Thursday, November 28, 2019

चोपता चंद्रशिला तुंगनाथ ट्रेक : ५ : ऋषिकेश रिव्हर राफ्टिंग

या सहलीतील अनुभवावर या आधीच्या पोस्ट्स पुढीलप्रमाणे

चोपता चंद्रशिला तुंगनाथ ट्रेक : १ : हरिद्वार
चोपता चंद्रशिला तुंगनाथ ट्रेक : २ : हरिद्वार - सारी - देओरीया ताल
चोपता चंद्रशिला तुंगनाथ ट्रेक : ३ : देओरीया ताल - बनियाकुंड
चोपता चंद्रशिला तुंगनाथ ट्रेक : ४ : चंद्रशिला शिखर आणि तुंगनाथ

---

ऋषिकेशला सकाळी आम्ही ज्या हॉटेलमध्ये थांबलो होतो तिथे फार मोठी समस्या झाली. खरंतर ते हॉटेल म्हणजे एक हॉस्टेल होतं. ऋषिकेशमध्ये हॉटेलइतकेच होस्टेल आहेत.

या हॉस्टेलमध्ये सिंगल बेड, डबल बेड, बंक बेड, हॉल आणि किचन सामाईक वापरासाठी आणि बेडरूम स्वतंत्र भाड्याने अशा अनेक प्रकारच्या व्यवस्था आहेत. स्वस्त भाड्यामुळे भटकंती करणाऱ्या तरुणांमध्ये हे युथ होस्टेल बरेच लोकप्रिय आहेत.

आम्ही जिथे थांबलो होतो (दि अननोन प्लेस) तिथे सेवा खूपच वाईट होती. इतक्या मोठ्या होस्टेलमध्ये रात्रीच्या वेळी फक्त एकच माणूस थांबला होता.

पहाटे जेव्हा आम्ही आवरायला उठलो तेव्हा आमच्या रूममध्ये पाणीच बंद झालं. आम्ही खाली गेलो तेव्हा ऑफिससमोर आणखी लोक जमले होते. आणि तो मुलगा ऑफिसचं दार बंद करून आत ढाराढूर झोपला होता.

आम्ही सकाळी लवकरच राफ्टींग बुक करून ठेवली होती. जेणेकरून राफ्टिंग लवकर संपून आम्हाला उरलेला दिवस फिरायला मिळेल. पण पाणी नसल्यामुळे आम्हाला आवरायला मोठा अडथळा निर्माण झाला.

खूपदा दार वाजवल्यावर शेवटी तो मुलगा उठला. आणि उद्धटपणे उत्तरे द्यायला. पाणी कधी येईल, मागवलं आहे का, हे काहीच नीट सांगत नव्हता. "त्याने पाणी येईल तेव्हा येईल" असं उर्मट उत्तर दिलं.

"मला काहीच माहिती नाही मालकाशी बोला" असं म्हणून मालकाचा नंबर दिला आणि पुन्हा दार बंद करून आत निघून गेला.

मालक काही फोन उचलत नव्हता. आणि लोक ऑफिसच्या दारावर धाडधाड वाजवत होते.

आम्ही शेवटी राफ्टिंगवाल्याला फोन करून थोडा उशिरा येऊ असं सांगितलं. आम्हाला त्यादिवशी राफ्टिंग आणि जमलं तर बंजी जम्पिंग एवढंच करायचं होतं.

पण बाकी काही बिचार्यांचे मात्र प्रवासाचे बेत होते. थोड्याच वेळात त्यांना निघायचं होतं. त्यांची फारच गैरसोय झाली. एक आजी तर त्या मुलाच्या नावाने खुप ओरडत होत्या. त्यांच्या मुलाचं का नातवाचं पोट बिघडलं होतं. आणि तो आत असताना पाणी गेलं होतं. आता हे वाचुन ऐकून गंमतशीर वाटेल पण जो त्या परिस्थितीत असतो त्याची मात्र फार फजिती होते.

अर्ध्या एक तासाने थोडं थोडं पाणी नळाला यायला लागलं आणि पुन्हा संपायच्या आत आम्ही फटाफट आवरून निघालो. बाहेर एका ठेल्यावर पराठ्यांचा भरपेट नाश्ता केला.

मग राफ्टिंग एजंटच्या ऑफिससमोर येऊन थांबलो. ऋषिकेशमध्ये ढिगाने राफ्टिंगचे एजंट्स आहेत. खास करून तपोवनमध्ये. ऋषिकेशच्या मुख्य गावाजवळ तपोवन हा एरिया आहे इथे होस्टेल्स, राफ्टिंग आणि ऍडव्हेंचर ऍक्टिव्हिटी खूप आहेत.

राफ्टिंगची फीस अंतरानुसार असते. ९, १५, २३ असे वेगवेगळे पॅकेज असतात. जेवढं अंतर निवडाल तेवढं अंतर एका ट्रकमध्ये बसून रस्त्यावरून तपोवन पासून दूर जायचं. ह्या ट्रक/टेम्पो मधेच राफ्ट, वल्हे, कयाक, जॅकेट्स,  प्रवासी आणि गाईड असे सर्व जातात. मग हि राफ्ट हाताने उतरवून नदीपर्यंत घेऊन जावी लागते.



सर्व प्रवासी (जास्तीत जास्त ८) आणि एक गाईड राफ्टमध्ये बसतात. गाईड राफ्टच्या मधोमध बसून सर्वांना मार्गदर्शन करतो. दुसरा एक गाईड छोट्याशा एका माणसाच्या कयाकमध्ये बसून आपल्या राफ्टच्या आसपास राहतो. जर चुकून कोणी खाली पडलं किंवा काही झालं तर राफ्टवाला गाईड बाकी लोकांसोबत राफ्टमधेच राहतो. आणि कयाकवाला गाईड मदतीला जातो.

राफ्टिंग सुरु करण्याआधी गाईड सुरक्षेसंबंधी सर्व सूचना अगदी सविस्तर पद्धतीने देतो. ह्या सविस्तर सूचना ऐकून आमच्या ग्रुपमधल्या एक दोन जणांना भीती वाटली. त्यांनी आधी एवढा विचार केलेलाच नव्हता. पण गाईडचं बोलणं ऐकून हे पण होऊ शकतं ते पण होऊ शकतं असं सर्व ऐकून त्यांना भीती वाटली. पण आम्ही थोडा धीर दिला कि हे सांगणं तर त्यांचं कामच आहे. असं होईलच असं नाही. पण काही झालं तर आपल्याला माहित तर हवं काय करायचं. त्यांनी हिम्मत करून ते आलेच.

गंगेचा प्रवाह एकदम जोरदार असतो आणि पाणी महाथंड. तरी त्यामानाने राफ्टिंग सुरु केल्या केल्या प्रवाहाचा वेग थोडा कमी असतो. पण नंतर अतिजास्त वेगाच्या प्रवाहाचे काही क्षेत्र येतात, त्यांना रॅपिड म्हणतात. इथे प्रत्येक रॅपिडला एक नाव दिलेलं आहे. आमच्या गाईडच्या मते सर्वात जास्त डेंजर रॅपिड म्हणजे गोल्फ कोर्स.



सर्वच रॅपिड्समध्ये खूपच मजा आली. बोट प्रचंड हेलकावे खात वर खाली आपटत राहते, इकडून तिकडून थंड पाणी अंगावर येत राहतं. गाईड सतत ओरडत राहतो, फॉरवर्ड, बॅकवॉर्ड, स्टॉप, स्लो. त्याच्या सूचना पाळत पाळत वल्हे मारताना आपली त्रेधा तिरपीट होते.

थोड्या थोड्या अंतराने जिथे प्रवाह संथ आहे तिथे गाईड आपल्याला होडीला पकडून पाण्यात उडी मारायची आणि होडी जवळच तरंगण्याची परवानगी देतो. हे गंगेच्या पाण्यात डुंबणं मला सर्वात जास्त आवडलं. इतक्या थंड वाहत्या पाण्यात डुंबण्याची मजा शब्दात सांगण्यासारखी नाही. इतकं ताजं तवानं वाटतं आणि तिथून निघण्याची इच्छाच होत नाही.




मजा तर मजा आणि गंगेत नाहण्याचं पुण्य मिळतं ते वेगळंच. हरिद्वार सारख्या तीर्थक्षेत्रात इतकी गर्दी अंघोळ करत असते, अंग कपडे धूत असते कि तिथे पाण्यात शिरावं सुद्धा वाटत नाही. (तरी या वेळी खरंच फरक पडलेला दिसला हरिद्वार ला). इथे स्वच्छ पाण्यात कळतं नदीमध्ये स्नान इतकं पवित्र का मानलं गेलं असेल.

गोल्फ कोर्स रॅपिडजवळ एक छोटा अपघात घडला. तिथे लाटा इतक्या उंच उसळत होत्या कि एका क्षणी आमची बोट समोरून मागे पलटते कि काय असं वाटत होतं इतकी वर गेली. पण सुदैवाने आमची बोट वाचली. पण जवळच फिरणारी एक बोट उलटली आणि त्यातले २-३ लोक पाण्यात पडले. अचानक इतका कल्लोळ झाला कि काही काहीच कळेना. लाटांचा आवाज तर होताच.

त्यातलीच एक मुलगी क्षणात वाहत आमच्या बोटीला येऊन धडकली आणि तिने लगेच घट्ट आमच्या बोटीचा दोरखंड आणि मध्ये बसलेल्या समीरचा पाय धरून ठेवला. सगळे ओरडायला लागले. काही सेकंद नुसते ओरडण्यात गेले. कोणाला काही समजत नव्हतं. शेवटी समीरला गाईडने सुरुवातीला सांगितलेल्या पद्धतीने तिला ओढून आत आणता आलं. (ती सुरुवातीची माहिती कामी आलीच म्हणायची)

थोडा वेळ ती आमच्या बोटाच्या मध्यभागी बसून राहिली. ती इतकी घाबरली होती कि तिला काही बोलायला पण सुचत नव्हतं. गाईडने आणि आम्ही तिच्याशी बोलून वातावरण जरा हलकं केलं. मग ती जरा शांत झाली. पुढे एका सुरक्षित ठिकाणी ती तिच्या बोटमध्ये पुन्हा गेली.

राफ्टिंगला जी गर्दी असते त्याचा असा एक फायदा आहे. एका वेळी २-४ राफ्ट आणि कयाकवाले गाईड पाण्यात जवळपास फिरत असतात. त्यामुळे असं काही झालं तर मदतीला सर्वजण धावून येऊ शकतात.

राफ्टिंगच्या शेवटच्या स्टॉपआधी मॅगी पॉईंट आहे. का ते सांगायला नको. गरम मॅगी, चहा, पकोडे याचे बरेच ठेले तिथे लावलेले आहेत. तिथेच एका उंच खडकावरून लोक पाण्यात उद्या मारून क्लिफ जम्पिंगचा आनंद घेतात. आम्हाला आमच्या गाईडने पाण्याचा वेग खूपच वाढलेला असल्यामुळे ते न करण्याचा सल्ला दिला.

आयुष्यातला पहिला राफ्टिंगचा थरारक अनुभव घेऊन आम्ही परत निघालो. राफ्टिंगलाच बराच उशीर झालेला होता. त्यामुळे दिवस फारसा उरला नव्हताच. ऋषिकेशला येऊन उरलेला दिवस टाईमपास केला. लक्ष्मण झुला पाहिला. ह्यावर इतकी गर्दी का असते मला समजत नाही. हँगिंग ब्रिज इतर ठिकाणी सुद्धा खूप आहेत. हा पहिला वहिला असेल म्हणून कदाचित.

बंजी जम्पिंग आम्हाला करता आलं नाही. त्यासाठी पूर्व बुकिंग आवश्यक आहे. ऐन वेळेवर मिळण्याची शक्यता फार कमी आहे.

रात्री जेवणानंतर दिल्लीची बस पकडली, आणि सकाळी दिल्लीहून विमानाने आम्ही पुण्याला परत आलो.

हरिद्वारला खादाड भटकंती, चोपता चंद्रशिला ट्रेक आणि परतीच्या वाटेवर ऋषीकेशला रिव्हर राफ्टिंग अशी अविस्मरणीय सहल संपन्न झाली.




---

ह्या दिवशीचा थरार आणि हि संपूर्ण सहल तुम्ही माझ्या युट्युब चॅनलवर बघु शकता. लिंक खालील प्रमाणे.


Chopta Chandrashila Trek | Part 1 | A day in Haridwar
Chopta Chandrashila Trek | Part 2 | Haridwar Sari Deoria Tal
Chopta Chandrashila Trek | Part 3 | Deoria Tal to Baniya Kund
Chopta Chandrashila Trek | Part 4 | Tunganath Temple Chandrashila Summit
Chopta Chandrashila Trek | Part 5 | Rishikesh River Rafting | Thats My Take

आणखी व्हिडीओज बघण्यासाठी हे चॅनेल सबस्क्राईब करा. 

Saturday, September 21, 2019

चोपता चंद्रशिला तुंगनाथ ट्रेक : ४ : चंद्रशिला शिखर आणि तुंगनाथ

ह्या दिवशीचा वृत्तांत व्हिडीओद्वारे अनुभवण्यासाठी युट्युबवर जा : 
आणखी व्हिडीओस बघण्यासाठी हे चॅनेल सबस्क्राइब करा. 

या आधील वृत्तांत वाचा या ठिकाणी : 
बनियाकुंडला दिवसाची सुरुवात सुंदर झाली. आम्हाला सकाळी एकदम लवकर जाग आली. या भागात खुप लवकर उजाडतं. सूर्य उगवण्याही आधी इतका प्रकाश असतो कि सकाळचे ८-९ वाजलेत असं वाटतं. 

आमच्या रूम्स समोरच छोट्या टेकाडावर एक हनुमान मंदिर होत.



तिथून समोर हिमालयाच्या पर्वतरांगा दिसत होत्या. हळु हळू सूर्य आमच्या उजवीकडच्या डोंगरामागून वर येत होता आणि प्रकाशाची तिरीप आपला कोन बदलत खाली खाली येत होती. ह्या दृश्यांनी आम्हाला किती तरी वेळ तिथेच खिळवून ठेवलं होतं.




थोड्या वेळाने आम्ही आवरून नाश्ता करून निघालो. बनियाकुंड ते चोपताच्या पायथ्यापर्यंत आम्ही जीपने गेलो. एकच जीप तिथे पोहोचली होती त्यामुळे दोन चकरा करून जावं लागलं. 

चोपता चंद्रशिला तुंगनाथ असं या ट्रेकचं नाव आहे, आणि हे सगळं ह्या आजच्या दिवसातच आहे. चोपता गावातुन चढायला सुरुवात करावी लागते. आणि वर आधी तुंगनाथचं मंदिर लागतं.

हे मंदिर महादेवाच्या पंचकेदारांपैकी एक आहे. (म्हणजे काय ते विचारू नका. १२ ज्योतिर्लिंगांसारखी ५ महत्वाच्या मंदिरांची दुसरी यादी समजूया. कोणाला समजत असल्यास खाली कमेंटमध्ये आपलं ज्ञान पाजळण्यास हरकत नाही. तेवढीच सगळ्यांना मदत होईल. :-) ) केदारनाथ पण ह्याच पंचकेदारांपैकी एक आहे. 

तर, पंचकेदारांपैकी एक असल्यामुळे ह्याला विशेष महत्व आहे. हे मंदिर केदारनाथपेक्षाहि उंच आणि जगातलं सर्वात उंचावरचं महादेव मंदिर आहे. इथे यात्रेकरूंची संख्या बरीच असते. त्यांच्यासाठी भरपूर घोडे, खेचरं, पिठू इथे उपलब्ध आहेत. त्यामुळे खालुन वरपर्यंत चांगली दगडी पायवाट बनवलेली आहे.



तुंगनाथ मंदिरापर्यंत तर ट्रेकला आल्यासारखं वाटतच नाही. यात्रेकरू मध्ये पुष्कळ लोक घरातल्या लहान मोठ्यांसकट सर्व कुटुंबाला  घेऊन येतात. त्यामुळे यात्रेला आल्यासारखंच वाटतं. तसे सर्व वयाचे लोक कुटुंबासकट ट्रेकवरसुद्धा भेटतात, पण तिथे संख्या कमी असते. 

तुंगनाथ मंदिराच्या आणखी पुढे चढत गेलं तर चंद्रशिला शिखर लागतं. हे १३१०० फुटावरचं शिखर आहे. आणि चहूबाजूला हिमालयाच्या पर्वतरांगा पसरलेल्या दिसतात. उत्तराखंडात कुठल्याही जागेचं वर्णन असंच करता येईल. पण प्रत्येक जागेहून दिसणारं दृश्य वेगळं, प्रत्येक ठिकाणचं सौन्दर्य वेगळं. कमी जास्त अशी तुलना करण्यासारखं नाही. 

ह्या भागाला परमेश्वराने उदारहस्ते सौन्दर्य बहाल केलं आहे. कितीही बघितलं तरी डोळ्यांचं पारणं फिटत नाही. 

आणि हे दृश्य अगदी वर गेल्यावरच दिसतं असं नाही. आजच्या ह्या पूर्ण ट्रेकमध्ये जागोजागी वेगवेगळ्या उंचीवरून हीच सुंदर दृश्य आपल्याला खुणावत राहतात.




आम्ही प्रत्येक ठिकाणी फोटो काढत, थांबत चाललो होतो. एक दोन जणांची तब्येतसुद्धा बिघडली होती. त्यामुळे आमची गाडी आज जरा मंदावली होती. गाईड आम्हाला घाई करत होते. हळू हळू चालत आम्ही तुंगनाथला न थांबता आधी चंद्रशिलाला गेलो.




तुंगनाथच्या पुढेसुद्धा चंद्रशिलाला पोहचायला आपल्याला आपल्या वेगानुसार तास दीड तास लागू शकतो. हा पूर्ण ट्रेक १२-१३ किलोमीटर चा आहे. 

इथे शिखरावर आपल्याकडे कळसुबाईला जसं छोटं मंदिर आहे तसंच एक छोटेखानी गंगेचं मंदिर आहे.



वर पोहोचलो तेव्हा ढग यायला लागले होते . गाईड आम्हाला थोडं लवकर आला असता तर पूर्ण मोकळं आकाश आणि दृश्य बघायला मिळालं असतं अशी टोचणी लावत होता. पण येता येतासुद्धा आम्ही ह्या सौन्दर्याचा मनमुराद आनंद घेतला होता. 

शेवटी हिमालय माणसाच्या मनात मावणं अशक्य आहे. त्याची वेगवेगळी रूपं बघायला पुन्हा पुन्हा जाणं आपल्याला भाग आहे. 

आणि कुठलंही शिखर गाठल्यावर एक वेगळाच आनंद होतो. काही मिळवल्याचं समाधान मिळतं.



शिखरावर आम्ही बराच वेळ फोटो काढण्यात घालवला. सर्वांनाच त्या जागेवर ग्रुपचे, एकट्याचे, जोडीचे, वेगवेगळ्या कॉम्बिनेशनचे फोटो काढायचे होते. कोणाला एखादी पोज सुचली आणि दुसऱ्याला आवडली तर पुन्हा सगळ्यांचे त्या पोजमध्ये फोटो असं बराच वेळ चाललं होतं.



परत येताना आम्ही तुंगनाथला आलो तेव्हा दुपारच्या पूजा आरतीसाठी मंदिर काही  होतं. मग आम्ही जवळ जेवण केलं. मंदिर अजून काही वेळ बंदच राहणार होतं. आम्ही निघायचा निर्णय घेतला. महादेवाला मनोमन नमस्कार केला. त्याच्या अगदी दारात पोहोचून फक्त आत दर्शन न झाल्याने तो आणि आम्ही नाराज व्हायचं काही कारण नव्हतं. आषाढी एकादशीला लाखो लोक पंढरपुरात जसं कळसाचं दर्शन घेतात तसंच आमचं झालं. 



आमच्यातल्या एक दोघांना त्रास व्हायला लागला होता. त्यांना घोडी करून देऊन आम्ही निघालो. उतरताना पुन्हा निवांत रमत गमत खाली आलो. जीपने बनियाकुंडला पोहोचलो आणि आराम केला. 

संध्याकाळी जेवणाआधी आम्हाला "ट्रेक दि हिमालया" कडून हा ट्रेक केल्याबद्दल सर्टिफिकेट देण्यात आलं. आमच्यापैकी काहीजणांचा हा पहिलाच मोठा ट्रेक होता. सगळ्यांना हा ट्रेक पूर्ण केल्याबद्दल अभिमान वाटत होता. 

यानंतर दुसऱ्या दिवशी आम्ही दिवस भर प्रवास करून ऋषिकेशला गेलो. तिथे रिव्हर राफ्टिंग करायचा आमचा बेत होता. त्याबद्दल पुढील वृत्तांतात. 

(क्रमशः)


ह्या दिवशीचा वृत्तांत व्हिडीओद्वारे अनुभवण्यासाठी युट्युबवर जा : 

आणखी व्हिडीओस बघण्यासाठी हे चॅनेल सबस्क्राइब करा. 

Sunday, August 4, 2019

चोपता चंद्रशिला तुंगनाथ ट्रेक : ३ : देओरीया ताल - बनियाकुंड

ह्या दिवशीचा वृत्तांत व्हिडीओद्वारे अनुभवण्यासाठी युट्युबवर जा : 
आणखी व्हिडीओस बघण्यासाठी हे चॅनेल सबस्क्राइब करा. 

या आधील वृत्तांत वाचा या ठिकाणी : 
---

आदल्या दिवशी ३-४ किमीचा पिटुकला ट्रेक करून आमचा दिवस नंतर मजेत गेला. पण आज मात्र आमची परीक्षा होती. ३-४ किमीवरून ट्रेकच्या अंतराने थेट पाचपट उडी मारली होती. आज देओरीया ताल ते बनियाकुंड हे जवळपास २० किमी अंतर आम्हाला पार करायचे होते. 

सकाळी आम्ही लवकर तयार झालो. दुपारच्या जेवणासाठी आम्हाला आमचे डबे घरूनच आणायला सांगण्यात आलं होतं. आज्ञेबरहुकूम सगळ्यांनी छोटे मोठे स्टील किंवा टप्परवेअरचे डबे आणले होते. ते सगळे एकत्र करून त्यात साईझप्रमाणे पोळ्या किंवा भाजी असे कॅम्पवरच्या लोकांनी भरून आम्हाला दिले. ते घेऊन आमचा ट्रेक सुरु झाला. 



हा पूर्ण ट्रेक घनदाट जंगल, हिरवळ, उंच झाडे यांनी आच्छादलेल्या डोंगरांवरून आहे. आणि अंतर खूप असलं तरी दिलाशाची गोष्ट म्हणजे सलग चढ नाही. एखादा डोंगर चढून मग काही वेळ पठार, किंवा काही वेळ उतार असं असल्यामुळे अगदी असह्य होत नाही. 

त्यातही आम्ही मध्येमध्ये पाणी, चॉकलेट्स, बिस्कीट, फोटो अशा अनेक निमित्ताने थांबत थांबत ब्रेक्स घेत होतोच. 



आदल्या दिवशी भरपूर पाऊस झाल्यामुळे ती एक धास्ती मात्र आम्हाला होती. आज खूप मोठा ट्रेक होता आणि त्यात भिजून चालणं नकोसं वाटत होतं. 

पुण्याजवळ पावसाळ्यात खास भिजण्यासाठी आपण ट्रेकला जातो, तिथे भिजण्याची मजा असते. कारण तो ट्रेक करून एका दिवसात आपण घरी येतो, आराम करून पुन्हा रुटीन चालु. 

पण इथे आमच्या ट्रेकचा दुसराच दिवस होता. पुढच्या दिवशीसुद्धा ट्रेक करायचा होता. आणि इथल्या थंड वातावरणात आपल्याला सवय नसल्यामुळे पावसाचा काय परिणाम होईल सांगता येत नाही. ग्रुपमधल्या एक दोघांना हलका तापही येऊन गेलेला होता. 

सकाळी चांगलं ऊन असलं तरी ढगांचा ऊन सावल्यांचा खेळ चालु होता. आणि ट्रेक लीडर आम्हाला पावसाचीच भीती दाखवत पुढे पुढे दामटत होते. 

या रस्त्यात रोहिणी बुग्याल लागतं. बुग्याल म्हणजे मेडोज किंवा कुरण. ह्या भागात असे वेगवेगळे प्रसिद्ध बुग्याल आहेत. त्यांचं संवर्धन करण्यासाठी सरकारने इथे कॅम्पिंग, मुक्काम ह्याला मज्जाव केलेला आहे. 



चोहीकडे पसरलेलं पठार, हिरवं गार मैदान, भरपूर गवत असल्यामुळे इथे आसपासचे पहाडी लोक आपली गुरे चरायला येतात. 

असेच काही गढवाली लोक इथे आम्हाला भेटले. पाण्याच्या एका झऱ्याजवळ आम्ही ब्रेक घेतला आणि पाणी भरायला थांबलो. एकदम थंडगार छान पाणी होतं. तिथेच या लोकांनी चूल मांडून दाल चावलचा बेत केला होता. आम्हाला पाहुन त्यांनी आम्हाला जेवायला बोलावलं, खूप प्रेमाने आग्रह केला. आम्ही सांगितलं कि आमच्याकडे डबे आहेत आणि थोडं पुढे आमचा लंच ब्रेक होणारच आहे. पण ते डब्यातलं थंड जेवण सोडा, आमच्या सोबत गरम खा म्हणून त्यांनी आग्रह केला. 

त्यामुळे आम्ही मान राखण्यासाठी अगदी चवीपुरता वरण भात एका पत्रावळीवर घेतला. आधी २-३ जण होते पण मग बाकी सगळे पण आले आणि सगळ्यांनी त्यात खायला सुरु केलं. तेव्हा त्यांनी अगदी आग्रहाने अजून अजून करत वाढलं. 



मग त्यांना हि मंडळी आपल्या सोबत खात आहेत हे बघुन अजून चांगली व्यवस्था करता आली नाही ह्याची खंत वाटायला लागली. भात कच्चाच राहिला, मीठ कमी पडलं अशा तक्रारी ते स्वतःच करून हळहळ करू लागले. कि आम्ही तर कसंहि बनवुन खातो, तुम्हाला थोडं अजून चांगलं मिळायला पाहिजे होतं. तुम्ही आमच्या घरी आले असते तर काय काय करून खाऊ घातलं असतं. त्यांचं हे प्रेमळ बोलणं बिलकुल तोंडदेखलं वाटत नव्हतं. 

आमचा गाईड स्वतः गढवाली होता. तो आम्हाला अभिमानाने सांगतच असायचा कि तिथली लोकं खूप चांगली असतात, मदत करतात, प्रवाशांची पाहुण्यांची सेवा करतात. त्याच्या भागातल्या अनोळखी लोकांनी आमचा असा पाहुणचार केलेला पाहून त्याचा चेहरा अभिमानाने आनंदाने फुललेला दिसत होता. 

तिथून थोडं पुढे एक डोंगर उतरल्यावर आकाश कामिनी नदीकाठी आमचा लंच ब्रेक झाला. छोटीशी डोंगराळ नदी, तिच्यावर पायी जाण्यापुरता छोटासा पूल, पाण्याचा आवाज, आणि आजूबाजूला डोंगर अशी छान जागा होती. आमचा ट्रेक बराचसा झाला होता. पण तिथे निवांत जेवण झाल्यावर पुढे जाण्याचं जीवावर आलं होतं. 



ट्रेकवर माझा अनुभव असा आहे कि छोटे छोटे ब्रेक्स (तेहि उभ्याउभ्या) घेत गेलो तर अंतर सहज पार होतं. सुका मेवा, चॉकलेट, बिस्किटे असं खात राहिलं तर भूकही लागत नाही. पण विश्रांतीसाठी जास्त वेळ थांबलो, जास्त वेळ बसलो, किंवा पद्धतशीर जेवलो तर त्यानंतर चालायला अवघड होतं. जितक्या वेळा बसू तितकं उठण्या-बसण्यात आपली ऊर्जा जाते, आपली ट्रेकची लय बिघडते. 

मला स्वतःला चढावर दम बराच लागतो आणि उन्हाचाही त्रास होतो. त्यामुळे मी सावकाश एक गती राखत चालत राहतो. दम लागला कि काही सेकंद थांबतो आणि पुन्हा चालायला लागतो. बाकीचे आरामाला थांबले तरी मी शक्यतो टेकण्यासारखं झाड किंवा दगड पाहून उभ्याउभ्याच आराम करायचा प्रयत्न करतो. 

जेवण झाल्यावर सगळ्यांना ट्रेक कधी एकदा संपतो असं झालं होतं. अजून एक दिड तासभर चालल्यावर अचानक एक डांबरी रस्ता लागतो आणि लक्षात येतं कि ट्रेक आता जवळपास संपला. हा रस्ता एका घाटात निघतो. तिथून एका बाजूला चोपता आणि दुसऱ्या बाजूला बनियाकुंड. त्याचा पुढचा ट्रेक चोपतालाच असला तरी आमचा मुक्काम बनियाकुंडला होता. 

तिथून मग उतारावर आरामात रमत गंमत आम्ही आमच्या मुक्कामी पोहोचलो. इथे बऱ्याच कॅम्प साईट्स आहेत. पण पाऊस झाल्यामुळे त्यांनी आमच्यातल्या काही जणांना रूम मध्ये राहण्याची सोय केली होती. 

आज २० किमी चालून जवळपास सर्वच जण थकले होते. १०-१५ मिनीट स्ट्रेचिंग करून फार बरं वाटलं. इथे अंधार खूप लवकर पडतो. आणि थंडी सुद्धा भरपूर आहे. सुदैवाने त्यांनी शेकोटीची व्यवस्था केली होती. जेवणाआधी आणि जेवणानंतर आम्ही बराच वेळ शेकोटी जवळच होतो. 

रात्री गरम कपडे, तिथले अतिशय जाड ब्लॅंकेट ह्यात घुसून आम्ही झोपून गेलो. आराम आवश्यक होता. 

पुढच्या दिवशी चंद्रशिला तुंगनाथ हा मुख्य ट्रेक करायचा होता. त्याबद्दल पुढच्या वृत्तांतात. 

क्रमशः

Sunday, July 7, 2019

Chopta Chandrashila Tunganath : 2 : Haridwar - Sari - Deoria Tal

Previous Post in this series : Chopta Chandrashila Tunganath : 1 : A day in Haridwar
On second day of our trip, we had to go for a long road trip from Haridwar to Sari village.



Even though the distance is merely around 200 km, the road is entirely among the mountains. There is only sigle lane on each side on most of this road. That makes this travel slow.

And to add to that, there was a huge traffic jam around Haridwar and Rishikesh. Because of the peak season tourists and pilgrims have flocked to these cities. There are roadworks going on in many places. We came to know that because of this, the traffic jam is happening there on daily basis.

Our group of 8 people, and 6 other trekkers had arrived in Haridwar. Trek the Himalayas had arranged 3 cars (sumo / bolero) for us. They picked us from Haridwar Station and got stuck in traffic. It took 5-6 hours for just Rishikesh to pass.

Unfortunately, the car I that was travelling in broke down in the middle of traffic. Other two cars moved ahead and we got stuck just outside Haridwar.


It took 2-3 hours to call the mechanic, try to repair the same car, but it did not work. By the time we feasted on delicious breakfast of various Parathas and Lassi. We also played a lot of card games to pass the time. They arranged for another car, but it also was coming from Haridwar and had to come to us through all that traffic. Finally we left from there.

After crossing Rishikesh the road was less crowded and then we could see the driving skills of our driver. All the drivers of this place drive cars in such tough mountainous roads. In cities we get cautious even in small lanes when a car comes from the opposite side and we go slowly. But they do not stop or slow down for anyone. Initially, it may be a bit of a shock, but you get used to it pretty soon.



On the way we came across the confluence of Alaknanda and Bhagirathi i.e. Devprayag. The color of the two rivers is different, the speed of the flow differs, and even after the confluence, the separation seems obvious. There is a beautiful Ghat and a village perfectly at the place of confluence. There is a way to get there. I really wanted to go to that place when I was last here on the way to Valley of Flowers and now as well. But it takes a lot of time, and its not possible when you are in rush. Especially today when we were so late already.

We did not stop anywhere except for the meal. We had to reach Sari at 5 o'clock but at we finally reached around 10. After dinner, we went to bed immediately.

In the morning, our trek leader, Devender, conducted a briefing session. Everyone gave their introduction, talked about prior trekking experience and preparations for this trek so far. The trek from Sari to Deoria Tal is very short and easy. We started the trek after our breakfast.


This trek is 3-4 kilometers long and moderately steep. Even after taking many breaks we reached comfortably before lunch in 3-4 hours.

We were offered welcome drinks made from Rhododendron at camp site. Its a plant that grows around this area. The drink looks and tastes a lot like Rooh Afza and is equally tasty and refreshing.


After reaching there Devender made us do stretching exercises for few minutes. I love this thing very much. The stretching right after the trek eases the body, reduces the usual body pain after trek considerably.

I have done two Himalayan Treks (Valley of Flowers, Everest Base Camp ) prior to this. But we did not do this there and did not know about this. This was the first time I saw the magic of Stretching. So I loved this thing that Trek The Himalayas had thoughtfully put in the plan.



Soon after that it started raining. We waited for some time after lunch for rains to stop. But it continued, so we went to see the lake after which this place is named. Tal in Deoria Tal means lake. 

This is a very beautiful lake, but due to the rain we could not enjoy the beauty there and around fully. We returned quickly.

We played games with everyone for a long time and had fun. In the evening the rain stopped a bit, and we then went on the small hillsides nearby. Clouds were slowly moving away and we were able to see the beautiful views around Deoria Tal. 



And after some time we got to see the snow covered peaks for the first time in the trip. The joy everyone felt at that moment was beyond words. Everyone was just in awe and couldn't stop exclaiming how beautiful the sights were.

It was evening time and clouds were playing with the light, we couldn't capture the beauty in camera as beautifully as we were seeing it first hand. Sometimes God shows man something so magnificent that his art and his devices lack the strength to capture that magnitude of beauty. In such moments you can just enjoy the moment fully and just be thankful for letting us be in it.

With a small trek, games, nature and beauty this day was spent wonderfully. The next day, however, there was a challenge of 20 kilometers of trek to Baniya kund. Keep watching the space for more on it.

(To be continued...)

चोपता चंद्रशिला तुंगनाथ ट्रेक : २ : हरिद्वार - सारी - देओरीया ताल

या मालिकेतील मागील लेख: चोपता चंद्रशिला तुंगनाथ ट्रेक : १ : हरिद्वार

हीच मालिका युट्युबवर दृकश्राव्य माध्यमात :
Chopta Chandrashila Trek | Part 1 | A day in Haridwar
Chopta Chandrashila Trek | Part 2 | Haridwar Sari Deoria Tal

ट्रिपच्या दुसऱ्या दिवशी आम्हाला लांबलचक प्रवास करायचा होता. हरिद्वारहुन ऋषिकेश मार्गे सारी या गावी आम्हाला जायचं होतं.



अंतर म्हणायला सव्वादोनशे किमीच्या आसपास जरी असलं तरी पूर्ण रस्ता घाटातला आहे. उंच डोंगरात दोन्ही बाजूने फक्त एकच लेन आहे. त्यामुळे फार वेगात प्रवास होत नाही.

आणि त्यात भर पडली ती हरिद्वार आणि ऋषिकेश जवळ झालेल्या ट्रॅफिक जॅमची. पर्यटनाचा मोसम असल्यामुळे या ठिकाणी यात्रेकरूची भरपूर गर्दी झालेली आहे. ठिकठिकाणी रस्त्यांची कामेही चालू आहेत. त्यामुळे सध्या रोज ट्रॅफिक होत असल्याचं आम्हाला समजलं.

आमचा ८ जणांचा ग्रुप, आणि अजून ६ ट्रेकर्स हरिद्वार मध्ये आलेले होते. ट्रेक दि हिमालयाजकडून आमच्यासाठी ३ गाड्यांची (सुमो/बोलेरो) व्यवस्था करण्यात आली होती. हरिद्वार स्टेशनहुन आम्हाला घेऊन या गाड्या निघाल्या आणि ट्रॅफिकमध्ये अडकल्या. ऋषिकेश पार करायलाच ५-६ तास लागले.

आणि त्यात दुष्काळात तेरावा महिना म्हणजे मी ज्या गाडीत होतो त्या गाडीचं चाक जॅम झालं. ट्रॅफिक जॅम असल्यामुळे बाकी गाड्या पुढेमागे झाल्या होत्या. आमची गाडी बाजूला घेईपर्यंत बाकी गाड्या पुढे गेल्या आणि आम्ही मागे हरिद्वार शहराच्या थोडंसंच बाहेर अडकलो.

मेकॅनिक बोलावणे, तीच गाडी नीट करायचा प्रयत्न करणे ह्यात २-३ तास गेले. तोपर्यंत आम्ही बाजूला धाब्यावर वेगवेगळे चविष्ट पराठे, लस्सी असा भरपेट नाष्टा केला, पत्ते खेळले. दुसरी गाडी बोलावली पण तीसुद्धा हरिद्वारहुनच याच ट्रॅफिकमधुन येणार असल्यामुळे भरपूर वेळ गेला. शेवटी एकदाचे आम्ही निघालो.

ऋषिकेशच्या पुढेच जरा रस्ता मोकळा झाला आणि ड्रायव्हरचं कौशल्य पाहायला मिळायला लागलं. तिथले सगळेच ड्रायव्हर अशा दुर्गम घाटातसुद्धा इतक्या सफाईनं आणि वेगात गाड्या चालवतात. आपण शहरातसुद्धा बारीक गल्ल्यांमध्ये समोर गाडी आली कि जरा जपून थांबत थांबत चालवतो. पण ते अशा घाटातसुद्धा कोणाच्या बापासाठी थांबत नाहीत. सुरुवातीला जरा धडकी भरू शकते, पण थोड्यावेळाने आपल्यालासुद्धा ह्याची सवय होते.



रस्त्यात अलकनंदा आणि भागीरथीचा संगम म्हणजेच देवप्रयाग लागतं. दोन्ही नद्यांचा रंग वेगळा, प्रवाहाचा वेग वेगळा, आणि संगम झाल्यावरसुद्धा काही अंतरापर्यंत हा वेगळेपणा स्पष्ट दिसत राहतो. बरोब्बर संगमाच्या कोपऱ्यावर एक सुंदर घाट आणि गाव आहे. तिथे जायला रस्ता पण आहे. मागे व्हॅली ऑफ फ्लॉवर्सला जाताना आणि याही वेळेस तिथे थांबण्याची आणि जाण्याची खूप इच्छा होती. पण खूप दूर जायचं असल्यामुळे तेवढा वेळ नसतो. आणि आजतर आम्हाला खूप उशीरही झाला होता.

जेवण सोडता आम्ही कुठेही थांबलो नाही. सारीला आम्हाला पोचायचं होतं ५ वाजता पण वाजले १०. जेवण करून आम्ही लगेच झोपून गेलो.

सकाळी देवेंदर या आमच्या ट्रेक लीडरने ब्रिफींग घेतली. सगळ्यांच्या ओळखी झाल्या, कोणी कोणकोणते ट्रेक केलेत, काय तयारी केली आहे यावर बोलणं झालं. सारी ते देओरीया ताल हा आजचा ट्रेक अगदीच छोटा आणि सोपा असल्यामुळे आम्ही आरामात नाश्ता करून निघालो.


३-४ किलोमीटरचा हा ट्रेक आहे आणि ह्यात मुख्यतः चढच आहे. अगदी रमत गमत जाऊनसुद्धा आम्ही ३-४ तासात लंचच्या आधी आरामात पोचलो.

कॅम्पसाईट वर आमचं वेलकम ड्रिंक देऊन स्वागत करण्यात आलं. तिथे एक बुरांश नावाची त्या भागात उगवणारी वनस्पती आहे. त्याला लालसर रंगाची फुलं येतात. त्याचं इंग्रजीतील नाव Rhododendron आहे. हे म्हणताना सगळ्यांची गम्मत येते. त्याचा अगदी रुह अफझासारखा दिसणारा ज्यूस बनतो. आणि हे वेलकम ड्रिंक सुद्धा रुह अफझासारखंच तजेलदार आहे. तिथे सर्व दुकानात कोकमसारख्या ह्याच्या बाटल्या मिळतात. ट्रिपहुन येताना मी बुरांश आणि बेलफळ अशा स्क्वाशच्या दोन बाटल्या ट्राय करायला घेऊन आलो.


तिथे कॅम्पसाईटवर पोचल्यावर देवेंदरने सगळ्यांकडून ५-१० मिनिटे स्ट्रेचिंग करून घेतलं. हि गोष्ट मला खूप आवडली. ट्रेकनंतर जो शीण येतो किंवा अंग दुखतं ते ट्रेक संपल्या संपल्या अशी स्ट्रेचिंग करण्यामुळे जवळपास नाहीसं होऊन जातं. एकदम ताजंतवानं वाटतं.

मी या आधी व्हॅली ऑफ फ्लॉवर्स, एव्हरेस्ट बेस कॅम्प असे दोन हिमालयातले ट्रेक्स केलेत, पण तिथे आमच्याकडून हे करून घेतलं नव्हतं. स्ट्रेचिंगची हि जादू पहिल्यांदाच पाहिली, त्यामुळे ट्रेक दि हिमालयाजच्या त्यांनी ह्या विचारपूर्वक टाकलेल्या गोष्टीचं कौतुक वाटलं.



थोड्याच वेळात पाऊस सुरु झाला. ताजेतवाने होऊन जेवण वगैरे झाल्यावर आम्ही थोडावेळ पाऊस थांबण्याची वाट बघितली. पण कमीअधिक जोराने पाऊस चालूच होता. त्यामुळे आम्ही शेवटी पावसातच ताल म्हणजेच तलाव बघायला गेलो. ह्याच्यामुळेच ह्या जागेच नाव देओरीया ताल असं आहे.

अतिशय सुंदर तलाव आहे, पण पावसामुळे आम्हाला तिथली दृश्य मात्र फार काही बघता आली नाही. परत आलो.

मग सगळ्यांमध्ये मिळून बराच वेळ काही गेम्स खेळण्यांमध्ये छान टाईमपास झाला. संध्याकाळी पाऊस जरा थांबला आणि आम्ही मग जवळपासच्या छोट्या मोठ्या टेकड्यांवर जाऊन फेरफटका मारला. हळूहळू ढग बाजूला होत आम्हाला फार सुंदर दृश्य दिसायला लागली.



आणि काहीच वेळाने आम्हाला पहिल्यांदाच हिमाच्छादित शिखरे दिसायला लागली. तेव्हा सर्वांना झालेला आनंद शब्दांच्या पलीकडे होता. वाह, जब्बरदस्त, क्लास, एक नंबर असे सतत एका मागून एक उद्गार आमच्या सर्वांच्या तोंडून निघत होते.

संध्याकाळची कातरवेळ आणि ढगांचा प्रकाशसोबत खेळ चालू असल्यामुळे कॅमेऱ्यात मात्र ते आम्हाला तितक्या ताकदीने टिपता आलं नाही.

कधी कधी देव माणसाला असं काही दाखवतो कि ते टिपायला त्याची कला आणि त्याने बनवलेली यंत्रेसुद्धा पुरी पडत नाहीत. अशा वेळेस आपण फक्त तो सुंदर क्षण आपल्या डोळ्यात आणि मनात साठवु शकतो आणि तो अनुभवायला दिल्याबद्दल  देवाचे आभार मानु शकतो. अनंत हस्ते कमला कराने देता किती घेशील दो कराने ह्या ओळी मला पुसटश्या आठवत होत्या पण नेमके शब्द आठवत नव्हते. नंतर गुगल करून शेवटी सापडल्या.

छोटासा ट्रेक, गेम्स, निसर्गसौंदर्य असा हा दिवस छान गेला. पुढच्या दिवशी मात्र तिथून बनियाकुंडपर्यंत २० किलोमीटरच्या ट्रेकचं आव्हान होतं. त्याबद्दल पुढच्या वृत्तांतात.

(क्रमशः) 

Saturday, June 15, 2019

Chopta Chandrashila Tunganath : 1 : A day in Haridwar

You can experience this day in Haridwar in this Youtube video.

Once you experience the Himalaya up and close, it keeps calling you again and again. Words are not enough to describe the magical beauty, serenity and peace you witness there. I first saw it close in our trek to Valley of flowers. (You can read about it here.) In couple of years I also had the opportunity to go for a trek to Everest Base Camp. (But sadly haven't yet managed to write about it)
After that memorable trek, I was just waiting to go in Himalayas again.

I got that chance this year. Just last week, me and my group of 8, did a trek to "Chopta Chandrashila Tunganath" with Trek The Himalayas. Trek the Himalayas is a company which arranges many treks in Himalayas, just like its name suggests. They have a headquarter in Rishikesh.

This trek to Chandrashila was the last one this season by them. They allow upto 24 people in one batch. This time, our group of 8, another 6 trekkers and a trek leader from company, a total of 15 people were there in the trek.



Many Himalayan trek locations in India are in Uttarakhand. Most of the trek packages start in Haridwar, Dehradun or Rishikesh. Our package was Haridwar to Haridwar. They gather everyone in Haridwar, and take them by road to a village Sari. That is the starting point of actual trek.

We traveled from Pune to Mumbai by cab, then direct flight to Dehradun, and then by cab again to Haridwar. Though Jolly Grant airport is known as Dehradun airport, its not in Dehradun city. In fact its between Haridwar Dehradun and Rishikesh. 

Though the expected travel time from airport to haridwar is 1 hour, we were delayed because of traffic. We came to know from our driver, that because of the peak tourism season, this traffic has become the norm these days.

We reached in afternoon, and everyone was hungry by then. We checked into the hotel rooms and immediately inquired about good options for lunch. The hotel manager suggested a restaurant called Hoshiyarpuri. We decided to go there.

Our hotel was in a very small lane, and at that time there were no rickshaws passing by. There were few cycle rickshaws but we were hesitating to hire them. The thought of a man pulling 4 other individuals in good health in a cycle rickshaw was a bit awkward. 

But the other thought was if everyone hesitates to hire them, what will they do? As we didn't have much options in the scorching heat, we finally hired them. 

We reached Hoshiyarpuri restaurant in about 10-15 minutes. "Since 1937" was written on the board there which was indicating how old the hotel is. Though not a grand one, there was enough crowd to suggest it's popularity. 

We got the table for 8 in 4-5 minutes. By then the waiter had offered us temporary seats, served us water, helped settle inside as it was too hot outside. He also had provided menu card to decide the order even before we got the table.

Every dish that we ordered was yummy. But we specially liked the Kathal ki sabzi (Jackfruit), and lassi. In Pune, the lassi served in shops is generally usually thick and sweet. But the north indian style of making it fresh and thin, with less sugar is nice.

After having food we again looked for alternatives to cycle rickshaw for few minutes. But didn't get any. So again we hired cycle rickshaws back to our hotel.

We rested for just about an hour and it was time to go out again. We had to go to Har ki Paudi to experience the Ganga Aarti (worshipping the holy river of Ganga/Ganges). We had also heard a lot about the tasty street food around Har Ki Paudi. None of us were interested in visiting temples in so much crowd. When you get group of like minded people on trip, its more fun.

Luckily this time we got a e-rickshaw (that runs on battery). I got a chance to drive that for few seconds as none of us including the driver were in any rush.

In this visit of mine to Haridwar, the river water seemed pretty clean to me. When I was here the last time, it was too dirty and polluted. I wasn't feeling like even touching it that day. But this time we entered the river, clicked some photos, had fun. Not sure if this happened automatically or due to the initiatives like Swachh Bharat (Clean India) and Namami Gange. 

Har Ki Paudi is always crowded. And crowd keeps increasing as we get close to the time of Aarti. People occupy suitable spots from where its visible and stay there for hours. We didn't get a place in front. People in front were standing and the security guard was requesting repeatedly to sit down, but they were ignoring him. Obviously we had no choice but to stand and watch.

The Puja, Aarti and other ceremonies keep going for long time. Several agents roam around and try persuading people to do the Puja. People believe that bathing in Ganga can absolve them of their sins, if someone's ashes are immersed in Ganga, he gets Moksha. So at the same moment there, many are bathing, many are immersing ashes or the Nirmalya (remnants from an offering to deity). 

After the Puja by several Pundits, the recorded Aarti of Ma Ganga begins. It is beautiful ceremony to both watch and listen. After the main aarti several people go amongst people with a puja thali in their hand hoping for offerings from people. Several people offer money to them. 

Once it was over, we started our food journey in Haridwar. Sameer from our group had gathered some info from net. 

The first eatery we went to was just around the corner. We ahd Samosa, Khasta Kachauri, Puri Sabzi, and a sweet dish called Chandrakala. The taste was okayish but everything was full of oil and ghee. We were fortunate to have a group of 8, so we could try many dishes. Its not possible with a small group.

We roamed around in the market with very small lanes, several shops and too many people. Sameer was navigating us using google maps towards Jain chaat bhandaar. Without google it will be difficult for outsiders. We tried few things on the way like Paan Di Gilauri (sweet dish), Juice of Bael fruit (it was refreshing). 

Jain chaat bhandaar was the best part of the evening. The shopkeeper was a soft speaking and loving person. He chatted with us, told us about his cuisines, his speciality (Kaanjiwada). His food was as awesome as his sweet manner of speaking.

We tried Kanji wada, Gol gappe, Aaaloo chaat. Everything was just awesome. I regretted not coming here before eating other stuff. I would have more space for the chaat dishes there. But anyway whatever we had was great. Thanks to Sameer and internet for this discovery.

After that we had Kulfi and Badam (almond) milk for desserts and finally put a stop to eating.

With heavy bellies we managed to sleep somehow, as we had to get up early next morning. Next day we had to travel to Sari, the actual starting point of our trek.

To be continued...

P.S. You can experience this day in Haridwar in this Youtube video.

Wednesday, June 12, 2019

चोपता चंद्रशिला तुंगनाथ ट्रेक : १ : हरिद्वार

हिमालयात एकदा जाऊन आलं कि पुनःपुन्हा जाण्याची ओढ लागते. ते पर्वत आपल्याला साद घालत राहतात. हिमालय मी पहिल्यांदा अगदी जवळून पाहिला तो "व्हॅली ऑफ फ्लॉवर्सच्या" ट्रेकमध्ये. (त्याबद्दल वाचा या लेखमालिकेत) त्यानंतर एक दोन वर्षात "एव्हरेस्ट बेस कॅम्प" ट्रेक करण्याचा योग्य जुळुन आला. (त्याबद्दल लिहिण्याचा योग अजून जुळून यायचा आहे.) त्या अविस्मरणीय ट्रेकनंतर मी पुन्हा हिमालयात जाण्याची वाटच बघत होत

ती संधी पुन्हा या वर्षी मिळाली. आत्ता गेल्या आठवड्यात मी आणि आमचा ८ जणांचा ग्रुप, आम्ही ट्रेक दि हिमालयाज सोबत "चोपता चंद्रशिला तुंगनाथ" हा ट्रेक पूर्ण केला. ट्रेक दि हिमालयाज हि नावाप्रमाणेच हिमालयात ट्रेक आयोजित करणारी कंपनी आहे. ऋषिकेशला त्यांचं मुख्यालय आहे. 

यावर्षीचा चंद्रशिला साथीचा हा त्यांचा अखेरचा ट्रेक होता. एका ट्रेकमध्ये ते २४ पर्यंत बुकिंग घेतात. आणखी ६ जण आणि ट्रेक लीडर असे एकूण १५ जण या ट्रेकमध्ये होते. 



भारतातले बरेच हिमालयातले ट्रेक हे उत्तराखंडमध्ये आहेत, आणि त्यांची सुरुवात होते हरिद्वार/देहरादून किंवा ऋषिकेशमधुन. आमच्या ट्रेकची सुरुवात होती हरिद्वारमधून. हरिद्वारमध्ये सगळ्यांना एकत्र करून गाडीने सारी या गावाला नेऊन तिथून खरा ट्रेक सुरु होतो. 

त्यामुळे आम्ही पुणे-मुंबई कॅबने, मुंबई-देहरादून थेट विमान आणि मग देहरादून-हरिद्वार पुन्हा कॅब असे टप्पे खात हरिद्वारला दुपारी येऊन पोचलो. जॉली ग्रॅण्ट विमानतळ हे देहरादूनचं विमानतळ म्हणून ओळखलं जात असलं तरी ते देहरादूनमध्ये नाही. तेथून बऱ्याच अंतरावर आहे. देहरादून, ऋषिकेश आणि हरिद्वार अशा ३ मुख्य शहरांमध्ये आहे.

तेथून हरिद्वारचा रस्ता तासाभराचाच असला तरी आम्हाला ट्राफिक खूप लागली. त्यामुळे थोडा जास्त वेळ लागला. हा पर्यटनाचा मोसम असल्यामुळे सध्या रोज खूपच ट्राफिक आहे असं ड्रायव्हरकडून समजलं. 

हरिद्वारला हॉटेलवर पोचलो तेव्हा सगळ्यांना भूक लागली होती. सामान रूममध्ये काढून ठेवलं आणि लगेच खाली येऊन खाण्यापिण्याची चौकशी केली. मॅनेजरने होशियारपूरी नावाचं एक हॉटेल चांगलं आहे असं सुचवलं. त्यावेळी त्या छोट्याशा गल्लीत जास्त रहदारी नव्हती.

सायकल रिक्षा असल्या तरी आम्ही त्या करायला जरा बिचकत होतो. पण दुसरा पर्याय नसल्यामुळे आम्ही शेवटी दोन रिक्षा ठरवून निघालो. एका माणसाने आपल्यासारख्या ४ धडधाकट व्यक्तींना ओढून न्यावं हा थोडा विचित्र विचार मनात येत होता.

पण त्यांच्याकडे पाहून सगळ्यांनी असा विचार केला तर हा रोजगार म्हणून निवडलेल्या माणसांनी काय करावं हा हि विचार येत होता.

१५ मिनिटात आम्ही होशियारपूरी हॉटेलला पोचलो. १९३७ पासून असा त्याचा फलक ते किती जुनं हॉटेल आहे हे दर्शवत होता. फार मोठं टापटीप हॉटेल नसलं तरी तिथल्या गर्दीवरून ते लोकप्रिय आहे याचा अंदाज येत होता. आम्हाला ४-५ मिनटात ८ जणांना पुरेसं एक टेबल मिळालं.

टेबल मिळण्याआधीच तिथल्या वेटरने अगत्याने दुसरी बसायला जागा दिली होती, पाणी आणून दिलं होतं, आणि ऑर्डर ठरवायला मेन्यूकार्डसुद्धा आणलं होतं. त्यामुळे इतक्या उन्हातून आलो असलो तरी टेबल मिळेपर्यंत आम्ही आत स्थिरावलो होतो, आमची ऑर्डर देऊन झाली होती.

तिथल्या प्रत्येक पदार्थाची चव उत्तम होती. आम्ही मनसोक्त जेवलो. आम्हाला विशेष आवडली ती म्हणजे फणसाची भाजी. हा पदार्थ आपल्याकडे सहजासहजी हॉटेल मध्ये मिळत नाही. आणि लस्सी. आपल्याकडे लस्सी फारच घट्ट आणि अति गोड असते. उत्तरेकडे ताजी, पातळ आणि फेसाळती लस्सी पिण्याची मजा वेगळीच आहे.

जेवुन निघाल्यावर पुन्हा ५-१० मिनिटे आम्ही सायकलरिक्षा ला काही पर्याय मिळतो का बघत होतो. पण तो काही मिळाला नाही. सायकलरिक्षा मधेच पुन्हा आमची स्वारी निघाली रूमकडे.

अगदी तासभर पहुडलो आणि लगेच बाहेर निघण्याची वेळ झाली. तयार होऊन आम्ही हर कि पौडीला जायला निघालो. तिथे आम्हाला संध्याकाळची गंगा आरती बघायची होती आणि मग आजूबाजूच्या भागात खादाडगिरी करायची होती. त्याव्यतिरिक्त गर्दी मध्ये मंदिरांमध्ये फिरण्याची कोणाचीही इच्छा नव्हती. विचार जुळायला लागले कि ट्रिपची मजा जास्त असते.

जाताना मात्र आम्हाला बॅटरीवाली रिक्षा मिळाली. आम्ही पण निवांत होतो, आणि तो रिक्षावाला पोरगा पण, त्यामुळे काही सेकंद ती रिक्षा चालवायची माझी हौस पूर्ण झाली.

या वेळेस गंगेचं पाणी फार स्वच्छ वाटलं. मागच्या वेळेस इतकं काळं गढूळ पाणी होतं कि त्याला हात लावायची पण इच्छा होत नव्हती. पण यावेळी मात्र आम्ही बिनधास्त पाण्यात उतरलो, टाईमपास केला, फोटो काढले. आता हि कमाल आपोआप झाली का नमामि गंगे, स्वच्छ भारत योजनेमुळे ते ती गंगामैय्याच जाणे.

गंगा घाटावर गर्दी सतत असते आणि आरतीची वेळ जवळ येते तशी ती वाढत जाते. लोक एकेक दोन दोन तास जागा पकडून बसून राहतात. त्यामुळे आम्हाला फार चांगली जागा मिळाली नाही. आणि मागे लोक उभेच होते. तिथले चौकीदार बसून घ्या बसून घ्या अशी विनंती करत होते पण आमच्या पुढचे लोक काही जुमानत नव्हते, त्यामुळे आम्हालासुद्धा उभं राहण्यावाचून गत्यंतर नव्हतं.

तिथे बराच वेळ मंत्रघोष आणि आरती चालु असत. लोकांचे पूजापाठ चालु असतात. तुम्ही सुद्धा पूजा करा आरती करा दान करा म्हणत दलाल मागे लागत असतात. गंगेत स्नान केलं कि पाप मिटतात, अस्थी वाहिल्या कि मोक्ष मिळतो असे समज आहेत. त्यामुळे लोकांच्या अंघोळी, अस्थी/निर्माल्य विसर्जन हेही चालु असतं. लोकांची फोटोग्राफी चालु असतं. आणि हे सगळं सोबत चालु असतं.

गुरुजींच्या मंत्रघोषानंतर गंगेची आरती (रेकॉर्डेड) सुरु होते. ती आठ दहा गुरुजी मिळून करतात. छान सोहळा आहे. त्यानंतर बरेच लोक आरतीचं ताट घेऊन फिरतात. कुठली ऑथेंटिक थाळी ते कळत नाही. पण दानाच्या अपेक्षेमुळे बरेच लोक फिरतात. आणि आलेले लोक दान टाकतात सुद्धा.

आरती झाल्यावर आमची खादाड भटकंती सुरु झाली. आमच्यातल्या समीरने इंटरनेट वरून तिथे खायला चांगलं मिळतं अशी माहिती काढली होती.

सर्वात पहिले खाल्लं ते म्हणजे सामोसे, खस्ता कचोरी, पुरी भाजी आणि चंद्रकला मिठाई. सगळ्यात तेल तूप अगदी भरपूर. चव अगदी विशेष नाही. नशीब चांगलं म्हणून आमचा ८ जणांचा ग्रुप होता. नाहीतर अशा भरपूर गोष्टी ट्राय करणे हे काही सोपे काम नाही.

मग तिथल्या चिंचोळ्या गल्ल्यातुन फिरत फिरत, थोडी किरकोळ शॉपिंग करत आम्ही पुढे निघालो. मोठे पान दि गिलोरी, बेलफळाचा ज्यूस असा आस्वाद घेत घेत आम्ही पोचलो जैन चाट भांडारला. हे आपल्याला गुगल मॅप्स शिवाय सापडणे मुश्किल आहे. किंवा पुन्हापुन्हा विचारत जावे लागेल.

जैन चाट भांडार अगदी पैसे वसूल होतं.तिथले काका अगदी गप्पिष्ट होते आणि आमच्या नशिबाने रात्र होत आली असल्यामुळे काहीच गर्दी नव्हती. त्यांनी अगदी निवांत त्यांच्या पदार्थांबद्दल माहिती देत प्रेमाने आम्हाला खाऊ घातलं.

त्यांच्या गोडगोड बोलण्याइतकंच त्यांचे पदार्थ अप्रतिम होते. कांजिवडा (त्यांची खासियत), गोलगप्पे (पाणी पुरी), आलू चाट हे सगळं आम्ही मनापासुन एन्जॉय केलं. मला आधी इथे न आल्याचा आणि बाकी ठीकठाक गोष्टी खाऊन पोट थोडं भरल्याचा पश्चाताप झाला. पण तरी ह्या जागेची माहिती मिळाल्या बद्दल इंटरनेटचे आणि माहिती काढणाऱ्या समीरचे मी मनोमन आभार मानले.

तिथून निघाल्यावर मग एका गाडीवर कुल्फी आणि बदाम मिल्क (दोन्हीही सुरेख) याने आम्ही आमच्या चरण्याची सांगता केली.

रात्री साधी इकडच्या टमटम सारखी रिक्षा मिळाली. तुडुंब पोट घेऊन रात्री कसेबसे झोपलो. सकाळी लवकर उठून निघायचं होतं दिवसभराच्या प्रवासासाठी. सारी या आमच्या ट्रेकच्या आरंभ स्थानासाठी.


क्रमशः

ता. क. हरिद्वारचा हा दिवस दृक्श्राव्य माध्यमातून अनुभवण्यासाठी हा युट्युब व्हिडीओ बघा.