Wednesday, April 30, 2014

The Man With Many Careers

You may have come across a man with many talents, a man with many businesses, a man with many girlfriends, may be. But how often do you come across a man who has successfully pursued many careers in his life and one polar opposite to the other?

Well, I met this man in Hyderabad few years ago, and was fascinated with the way he has lived his life. He still inspires me.

I am talking about my GRE teacher, Mr. Krupa Shanker. He runs a famous and successful coaching institute in hyderabad for the GRE exam. For those who don't know, this exam is required to many courses in English speaking countries like U.S., U.K., Australia, etc. This has two main parts, English and Maths. 

I went to Hyderabad, with my friends for internship, and few technical courses, in our final year of engineering. I was planning to take GRE test, and go to U.S. for PG (which I dropped later), and I joined this class, as one of my relatives in Hyderabad, highly recommended it. He himself attended this class, and scored well in the test and went to U.S. One more friend of mine, +vishal chaudhari joined along with me.

From the first day itself, we were amazed with the film like entry he makes into the classroom, dashes to the podium, and conducts the lecture with a very high level of enthusiasm and energy. He taught us the English part of GRE, and did it with his unique style.

He never sticked to the book, and conventional ways of teaching English in India. He used to talk on any topic, all walks of life, and whenever he used a notable word in English, from GRE point of view, he used to halt for a minute, write that word down, explain its meaning and all related words, and then continue with the topic.

Those random talks exhibited his tremendous knowledge in several fields, fabulous command over language, and will to share it, encourage his students to grow and rule the world. Juggernaut is his favorite word, and he has written a nice poem about it. Juggernaut means an unstoppable force, which will destroy anything that comes in it's path. He used to call himself and his students as juggernauts.

He is an ardent reader. In my guess, he might have read thousands of books over these years. He himself said, that he used to read books on literally any subject, in any genre. Be it fiction, non fiction, technical, scientific anything. He told us about his farm house, where his library has thousands of books, which I wish to visit, and already feel envious about.

He shared his story through many of such lectures. He was a chef for several years. He and Sanjeev Kapoor (the famous chef, and host of recipe shows on TV) were trained in the same batch. 

After working as a chef for a long time, he took interest in the teaching, and joined some college. Where other teachers used to teach 2-3 subjects, he started teaching 5-6 different subjects since he really enjoyed teaching, and could take the challenge. He did not stop there, and wrote text books on his subjects. 

When he was done with teaching in college, he went into private sector. Worked in a large chain of GRE coaching institutes, and gathered enough experience, and soon opened his own institute. He instantly connected with the students, and created a niche for his institute, among other big institutes in the field.

Due to his knowledge, and love for teaching, he gets invited to many places to deliver speeches, and motivate people. Public Speaking/Motivational Speaking is another parallel career for him. He told us, that on one occasion, he was invited to a Jain Community function, to speak about his views and understanding of Jainism. He delivered his speech so well, that an old Jain fellow met him afterwards and told him that, he never understood Jainism as well as that day in his entire life.

When we were attending his classes, he was enrolled to a law course. He studied law while conducting classes as usual, with a pretty busy schedule. And still he topped the semester exams. 

He believes knowledge to be the biggest strength. He himself is a great example of this. Knowledge is what has led him to success in whichever field he enters. He is an inspiration to those who want to pursue their interests. He explores every field he is interested in, and proves that if you strive to excel, you can succeed.

I look up to him, when I think of my other interests than my job, like photography, writing. I look up to him, when I dream of developing my own library over years to come. When I look up to him, I feel assured that if ever I want to quit my current job, and aspire to do something else, I can succeed, If I put my 100% to that thing.

In true sense, he is my role model.


I am writing about #MyRoleModel as a part of the activity by Gillette India in association with BlogAdda.com.

Friday, April 25, 2014

ती आणि तो : भाग ५

(भाग १) (भाग २) (भाग ३) (भाग ४)
सकाळी सकाळी दार वाजलं. त्याने उघडलं, तर आई बाबा दारात उभे होते. ते आनंदात होते. 

"काय रे प्रमोशन झालं तर पार्ट्या करतोस, पण आम्हाला सांगत सुद्धा नाहीस?" बाबा आत येता येता म्हणाले. 

"तुम्हाला कसं  कळालं?"

"अरे तुझ्या पार्टीचे फोटो तुझ्या मित्रांनी टाकले फेसबुक वर. बाबांनी मला दाखवले. आम्ही किती फोन केले तुला. पण तू उचलले नाहीस."

"अगं, कालच बातमी कळली. लगेच मित्रांनी पार्टी द्यायला लावली. नंतर घरी येउन झोपलो होतो. आज तुम्हाला सांगणार होतो."

"तोपर्यंत आम्हाला थोडी राहवणार होतं. तसाही तू आजकाल आमच्याशी नीट काही बोलत नाहीस."

मागच्या खेपेस त्यांनी लग्न मोडायला सांगितलं तेव्हापासून तो त्यांच्याशी मोकळेपणाने बोलतच नव्हता. 

"ते जाऊ दे. आम्हाला लगेच यायचं होतं. आम्ही पहाटेच निघून आलो. आणि हे काय? प्रमोशनचा, आम्ही आल्याचा काहीतरी आनंद दिसतोय का तुझ्या चेहऱ्यावर?"

"असं काही नाही ग आई. बसा तुम्ही जरा. मी चहा टाकतो."

"मला कळतंय ना सगळं. ते लग्न मोडल्यापासून तू हा असा आहेस. अरे किती दुःख करशील? आपण तरी काय करणार होतो. जनरीतच पाळली फक्त आपण. तिची पण चूक नाही आणि आपली पण नाही."

"आई तो विषय नको बरं."

"बरं तो नको. पण दुसऱ्या मुलीतरी बघशील कि नाही? तुझं लग्न झाल्याशिवाय काही तुझं चित्त थाऱ्यावर येणार नाही. मी येताना फोटो घेऊनच आले आहे. तू बघ सावकाश. पसंत कर. मग आपण पुढचं बघू."

"मी बघणार नाही. मी तिच्याशीच लग्न करणार आहे." याच क्षणी त्याचा निर्णय झाला होता. 

"हा मूर्खपणा आहे. झालंय ना आपलं बोलणं यावर?"

"एक स्त्री असून तू दुसऱ्या स्त्रीबद्दल अशी कशी वागतेस आई? तिची काय चूक आहे यामध्ये?"

"काही चूक नसेल. पण ती मला सून म्हणून चालणार नाही."

"माझं प्रेम आहे तिच्यावर. मी तिला नाही विसरणार."

"विसरावं लागेल."

"मला एक सांग आई, सॉरी, पण समजा तुझ्यावर आज बलात्कार झाला."

"वाट्टेल ते बडबडू नकोस. मोठा झालास तू, पण असं काही बोलायला लागलास तर थोबाडून काढेन तुला."

"वाट्टेल ते नाही. तुला काय वाटतं बलात्कार फक्त तरुण मुलींवर होतात? चार वर्षांच्या चिमुरडीवर पण होतात, आणि सत्तर वर्षांच्या थेरडीवर सुद्धा. आज तुमच्या लग्नाला सत्ताविसेक वर्ष झाली असतील, तुला मी एवढा मोठा मुलगा आहे. उद्या तुझ्या वर समजा बलात्कार झाला, तर मी आणि बाबांनी काय करावं?"

आईच्या पायाखालची जमीनच सरकली. बाबा सुद्धा धर्मसंकटात पडले होते. 

"बाबांनी तुझ्याशी नातं तोडावं का? त्याचं आणि तुझं तरी लग्नाचं नातं आहे. तू तर माझी आई आहेस. बलात्कार झाला म्हणून मी तुला आई म्हणून नाकारावं का? आपलं प्रेम संपेल?"

आई बाबा दोघेही या सडेतोड प्रश्नामुळे निरुत्तर झाले होते. 

"मग सांग आई. तिच्यावर बलात्कार झाला, म्हणून मी तिला माझं प्रेम देऊ नये?"

आई आता पश्चातापाचे अश्रू गाळत होती. त्याला तिचं उत्तर मिळालं होतं. त्याने बाबांकडे पाहिलं. 

"मी असं काही झालं तरी तुझ्या आईला सोडणार नाही. तूपण तुझं प्रेम सोडू नकोस."

त्यांचं पाठबळ घेऊन तो तिच्या घरी निघाला. थोड्याचवेळात ती ऑफिसला निघेल, म्हणून घाई करत तो तिच्या घरी पोचला. आणि दारातच थांबला. तिची मावशी घरी आलेली होती. आणि समजावणीच्या सुरात तिला सांगत होती. 

"हे बघ आता आपली बाजू अशी आहे. आपल्याला थोडं जुळवून घ्यावाच लागेल. जे पर्याय समोर आहेत त्यातूनच निवड करावी लागेल ना?"

"पण करूच का मी निवड? नाही केलं लग्न तरी काय बिघडणार आहे? आपली बाजू अशी आहे म्हणे. काय तर माझ्यावर बलात्कार झाला. माझ्या इच्छेविरुद्ध सेक्स झाला. आता हे जे स्थळ तू सांगत आहेस. तो माणूस घटस्फोटीत आहे. त्याने काय सेक्स केलाच नसेल? त्याचं प्रकरण होतं म्हणून त्याची बायको त्याला सोडून गेली. आता हा माणूस ह्या लायकीचा. पण त्याच्या घरी तो मला उपकार केल्यासारखं ठेवेल. कारण माझ्यावर बलात्कार झाला ना. का जाऊ मी अशा घरी?" ती संतापून बोलत होती. 

"जाऊ दे. हवं ते कर. मदत करायला गेले तर ह्या असल्या भाषेत मला ऐकवतेय. मी जाते. ज्याचं करायला जावं भलं…" मावशी पुटपुटत  बाहेर निघाली. 

"हेच तर. तुम्हाला असे स्थळ आणून वाटतंय कि तुम्ही माझं भलं करताय. अरे अशा घरी जाऊन कुजण्यापेक्षा मी एकटीच राहीलेलं काय वाईट मला सांग ना?"

तिने बाहेर निघालेल्या मावशीला ऐकवलं. आणि मग त्यांचं दारात उभ्या असलेल्या त्याच्याकडे लक्ष गेलं. 
मावशी त्याच्याकडे फणकाऱ्यात पाहून निघून गेली. ती मावशी जाईपर्यंत थांबली. आणि मग त्याच्यावर बरसली. 

"कशाला आला आहेस आता? तू सोडल्यानंतर माझे काय हाल झाले ते पाहायला आलास का?"

"नाही. माफी मागायला आलोय. तुला पुन्हा मागणी घालायला आलोय."

"कशाला? सहानुभूती वाटतेय का. कि तू नाही केलंस लग्न तर कोण करेल माझ्याशी? नको मला तुझी सहानुभूती. आणि उपकार तर बिलकुल नको."

"नाही गं. तुझ्यावर उपकार करावेत म्हणून नाही आलो मी. आणि सहानुभूती पण नाही. काही असेल तर तो माझा गिल्ट, आणि माझं तुझ्यावरच प्रेम."

तिला काय बोलावं ते समजलं नाही. पण तिला त्याला आणखी रागवायचं होतं. 

"शांत हो तू. काका, काकू, तुम्ही पण बसा. मला तुमची पण माफी मागायची आहे." 

"मी जे केलं, त्यानंतर मी कधीच शांतपणे झोपू शकलो नाही. माझ्या चुकीचा सल माझ्या मनात होता. तुला मी तुझ्या कठीण परिस्थितीमध्ये एकटीच सोडून दिलं. आपण नेहमी सोबत राहू, अशी आपण एकमेकांना कमीटमेंट दिली होती. त्याला जागलो नाही."

"तुझ्यावर बलात्कार झाला. तुला असं स्वीकारलं तर आईबाबा नाराज होतील. नातेवाईक नाक मुरडतील हे तर माहित होतंच. पण माझं मला काय वाटतंय हेच मला कळत नव्हतं."

"मी खूप विचार केला. कि तुझ्यावर बलात्कार झाला तर तुझी काही चूक नसूनपण तुला का शिक्षा व्हावी? मी तुला का सोडावं? तुझी अब्रू गेली असा सगळ्यांनी आणि मी का विचार करावा? त्या हरामखोराला याचे परिणाम भोगायला हवेत, पण ते तुला भोगायला लागतायत."

ती गुढघ्यात मान घालून रडतरडत सगळं ऐकत होती. तिचे आईबाबा पण ऐकत होते. या विषयावर तेसुद्धा तिच्याशी इतकं थेट बोलत नव्हते. कधी बोललेच तर, फार वाईट झालं, पण आता इलाज नाही, भोगावं लागेल. अशा स्वरूपाचं. तिची काहीच चूक नाही, आणि तिच्या सन्मानाला धक्का पोचलेला नाही हे त्यांनीसुद्धा कधी तिला सांगितलेलं नव्हतं. त्यांना स्वतःची पण लाज वाटत होती. बाकी सगळ्यांनी नाक मुरडली तेव्हा ते ताठ मानेने का नाही वावरले? आमच्या मुलीची काही चूक नाही, आणि आम्ही तिच्या पाठीशी आहोत ह्याची जाणीव त्यांनी तिला आणि सर्वांनाच करून द्यायला हवी होती. 

तो बोलतच गेला. 

"त्या लोकांनी तुला उपभोग्य वस्तू म्हणून पाहिलं. आणि तुझा वापर करून सोडून दिलं. पण नंतर मी तुला सोडलं, तेव्हा कृती मध्ये नाही पण विचारांमध्ये मी पण त्यांचीच पातळी गाठली होती. मला हे लक्षात आलं तेव्हा माझी मलाच शरम वाटली."

त्याच्या डोळ्यातून पण पाणी यायला लागलं होतं. तो तिच्या जवळ जाउन बोलायला लागला. 

"तू वस्तू नाहीस. माणूस आहेस. माझ्या अगदी जवळची. मी चुकलो. खूप खूप चुकलो. मला माफ कर. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. एक माणूस म्हणून. एक मित्र म्हणून. माझ्याशी लग्न करशील?"

ती काही न बोलता रडतरडतच त्याच्या मिठीत शिरली. तिच्या आईबाबांसमोर. आजवर पहिल्यांदाच. पण त्यांनाही काही वाटलं नाही. त्यांनीसुद्धा एकमेकांचा हात घट्ट धरून ठेवला होता.

ती आणि तो : भाग ४

(भाग १) (भाग २) (भाग ३)
त्याने तिला नंतर बऱ्याचदा फोन केले, मेसेज केले, पण तिने एकदाही उत्तर दिलं नाही. आणि तिने फोन उचलला असता तरीही बोलायचं काय, हे त्यालाही माहित नव्हतं. त्याला फक्त बोलावं वाटत होतं तिच्याशी. त्याने काही निर्णय घेतलाच नव्हता. त्याचा संभ्रम पाहून तिनेच चिडून त्याला मोकळं करून टाकलं होतं. 
त्याला मोकळं व्हायचं होतं कि नव्हतं हेहि त्याला माहित नव्हतं. 

तिच्या उत्तर न देण्यामुळे त्याचे फोन मेसेज कमी होत होत बंदच झाले. तो पूर्ण सैरभैर झाला होता. जशी आधीची बातमी सगळीकडे पसरली होती, तसंच त्यांचं लग्न मोडल्याची बातमी पण सगळीकडे पसरली होती. त्याच्या ऑफिसमध्ये आता त्याला देवदास समजायला लागले होते. आणि काही मुलींचा त्याच्यावरचा राग सुद्धा लपून राहत नव्हता. 

कोण पसरवतात असल्या गोष्टी? तो विचार करत होता. कोणाच्या घरी लग्नाचे मुलगे मुली आहेत, लोकांची लफडी, लग्न जमणं, मोडणं असल्या गोष्टी आपोआप सगळीकडे पसरतात. लोकांना उद्योग नाहीत का दुसरे? त्याच्या लक्षात आलं कि तोसुद्धा बऱ्याचदा अशा गप्पांमध्ये असायचाच. पण आता त्या गॉसिपचा विषय तो झाला होता. म्हणून त्रास होत होता. 

त्या बलात्कार करणाऱ्या लोकांनी ती तो, असं सगळ्यांचंच आयुष्य बिघडवलं होतं. त्याने मनातल्या मनात त्यांना खूप शिव्या दिल्या. त्यांचा पत्ता लागला असता, तर त्याने त्यांचा जीव घेतला असता, इतका राग त्याच्या मनात हॉस्पिटलमध्ये हे सगळं समजल्यापासून होता. 

इकडे ती पण हल्ली फार चिडचिडी झाली होती. तिला लोकांच्या नजरांचा, सहानुभूतीचा आधीच वीट आला होता. पण आईबाबा, तो सोबत होते म्हणून ती शांत राहायचा प्रयत्न करत होती. पण लग्न मोडल्यानंतर या सगळ्यात भरच पडली. आई बाबा हताश झाले होते. त्यांना आता कुठेही येणंजाणं नको वाटत होतं. आणि तिचा राग सगळीकडेच बाहेर पडत होता. 

करणारा गुन्हा करून मोकळा झाला होता. पण ती मात्र त्या दिवसापासून शिक्षा भोगत होती. तिची सहनशक्ती आता संपत चालली होती. पुन्हा एकदा तिच्या मनात आत्महत्येचे विचार घोळायला लागले होते. 

त्याचं कामात लक्षतर लागत नव्हतं. पण तरी त्याने जास्तीत जास्त वेळ कशात तरी गुंतून राहायचा प्रयत्न चालवला होता. कारण रिकामा बसला कि तिचा विचार काही मनातून जात नव्हता. आपण केलं ते बरोबर आहे का, हि अपराधी भावना त्याचं मन पोखरत होती. या प्रश्नावर उत्तर काही केल्या मिळत नव्हतं. 

त्यांचं एकमेकांवर खूप प्रेम होतं. एकमेकांच्या अवघड प्रसंगी दोघांनी चांगली सोबत केली होती. मग आताच का? 

त्याचे आई बाबा म्हणत होते ते खरंच होतं. तिच्याकडे पहायचा सगळ्यांचाच दृष्टीकोन पूर्वग्रहदुषित होता. ती घरात आली असती तर सध्या जसं तिच्या घरी सगळ्यांनी येणं जाण कमी केलं होतं तसंच त्याच्या नातेवाईकांनी संबंधितांनी त्यांच्या घरावर अघोषित अस्पृश्यता लादली असती. 

पण तिची काय चूक होती या सगळ्यात? काहीच नाही. पण तरिहि... जे होतं ते असं होतं. मग त्याच्यात हिम्मत नव्हती का सगळ्यांच्या विरोधात उभं रहायची?

त्याने एक दोनदा त्याच्या मित्रांशी बोलायचा प्रयत्न केला. पण तेही काही समाधानकारक सांगू शकले नाहीत. 

"बघ यार, तुझ्यावर आहे. तुझे आई बाबा नाराज होतील. नातेवाईक चिडतील. मग तू काय करशील?"

थेट तसं न बोलता ते जे चाललंय ते चालू दे हेच सांगत होते. पण त्याची घालमेल थांबत नव्हती. 

दिवस नुसतेच चालले होते. तिच्या आई बाबांनी आता तिच्या लग्नाचं मनावर घेतलं. निदान त्यानेतरी सध्याची परिस्थिती बदलेल अशी त्यांना आशा होती. पण काही चांगलं स्थळ सांगून येईच ना! त्यांनी सगळ्या नातेवाईकांना सांगून ठेवलं. पण त्यांची प्रतिक्रिया पाहूनच त्यांची किती मदत होणार आहे हे लक्षात यायचं. 

त्यांचा हा खटाटोप पाहून ती आणखी चिडत होती. मला लग्नच नको, असं म्हणून ती वाद घालायची. 

आणि जे काही एकदोन ठिकाणाहून स्थळ येत होते, त्यात वयस्कर, लग्न न जमलेले असे कोणालाही पसंत पडत नव्हते. त्यामुळे आईबाबांना आता यातून मार्ग कसा निघणार हेच दिसत नव्हतं. 

काही दिवसांनी त्याचं ऑफिसमध्ये प्रमोशन झालं. एरवी तो आनंदाने नाचला असता. पण तो त्या मूडमधेच नव्हता. त्याला आधी अशी प्रत्येक छोटी गोष्टसुद्धा  कधी एकदा  तिला सांगतो असं व्हायचं. 

आणि मग ती कौतुकाने "वाह रे मेरे शेर" असं काही म्हणायची, तेव्हा कुठे त्याला त्या गोष्टीचं सार्थक वाटायचं. 

आतापण त्याच्या मनात आलं कि तिला फोन करून सांगावं. पण फोनकडे बघून त्याने नुसताच उसासा सोडला. एक मित्र म्हणून सांगायला तरी काय हरकत होती? पण तिचं बरोबर होतं. असा हात सोडून देणाऱ्याला मित्र म्हणून तरी कसं स्वीकारणार?

आपलं इतकं छान नातं तुटलं म्हणून तो आणखी दुःखी झाला. त्या बलात्कारी लोकांचा त्याला अजून राग आला. पण हे नातं तर त्यांनी तोडलं नव्हतं. ते त्याच्याचमुळे तुटलं होतं. त्या बलात्काराचा त्यांच्या नात्यावर परिणाम त्यानेच होऊ दिला होता. 

त्याचे ऑफिसातले मित्र त्याच्या अवतीभवती अभिनंदन करायला जमले. आणि त्याची विचारांची लिंक तुटली. ते त्याला ऑफिसनंतर जबरदस्ती पार्टी करायला घेऊन गेले. तो अजिबात मूडमध्ये नव्हता. पण त्याने उसनं अवसान आणून वेळ मारून नेली. 

घरी तो रात्री पुन्हा विचार करत बसला. त्याने नेमकं का नातं तोडलं होतं? तिच्यावर बलात्कार झाला. पण त्याला का प्रोब्लेम होता नेमका? तिची काही चूक नव्हती हे त्याला माहीतच होतं. मग काय?

बलात्कार. जबरदस्तीने केलेला सेक्स. हा प्रोब्लेम होता? सेक्स तर आधी त्याने पण केला होता. मग त्याला या मुद्द्यावर नाही म्हणायचा काय अधिकार होता? 

पण तिच्यावर बलात्कार झाला होता. तिची काही चुकही नव्हती. त्याच्या डोक्याचा भुगा होत होता विचार करून. 

त्या रात्री तिचा अपघात झाला असता... तिने हात पाय गमावले असते, चेहऱ्यावर व्रण राहिले असते तरी त्याने क्षणभरहि  विचार न करता तिची सोबत केली असती. कदाचित तिनेच विरोध केला असता. त्याच्यावर तिचं ओझं होऊ नये म्हणुन. ती खूप स्वाभिमानी होती. पण मग आता तिने असं नेमकं काय गमावलं होतं, कि त्यामुळे तो तिला स्वीकारू शकत नव्हता? 

अब्रू? पण समाजात लफडी करणाऱ्याला अब्रू आहे. पैसे खाणाऱ्याला अब्रू आहे. वेश्येकडे जाणाऱ्याला अब्रू आहे. बेताल वागणाऱ्या स्त्रीपुरुषांना अब्रू आहे. मग तिलाच का नाही? अब्रू तर त्या बलात्कार करणाऱ्याची जायला हवी होती. पण त्याचा काही पत्ताच नाही. विचार करता करता त्याला झोप लागली.

भाग ५

ती आणि तो : भाग ३

(भाग १) (भाग २)
काही दिवस असेच गेले. तिने आता ऑफिसला जायला सुरुवात केली होती. जाताना येताना, ऑफिसमध्ये सगळ्यांच्या बदललेल्या नजरा तिच्या लक्षात येत होत्या. काहीजण सहानुभूतीने वागत होते. काही जण तुच्छता दाखवत होते. त्यात काही स्त्रियापण होत्या. अगदी मोजके काहीजण काही झालं नाही असं दाखवून तिच्याशी आधीसारखं वागायचा प्रयत्न करत होते. 

ती तो, तिचे घरचे यापैकी कोणीही बाहेरच्यांना खरं काहीही सांगितलेलं नसलं तरी सगळ्यांनाच सर्व काही कळलेलं होतं. कसं काय कोणास ठाऊक. 

तिलाच काय, तिच्या बाबांना आणि त्याला ऑफिसमध्ये, तिच्या आईला सोसायटीमध्ये असाच अनुभव येत होता. सगळ्यांचीच वागणूक बदललेली होती. काहीजण त्यांना उघडपणे टाळत होते. 

एक दिवस तिच्या बॉस, आणि एच.आर. मधला एकजण, यांनी तिला मिटिंग रूम मध्ये बोलवून थोडा वेळ चर्चा केली. त्यांनी तिला सांगितलं कि, तुझ्यासोबत काय झालं याची आम्हाला कल्पना आहे. पण आम्ही तुझ्यासोबत आहोत. तुझी नोकरी पूर्णपणे सुरक्षित आहे. आपली कंपनी पुढारलेल्या विचारांची आहे. तू बिनदिक्कत इथे काम कर, आणि काही अडचण असेल तर आम्हाला येउन सांग. 

तिला मनात वाटत होतं, नोकरी सुरक्षित आहे म्हणजे काय? अशा मुलींना नोकरीवरून काढण्याचा पर्याय असतो कि काय कंपनीकडे? उपकार थोडीच करत आहेत हे माझ्यावर? आणि असे पुढारलेले विचार असतील तर ते असे स्वतःचीच पाठ थोपटून दाखवायचे कशाला? पण ती हे उघडपणे बोलली नाही. उलट नंतर तिला त्यांनी पाठींबा दिल्याचं बरंच वाटलं. कारण ऑफिस मधले काही लोक तिच्याशी नीट वागत नव्हते. ती त्यांच्या टीममधून निघून जावी, असंच त्यांचं वर्तन होतं. पण ती अशा दबावाला बळी पडणार नव्हती. आणि त्यांच्या पाठींब्याने तिचा धीर वाढला होता. 

नाईलाजाने त्यांनी हळूहळू याची सवय करून घेतली. हा नशिबाचाच भाग अशी त्यांनी स्वतःची समजूत काढली. तिने खूप धीर आणि हिम्मत दाखवली होती. ते तिला एका मानसोपचारतज्ञाकडे न्यायचे. त्याने सुद्धा तिचं कौतुक केलं. खूप कमी मुली यातून इतक्या लवकर बाहेर पडतात, आणि नव्याने जगायला सुरु करतात. खूपजणी आत्महत्या करतात. पण तुमची मुलगी खूप धीराची आहे, असं सांगून त्याने तिची पाठ थोपटली. 

खरं सांगायचं तर आत्महत्येचा विचार तिच्या मनात सुद्धा येउन गेला होता. पण आईबाबा आणि तो, त्यांच्याकडे बघून तिने तो दूर केला होता. 

सावकाश गाडी रुळावर येत होती. आणि एक दिवस तिच्या आईबाबांनी लग्नाचा विषय काढला. त्यांना आता लवकर सगळं उरकलेलं बरं असं वाटत होतं. त्याने काहीतरी थातूरमातुर उत्तरं दिली. हे तिच्या लक्षात आलं आणि तिने त्याला वरच्या खोलीत नेलं आणि विचारलं. "काय चाललाय तुझ्या मनात?"

"काही नाही."

"खोटं बोलू नकोस. समजतं मला. आई बाबांनी आत्ता विषय काढला, तर नीट काही बोलला का नाहीस?"

"अगं तसं काही नाही."

"मग कसं?"

"अरे म्हणजे घाई काय आहे? आपण विचार करूयात ना."

"विचार कसला? आपण दोन्ही आई बाबांना सांगितलेलं आहे. आणि ठरलं होतं न आपलं. अजून काय विचार करायचाय?"

तो शांत राहिला. 

"अरे आई बाबांना आता लवकर सगळं मार्गी लागावं असं वाटतंय. काही प्रोब्लेम आहे का? काय झालंय?"

"आईबाबा म्हणत होते कि पुन्हा विचार कर म्हणून."

ती आता चिडली होती. तिला मनोमन याची अपेक्षा होतीच. 

"त्यांना मी सून म्हणून नकोय का? मग तुझा काय विचार आहे?"

"माहित नाही. मला वेळ लागेल विचार करायला."

"माहित नाही? आणि वेळ लागेल काय वेळ लागेल. तुलापण उष्टावलेली मुलगी बायको म्हणून चालणार नाही वाटतं."

"असं नको बोलूस यार."

"असंच आहे ते. असं काही आहे तर उघड उघड सांगत का नाहीस?"

"अवघड आहे हे सगळं. आई बाबा एक म्हणतायत. मला माझं काही कळत नाहीये."

"या सगळ्यात माझ्यापेक्षा अवघड आहे का तुला काही?"

तो पुन्हा शांत राहिला. 

"माझ्याशी लग्न केलंस तर तुला बायको म्हणून लाज वाटेल का माझी?"

"असं अपमानास्पद नको बोलूस ना."

"अपमान तू करतोयस माझा."

"आपण मित्र म्हणून तर आहोतच ना, एकमेकांच्या सोबत."

ती आता खूप संतापली होती. "तुझ्या सारखा मुलगा मला मित्र आणि काहीही म्हणून नकोय आयुष्यात."

त्यांचा आवाज ऐकून आईबाबापण वर आले होते. 

"निघ इथून. आणि परत येऊ नकोस कधी."

"अगं ऐक तर. समजून घे ना जरा. मला विचार तरी करू दे."

"काही विचार करू नकोस. माझा विचार झाला आहे, तू नको आहेस मला. माझ्यावर बलात्कार करणाऱ्या त्या हरामखोरांपेक्षा तूच जास्त दुखावलं आहेस मला. बाबा याला जायला सांगा इथून. आमचं लग्न होणार नाही."

त्यांनी बोलून दाखवलेलं नसलं तरी हि भीती कधीची त्यांच्या मनात होतीच. तो मान खाली घालून निघून गेला.

(भाग ४)

ती आणि तो : भाग २

(भाग १)

तिला शुद्ध आली तेव्हा त्यांनी तिला जवळ घेतलं. ती रडायची थांबत नव्हती. तिला पुन्हा झोपवलं. आणि दुसऱ्या दिवशी घरी घेऊन गेले. 

काही जवळचे लोक रात्रीच हॉस्पिटलमध्ये येउन गेले. पण त्यांना आणि बाकी सगळ्यांनाच असं  सांगितलं कि तिचा एक अपघात झाला. आणि तिला शुद्ध नव्हती म्हणून लवकर समजलं नाही. 

तिच्या अवस्थेकडे पाहून लोकांना शंका तर येत होती. पण कोणी उघडपणे बोलून दाखवलं नाही. पण जेव्हा घरी पोलिस येउन गेले तेव्हा त्यांच्या शंकांवर शिक्कामोर्तबच झालं. 

झालं असं होतं कि ती तिच्या एका मैत्रिणीसाठी भेटवस्तू घ्यायला ऑफिसमधून घरी जाताजाता एका मॉलमध्ये गेली होती. तिथून निघाली तेव्हा पार्किंगमधेच कोणीतरी तिला मागून मारलं आणि गाडीत घालून कुठेतरी नेलं. तिच्या अर्धवट शुद्धीत तिने प्रतिकार करायचा बराच निष्फळ प्रयत्न केला. ते दोनजण होते एवढंच तिला आठवत होतं. त्या पुढचं तिला काहीच सांगता येत नव्हतं. हे एवढं सांगतानासुद्धा ती हमसून हमसून रडायला लागली होती. 

या वर्णनावरून पोलिसांना तपासात काहीच मदत झाली नाही पण तरी आम्ही शोध घेऊ आणि काही तपास लागला कि कळवतो असं आश्वासन त्यांनी दिलं. 

ती महिनाभर कुठेहि बाहेर गेली नाही. तिचा अपघात झालाय, मुका मार लागलाय आणि डॉक्टरांनी आराम करायला सांगितलाय असं त्यांनी ऑफिसमध्ये आणि सगळीकडेच सांगितलं. पण तिला घरी भेटायला येणाऱ्यांचा यावर विश्वास बसत नाही हे लगेच कळायचं. 

तो रोज ऑफिसनंतर तिला भेटायला जायचा. गप्पा मारायचा. तिला रडू आलं कि समजावून सांगायचा. पण कितीही समजावलं तरी कोणाचीच पुरती समजूत निघत नव्हती. 

त्याचे आईबाबा तिला भेटायला म्हणून गावाकडून आले होते. ते तिच्या घरी गेले तेव्हा तिच्या आईबाबांना काय बोलावं तेच समजत नव्हतं. अगदी अवघडल्यासारखे सगळे शांत बसले होते. ती त्याच्या आईला बिलगली आणि रडायला लागली. त्यांनी तिला धीर दिला. सगळं ठीक होईल असं सांगितलं. थोडा वेळ बसून ते निघाले. 

त्याच्या घरी पोचले तेव्हा त्याचे आई बाबा एकमेकांना काहीतरी खाणाखुणा करत होते. काहीतरी बोलायला ते संकोचत होते. 

शेवटी त्यानेच विचारलं "काय झालंय?"

आईने धीर केला, आणि विषयाला सुरुवात केली "मग आता काय विचार आहे तुझा?"

"कशाबद्दल?"

"अरे कशाबद्दल काय? लग्नाबद्दल."

"आई हि काय वेळ आहे का हा विषय काढण्याची. तिची तिच्या घरच्यांची अवस्था तू बघून आलीस ना?"

"अरे, तेच. तिच्याशी लग्न करायचं का यावर काय विचार आहे तुझा. तुम्ही सांगितलं नाही म्हणून काय आम्हाला काय झालंय समजत नाही का? आता अशा मुलीला आपण सून म्हणून कसं घरात घेणार?"

"अशी मुलगी म्हणजे? तिने काय केलंय."

"ते तू आम्हाला शिकवू नकोस. लोक काय बोलतील आपल्या कुटुंबाबद्दल?"

"मी असा विचार नाही केला अजून."

"मग कर. करावाच लागेल विचार. तुला स्वतःला तरी चालेल का अशी बायको? हे जे झालंय ते विसरू शकणार आहेस का तू?"

तो काहीच बोलला नाही. 

"बघ बाबा, नीट विचार कर. आणि तुझं काहीका ठरेना, ती आम्हाला आमच्या घरात चालणार नाही एवढं आत्ताच सांगून ठेवते. थोडी चांगली वेळ बघ, आणि त्यांच्या घरी जाऊन सांग, हे यापुढे काही जाणार नाही म्हणून."

त्याला प्रश्नात पाडून ते निघून गेले. तसं त्यांनी काही नवीन विचारलं नव्हतं. हा प्रश्न त्याच्या जवळच्या मित्रांनी सुद्धा आडूनआडून विचारून झालेलाच होता. आईने थेट मुद्द्याला हात घातला इतकंच. आणि त्याच्या स्वतःच्या मनात काय होतं, हे त्याला काहीच कळत नव्हतं.

भाग ३

ती आणि तो : भाग १

रात्रीचे १० वाजून गेले होते. तो एक फिल्म बघत बसला होता. आता थोड्यावेळात तिला एक कॉल करायचा, थोडा वेळ गोड गप्पा मारायच्या आणि झोपायचं असा त्याचा बेत होता. पण तिच्या आईचाच कॉल आला आणि तो दचकला. आईंचा कॉल आणि तोसुद्धा यावेळी. तसं त्या दोघांबद्दल दोघांच्याही घरी माहित होतं. घरचं वातावरणपण मोकळं होतं. दोघांच्या आईवडिलांनी त्यांच्या नात्याला मंजुरी देऊन टाकली होती. आता त्या दोघांनी तयारी दाखवल्यावर पुढचा कार्यक्रम ठरवायचा होता. 

आता तिची आई साखरपुड्याची घाई करायला सांगेल कि काय या शंकेने त्याने फोन उचलला. 

"अरे तुम्ही दोघं सोबत आहात का? हि अजून घरी नाही आली. फोन करून सांगत तरी जा रे. काळजी वाटते."

"नाही काकू. मी तर घरी आहे माझ्या. ती ऑफिसमध्ये असतानाच आमचं बोलणं झालं. कुठे जायचं बोलली तर नव्हती. तिला फोन करून बघतो कुठे आहे."

"अरे तिचा फोन कधीचा बंद लागतोय. म्हणून तर तुला केला मी."

"ठीके काकू. काळजी करू नका. मी तिच्या टीममधल्या लोकांना फोन करतो. त्यांना माहित असेल ती ऑफिसनंतर कुठे गेली असेल तर."

त्याने लगेच त्याच्याकडे तिच्या ऑफिसमधले जेवढे नंबर होते त्या सगळ्यांना कॉल करून पाहिला. तिच्या जवळच्या मैत्रिणी, ग्रुपमधले सगळे झाले. कोणालाच माहित नव्हतं. एव्हाना ११ वाजून गेले होते. आता त्यालापण काळजी वाटायला लागली होती. तो तडक तिच्या घरी गेला. ती अजून पोचलेली नव्हतिच. तिचे आईबाबा दोघे प्रचंड टेन्शनमध्ये होते. सांगून गेली असती तर त्यांना काही काळजी वाटली नसती. पण तिने काही सांगितलं सुद्धा नव्हतं, आणि कोणाला तिच्याबद्दल माहित सुद्धा नव्हतं. आतापर्यंत त्यांचापण शहरातल्या सगळ्या नातेवाईकांना फोन करून झाला होता. 

तो आणि तिच्या बाबांनी पोलिसात जायचं ठरवलं. तिची आई रडायलाच लागली, आणि मीपण येते म्हणून हट्ट धरून बसली. कसंबसं त्यांनी तिला शांत केलं. ती घरी आली तर, काही फोन आला तर कोणी तरी घरी असायला हवं असं तिला समजावून सांगितल. तिला सोबतीला म्हणून शेजारच्या वहिनींना झोपेतून उठवून आणलं. आणि ते निघाले. 

पोलिसांकडे ती हरवल्याची तक्रार नोंदवली. पोलिसांचे सर्व प्रकारचे वाकडेतिकडे तिरकस प्रश्न विचारून झाले. तो चिडला होता, पण बाबांनी त्याला शांत केलं. काही कळलं कि सांगतो हे पोलिसांचं आश्वासन ऐकून ते निघाले. पोलिसांशी अजून बोलून उपयोग नव्हता. 

त्याला अचानक सुचलं, आणि त्यांनी जवळपासच्या हॉस्पिटल मध्ये शोध घेतला. रात्रीच्यावेळी कसलीही माहिती लवकर मिळत नव्हती. त्यांनी पोलिसांकडे परत चौकशी केली. पण एखाद्या मुलीच्या अपघाताची कसलीही बातमी त्यांच्याकडे पोचली नव्हती. 

जाताना ते तिचं ऑफिस ते घर, त्याचं घर असं सगळंच फिरून आले. पण उपयोग शुन्य. तो त्यांच्यासोबत त्यांच्याच घरी गेला. रात्रभर कोणालाही झोप आली नाही. सकाळी शेजारच्या काकू धीर देऊन घरी गेल्या. 

तो आणि बाबा चहा नाश्ता जबरदस्ती पोटात ढकलून बाहेर पडले. दोघांनी ऑफिसमध्ये सुट्टी टाकली होती. त्यांनी पुन्हा एकदा जवळपासचे हॉस्पिटल पालथे घालायला सुरुवात केली. तिचा कुठेच ठावठिकाणा नव्हता. घरी बसून आई आणखी त्यांच्या,तिच्या सगळ्या ओळखीच्या लोकांची यादी करून फोन करत होत्या. 


शेवटी अकरा-बाराच्या सुमारास पोलिसांचाच फोन आला. एक मुलगी शहराच्या बाहेरच्या भागात बेशुद्ध अवस्थेत सापडली होती. तिला तिकडच्याच एका हॉस्पिटलमध्ये नेलेलं होतं. तिचं वर्णन त्यांनी दिलेल्यासारखंच होतं. ती मुलगी पूर्ण शुद्धीवर आली नव्हती. त्यामुळे ओळख पटवायला त्यांनी तिकडे बोलावलं होतं. मनोमन प्रार्थना करत ते तिकडे निघाले. 

कालपासून ज्या ज्या लोकांना फोन केले होते, त्या सगळ्यांचे फोन चालुच होते. त्यांना उत्तर देता देता ते कंटाळले होते. घरी आईंची पण तीच परिस्थिती होती. 

तिकडे पोचले तेव्हा रूमच्या बाहेरच डॉक्टर आणि पोलिस भेटले. त्यांनी तिला पाहताक्षणीच ओळखलं. अंगभर जखमा दिसत होत्या. त्यांना नुकतीच मलम पट्टी केलेली दिसत होती. तिला तसं पाहूनच ते व्यथित झाले. हि आमचीच मुलगी असं त्यांनी पोलिसांना सांगितलं. 

डॉक्टरांनी त्यांना सांगितलं, कि ती अशा जखमी आणि बेशुद्ध अवस्थेत सापडली होती. लोकांनी तिला इथे दाखल केलं. आणि तिला अगदी थोडा वेळ शुद्ध येउन गेली. पण ती काही सांगण्याच्या मनस्थितीत नव्हती. तिच्यावर प्राथमिक उपचार आणि चाचण्या करून झाल्या होत्या. तिच्यावर बलात्कार झाल्याचं स्पष्टच होतं. त्यांनी तिला झोपेचं औषध देऊन झोपवलं होतं. तिला जाग आल्यावर सर्व काही ठीक वाटलं तर ते तिला घरी जाऊ देणार होते. 

पोलिसांना आतापर्यंत तिचा जबाब नोंदवता आला नव्हता. पण डॉक्टरांनी त्यांचे निष्कर्ष त्यांना सांगितले होते. आणि तिचे रिपोर्ट्स आले कि त्याची प्रत पोलिसांना पण पाठवली जाणार होती. तिला जाग यायला बराच वेळ असल्याने पोलिसांनी तिचा जबाब नोंदवायला घरी यायची तयारी दाखवली. आणि ते गेले. 

त्यांनी आईला फोनवर ती सापडल्याचं तेवढं सांगितलं. आणि हॉस्पिटलचा पत्ता देऊन तिचे कपडे घेऊन यायला सांगितलं. त्या ताबडतोब निघाल्या.

आता हळू हळू त्यांना काय झालंय याची जाणीव व्हायला लागली. आई पोचल्या तेव्हा हि बातमी ऐकून त्या कोसळल्याच. बाबांनी त्यांना सावरलं खरं. पण आतून ते पण खचले होते. तो तर इथे आल्यापासून एक शब्द सुद्धा बोलला नव्हता. 

भाग २

Tuesday, April 8, 2014

Being A Fan

Last Sunday, India lost T20 Cricket World Cup to Sri Lanka. Yuvraj Singh played a slow inning and was blamed for the low score of 130 for India, which resulted in a loss of final match. While watching the match, I was like many others impatiently hoping and shouting for Yuvraj to play a four or a six, or at least rotate the strike to in-form batsman Virat. During the Lanka's innings the match was clearly nearing Lanka's win, and the jokes targeting Yuvraj went viral on whatsapp, facebook, twitter.

I laughed at few jokes, and went to sleep. For me the topic was over. But it wasn't for the world, and many "fans" of cricket. They kept cracking jokes, kept criticizing. Indian skipper M S Dhoni was tired answering questions regarding Yuvraj. His remarks that “it's a team game, and one person, one bad day should not be held responsible” were ignored. Some "fans", didn't stop here, they went to Yuvraj's home and attacked with stones. Police had to provide security for Yuvraj's family.

Do we really deserve to be called as fans? If we take pride in the victories of our sports team, shouldn't we support them in tough times?

When Indian team was knocked out of world cup in 2007, some extreme fans attacked and destroyed the ongoing construction of new house for M S Dhoni. He had said that he will definitely win world cup, and he with his team did it in next one. People in every city were out on streets dancing, celebrating whole night when India won world cup. 

When team does well, we celebrate, as if we have done that, it’s our own victory. Then why the loss is only of the team or the player? Moreover do we have any right to punish players for poor performance like that? We must ask one simple question to ourselves, can we play cricket as good as those players, selected after much struggle? If yes, why are we not in the team, and if no, how can we punish people for not doing a thing that we ourselves can't. 

Some of those extreme fans might answer that it’s their (player's) job to play for India, they are paid for it. Yes, it's their job, and they are humans. Are we always perfect in our own jobs? We also make mistakes. We also perform terribly sometimes, and our team at work may suffer sometimes because of us. Imagine if in such time, jokes about you and your performance are shared by your boss, colleagues on social media. It would not be as big as Yuvraj, Ishant Sharma's viral jokes, but certainly your image in your circle would be dented. If you did something wrong, and your house/family is attacked, would you bear that threat?

Players in any sport are just doing their job. Like any other profession, they will have good and bad phases in their career. Sports and players come before the fans, if there are no players, there will not be any fans. We must understand our limits. We admire the game, we love our players, but we don't own them.

They come up in the national scenario after a lot of struggle and competition. They reach where they are because they have some talent. Fans do have important role, but you can become fan of someone only when you see him doing good, that someone is not bound to do good just because you are his fan. That's the natural order.

Yuvraj Singh for one, has played crucial role in India's win in many tournament's including 4 world cups (Under 15,19, T20, ODI). Great players, like Harbhajan, cricketing legend Sachin Tendulkar have come forward to support Yuvraj. And other players too who have faced this situation like Ishant Sharma, R Jadeja have played both well in many matches for India.

Let's understand what it is being a fan, and support our players to achieve glory for Indian sports.