा म्हणून टीका करतात. काँग्रेसवाले मोदी सरकारने बाकी सर्व गोष्टीप्रमाणेच हि गोष्ट आमच्याकडूनच उचलली आणि श्रेय लाटण्याचा प्रयत्न केला असा आरोप करतात. त्यांनी यात सक्रिय सहभाग तर नोंदवला नाहीच. पण मोदींनी नामांकित केलेले शशी थरूर यांनी या अभियानात सहभागी झाले म्हणून आणि मोदींचे कौतुक केले म्हणून त्यांना पक्ष प्रवक्ते या पदावरून बडतर्फ केले.

आणखी काही लोक मोदी सांगताहेत त्यात नवे काय? गाडगे बाबा, गांधीजी यांनी हा संदेश आधीच देऊन ठेवला आहे. मग मोदींनी सांगण्या आधी का केली नाही स्वच्छता? असा सवाल करत आहेत.

हि सगळी निष्क्रिय बडबड आहे. संदेश कोणी आधी दिला, कोणी नंतर दिला, कोणाच्या सांगण्यावरून कोणी स्वच्छता केली या सगळ्यापेक्षा स्वच्छतेबद्दल वाढणारी जागरूकता महत्वाची आहे. होणारी स्वच्छता महत्वाची आहे.

भारतात अनेक आरोग्याचे प्रश्न हे स्वच्छतेशी निगडीत आहेत. मग ती घरातली स्वच्छता असो वा रस्त्यावरची. स्वच्छता राखल्याने मलेरिया, डेंग्यू, चिकन गुनिया असे अनेक साथीचे रोग आपोआप नियंत्रणात येतील.

भारतीयांची नागरी मानसिकता खूप अविकसित आहे. आपण आपल्या घरात जशी स्वच्छतेशी काळजी घेऊ तशी बाहेर घेत नाही. घराबाहेर आपण कुठलीच जबाबदारी घेत नाही. आपल्या घरून कचरा बाहेर गेला कि प्रश्न संपला.

ह्या उदासीनतेमुळेच, आपण ज्या प्रशासकीय यंत्रणेकडे हि जबाबदारी सोपवली आहे, ते लोक फायदा उठवतात. प्रश्न विचारणारे लोक नसल्यामुळे कचरा तसाच पडून राहतो. वेळोवेळी स्वच्छता होत नाही. राजकारणी मंत्री जिथून जातील तिथेच या यंत्रणा जाग्या होताना दिसतात.

जास्तीत जास्त नागरिक स्वच्छतेबद्दल सजग होताना दिसले, त्यासाठी रस्त्यावर येताना दिसले तर आपोपाप या यंत्रणांवरचा दबाव आणि वचक वाढेल. त्यांना आपले काम चांगले करण्यास सहकार्यसुद्धा मिळेल आणि प्रेरणासुद्धा.

स्वच्छता हि कोणी सांगण्याची गरज नसलेली प्राथमिक गोष्ट आहे. आपणास जो नेता/संत आवडतो त्याच्या नावाने आपण स्वच्छता करावी. मोदी फक्त निमित्त आहेत, सुरुवात आहेत. उद्या मोदी सरकार गेले तरी हे अभियान सुरु राहावे.

या अभियानातल्या आमच्या सहभागाबद्दल वाचण्यासाठी इथे क्लिक करा. 

Saturday, November 8, 2014

An Opportunity Lost

Last week I had an opportunity to do shopping worth 5000 bucks for free. How? But I lost it. How? Well this is the story about that opportunity lost.

I keep participating in blogging contests organized by blogadda. They have many interesting contests organized with many partnering brands. There are some opportunities where you can get a copy of a book to review. I love to participate in these activities, and I have received lovely gifts and goodies from blogadda for that.

This time blogadda arranged one activity with quikr.com. We all know about quikr.com a mega buy and sell portal, which acts as matchmaker of buyers and sellers.

The activity was like this. A shortlisted blogger will shop a few items worth 5000 from quikr. He would write a blog about his experience about the site, and the items he purchased. Once the entry is validated against all the rules, he will get his 5000 back.

I was shortlisted for this activity, and I confirmed my participation. I was excited. I immediately called my wife and told her the news. I started looking for all the items on quikr. I asked my wife to do the same. The site first asks you for your location and then shows you the items for sale in your area.

There are many categories and subcategories like electronics, furniture, books, vehicles, and you have many options to shortlist your items using many filters. It is good practice to upload pictures of items you want to sell.

What could you possibly buy in 5000? There are a lot of things. But I didn’t want any random thing just because I was going to get it for free? Someone told me a cleaning funda. Our home should be occupied with only those things which are actually useful, which satisfy some need. Any other thing that is there for no reason, and unused, you should get rid of it.

The portal like quikr is started for this very purpose. To get rid of something that is better sold than used at your place.

So when I started actually looking for stuff to buy, I started realizing lot of constraints. The first thing I could think of is some furniture items and books.
I recently did small makeover of my house with some new furniture items. So there were only 2-3 kinds of small furniture items like a corner stand, centre table on our wish list. I surfed a lot for this. The thing with the furniture is, suitability. There are two ways to decorate your house.

Either you do it once and for all, with help of interior designer, or your own creativity and a big hole in your pocket. Or you keep purchasing the stuff according to priority as you go on over time. I am following the second route.

This way even though you don’t have the option to select a theme and follow uniformity in designs of different items, but the theme automatically shapes up with the items you already have. You have to keep this theme in mind when you purchase next, so that it suits well in your current home interior.

I came across many likeable items I was looking for, but they weren’t suitable to the theme our house needed. Some were in far off areas of Pune.

Then I realized the second constraint, i.e. locations. I stay in one corner of Pune, and work in another. The items were located in third, fourth, corner of Pune and so on. On a weekday, there was no way I could go and collect these items.

I found out another feature of quikr, to filter by locations. I entered the areas nearby my residence, and narrowed down the list. Although this eased the item hunt, it reduced the choice I had.
Simultaneously I was looking for books also. I love reading, and was excited with the number of books I could purchase with this amount. But the books available were mostly English books by Indian authors like Chetan Bhagat, Shiva Trilogy, which I have read and have already in my collection. Some of them actually seemed to be pirated copies.

The previous problems prevailed here. I couldn’t have picked up the items on weekday, on weekend I had some plans with guests coming over. This activity got side lined in my work and weekend plans, and I missed my deadline.

I regret the lost opportunity. More than that, I regret that I failed to inform blogadda about me being unable to finish the activity, or else it could have benefited someone else willing to participate. Sorry blogadda and quikr for the blunder. L

I thank blogadda to give me this opportunity to write this post of redemption. This is just to feel better about it. As they say, opportunity never knock your door twice.