Sunday, January 29, 2012

In the News


Print media faces a lot of competition from the electronic media these days. But a few years ago, newspapers and the evening news were the only source of news for the majority. And that is why, if any one of us gets mentioned in the news, it would be a sensation.

There are few common reasons for you to be mentioned in newspaper
  1. you are a politician / leader / in social life
  2. you are an actor / player / celebrity of any sort
  3. you are an important government official
  4. you inaugurate something / you deliver a speech
  5. you are a criminal
  6. you are a victim
  7. you achieve something
For the common middle class people like us, only the last could be applicable. Obviously, getting published was a very great thing that could happen to us.

The first occasion when I appeared in news, was when I ranked second in a drawing competition in my 3rd standard. Competition was organized by Sakal News Group, so it got published automatically. My teachers informed me about news in school, and congratulated me.

We weren't subscribed to that paper then, so we specially bought it from the stall. We read the news and read it to many others. But my rank was mentioned 3rd instead of 2nd, a little disappointment for me.

One year later, when I ranked first in 4th std., and also won academic scholarship, my school gave a press release regarding that achievement. It was published in all language editions of Lokmat. But a different mistake this time. My full name Akash Pradeep Khot, was printed skipping my first name. So the headline was "Pradeep Khot gets a Scholarship". It created a lot of confusion in friends circle of my father. Some of them actually asked him about it.

It was the last mistake I think, later I was mentioned properly. In years further, I appeared in news many times, for achievements in drawing, competitive exams, school gathering etc. The excitement of getting recognized that way was decreasing with the growing age. But the reactions, congratulatory wishes, from people were same every time.

I have paper cuttings of almost every news that I appeared in. One of my friend keeps the whole news paper if he is mentioned in it.



In 2-3 years after school, I did nothing worth that recognition. In engineering college, when I won prizes in fests, events I was mentioned with everybody else in news, but no excitement this time. Once, I won a title of "Marathwada IT Idol" in a competition held at a very small scale. I was not at all joyous or excited for it because of its scale. But when it got published, and the way it was written, people who knew nothing about it, felt I had something really great. I was flooded with wishes, and appreciation. Even I enjoyed the undeserved hype for one day, thanks to print media. :-D

Now, we have social media. You don't need to wait for the newspapers to get public, one status update is sufficient to reach out to hundreds of people with anything to share. Everybody is a celebrity here with his personal space. So absolutely anything and everything is celebrated. A simple status with no great content can also enjoy many likes.

But in times, when there were limited mediums to get public, I am proud to have done something that was worth a news. :-)

पेपरात नाव

आजकाल प्रिंट मिडीयाला इलेक्ट्रोनिक मीडियाकडून स्पर्धा होत असली, तरी काही वर्षांपूर्वीपर्यंत पेपर आणि संध्याकाळच्या बातम्या हे बातम्यांचे एकमेव स्त्रोत होते. पेपरमध्ये काही छापून येण्याला अनन्यसाधारण महत्व होतं, आणि त्यामुळे आपल्यातल्या कोणाचं कुठल्याही संदर्भात पेपरमध्ये नाव छापून आलं तर ती एक सनसनी असायची.

तुमचं पेपरमध्ये नाव येण्यासाठी काही मोजकी प्रमुख कारणे असू शकतात
  1. तुम्ही राजकारणी/ नेते / कार्यकर्ते / आंदोलनकर्ते असाल तर
  2. तुम्ही अभिनेते / खेळाडू / कसलेही सेलिब्रिटी असाल तर 
  3. महत्वाचे सरकारी अधिकारी असाल तर
  4. तुमच्या हस्ते उद्घाटन झाले तर, एखादे भाषण ठोकले तर
  5. गुन्हेगार असाल तर
  6. पिडीत असाल तर
  7. काही उल्लेखनीय यश मिळवले तर 
आम्ही सामान्य मध्यमवर्गी असल्याने फक्त शेवटचे कारण लागू होते, त्यामुळेच पेपरमध्ये नाव येण्याइतके यश मिळवणे म्हणजे आमच्यासाठी अतिशय मोठी अभिमानास्पद गोष्ट असे.

माझं पहिल्यांदा पेपरमध्ये नाव आलं ते, तिसरीत एका चित्रकलेच्या स्पर्धेत दुसरा नंबर आला म्हणून. सकाळ वृत्तसमुहाकडूनच घेतलेली ती स्पर्धा असल्यामुळे, आपोआप त्याची बातमी आली होती. आणि मला शाळेत शिक्षकांनी बोलवून पेपर मध्ये नाव आल्याचं सांगितलं, आणि अभिनंदनसुद्धा केलं.

तेव्हा आमच्याकडे सकाळ घरी येत नव्हता, त्यामुळे तो खास विकत आणून ती बातमी वाचली, सगळ्यांना वाचून दाखवली. त्यात माझा तिसरा नंबर आल्याचं छापलं गेलं होतं म्हणून मी थोडा हिरमुसलो होतो.

नंतर असा प्रसंग आला तो चौथी मध्ये मी शाळेत पहिला आलो, आणि शिष्यवृत्ती सुद्धा मिळवली तेव्हा. तेव्हा शाळेकडून रीतसर याची बातमी पेपरला दिली गेली. लोकमतच्या मराठी आणि हिंदी दोन्ही आवृत्त्यांमध्ये ती छापली गेली. पण दोन्ही मध्ये एक चूक झाली ती अशी, कि माझं पूर्ण नाव आकाश प्रदीप खोत, यातलं  नेमकं माझं नाव वगळून प्रदीप खोत एवढंच छापलं. त्यामुळे "प्रदीप खोत यास शिष्यवृत्ती" अशी त्याची हेडलाईन होती. :-D बाबांच्या बऱ्याच ओळखीच्या लोकांचा ती हेडलाईन वाचून गोंधळ उडाला आणि त्यातल्या काहीजणांनी बाबांकडे त्याची चौकशी सुद्धा केली.

त्यानंतर पुढे मात्र माझं नाव नीट छापलं गेलं. पुढील वर्षांमध्ये असे प्रसंग अनेकदा आले. कधी चित्रकलेतल्या यशाबद्दल, तर कधी स्पर्धा परीक्षेतल्या बक्षिसाबद्दल, किंवा स्नेहसंमेलनातल्या सहभागाबद्दल. सुरुवातीला प्रत्येक वेळी आनंद व्हायचा. लोकांकडून अशावेळी तर नेहमीच अभिनंदनाचा वर्षाव व्हायचा. पण नंतर यातला आनंद कमी होत गेला.

तरीहि जेव्हा जेव्हा माझं नाव पेपर मध्ये आलं, जवळपास त्या प्रत्येक वेळच्या बातमीची कात्रणे मात्र मी जपून ठेवली आहेत. माझ्या एका मित्राने तर त्याचं नाव आलेले अख्खे पेपर जपले आहेत. हौसेला खरच काही सीमा नसते.

शाळेनंतर दोन-तीन वर्ष तरी मी असं पुन्हा काही उल्लेखनीय केलं नाही. नंतर कॉलेजमध्ये काही स्पर्धांमध्ये बक्षिसे मिळाली तेव्हा सगळ्यांसोबत माझंही नाव आलं, त्याचं मला काही वाटलं नाही.

नंतर मात्र एका स्पर्धेत जिंकल्याबद्दल मला "मराठवाडा आय टी आयडॉल" असं प्रमाणपत्र मिळालं. ती स्पर्धा अत्यंत छोट्या प्रमाणावर झाली असल्यामुळे मला त्यात काहीच विशेष आनंद अथवा कौतुक नव्हतं, पण त्याची बातमी पेपर मध्ये आल्यावर, आणि त्या आकर्षक किताबामुळे सगळ्यांना एकदम काहीतरी मोठं वाटलं आणि मला सगळ्यांनी विश केलं. मीडियामुळे असा एकदा मीही उगाचच मोठा झालो होतो. :-D 

आता सोशल मीडिया असल्यामुळे, लोकांच्या कर्तृत्वाचा गवगवा व्हायला वेळ लागत नाही. तुमच्याबद्दल जे काही सांगण्यासारखे आहे, जी काही बातमी आहे, ती शेकडो लोकांपर्यंत पोचण्यासाठी फक्त एका स्टेटस अपडेटची गरज आहे. इथे सगळेच वैयक्तिक स्पेस असलेले सेलिब्रिटी असतात, आणि सगळ्यांच्या सगळ्या गोष्टी सेलिब्रेट होतात. एखाद्या ट्राफिक जामची, कोणाच्या आजारपणाची, एखाद्या शिंकेची सुद्धा बातमी होऊ शकते.    असल्या छोट्या गोष्टीनादेखील भरपूर लाईक मिळतात.

पण आपलं कर्तृत्व लोकांपर्यंत पोचण्यासाठी मोजकी माध्यमे असतानासुद्धा, त्या माध्यमात उल्लेखला जाण्यासारखे काहीतरी माझ्या हातून घडले याचा मला सार्थ अभिमान आहे. :-)

Tuesday, January 24, 2012

क्रौर्य

लहानपण म्हटलं कि एकदम गोड दिसणारी मुलं नजरेसमोर येतात, निष्पाप, निरागस, भोळी अशी विशेषणं डोक्यात येतात, बालकृष्णासारख्या लीला मनात येतात. हि अगदी सहज प्रतिक्रिया आहे, लहानपणाची अगदी पक्की डोक्यात बसलेली प्रतिमा आहे.

पण या प्रतिमेपलीकडेसुद्धा लहानपणाच्या काही काळ्या बाजू असतात, वाईट कोपरे असतात. लहानपणी केलेले जसे काही अभिमानास्पद, काही गमतीशीर पराक्रम आणि किस्से आठवतात, तसे मला काही लज्जास्पद प्रकारसुद्धा आठवतात. 

मन सर्वार्थाने संवेदनशील होण्याआधी लहानपणी मुक्या प्राण्यांवर केलेले क्रूर अत्याचार माझ्या मनातून जात नाहीत. तेव्हा काही कळत नव्हतं असा बहाणा करता आला तरी त्या बहाण्यावर स्वतःला स्वतःपासून सटकता येत नाही.

मी आणि माझे काही मित्र आम्ही लहानपणी खेळात, मजेत प्राण्यांना, किडामुंग्यांना अत्यंत भयानक छळलं आहे. आम्ही कुत्र्याच्या पिल्लांना त्यांच्या शेपटीला धरून उचलायचो. ती केकाटायला लागली कि हसायचो. त्यांना तसंच गोल गोल फिरवून भिरकावून द्यायचो. पेकाटात लाथा घालायचो. कुत्री, त्यांची आई जवळ नसताना आमची अशी मर्दमुकी चालायची. 

दोरीची गाठ करून बेडकांना त्यात अडकवायचो. त्यांचं अंग फाकताना, फाटताना पाहायचो. कोणी तरी सांगितलं, पैशाला (गांडूळासारखा अनेक प्रयांचा छोटासा प्राणी, त्याला हात लावला तर गोल वेटोळा
 घालून बसतो) पकडून काडीपेटीत बंद करून ठेवलं तर खरंच पैसा बनतो. प्रयोगाच्या हौसेने म्हणा अथवा पैशाच्या आकर्षणापोटी आम्ही काही पैसे पकडून बंद केले, आणि काही दिवसांनी त्यांचे पैसे नाही बनले म्हणून त्यांना मारून टाकलं.

गांडूळ तुकडे पाडलं तरी लगेच मारत नाही. त्याचा जीव, मज्जा रज्जू, बुद्धी सगळा विभागलेला असतं. म्हणून तुकडे पडले तरीहि प्रत्येक तुकड्यात जीव राहतो, आणि वळवळ सुरु राहते. ह्याची मी कित्येक प्रात्याक्षिके केली. 

एकदा आमच्या ओट्याच्या बाजूच्या सिंकमध्ये एक पाल येऊन पडली. पाल संकटात सापडली तर आधी शेपूट सोडून हलकी होते, आणि चपळ होऊन पळायचा प्रयत्न करते, हे पाहायला मी आधी तिच्या शेपटीवर प्रहार केला. नळाने पाण्याचा भडीमार केला, पण ती तगली. मग तिला कडची का आणखी काही घेऊन अक्षरशः ठेचून ठेचून मारलं. पुढे कुठेही पुस्तकात वर्णन वाचलं कि अमक्याला ठेचून मारलं पाहिजे, किंवा मारलं, तर माझ्या डोळ्यासमोर सगळा जिवंत देखावा उभा राहतो.

आपल्याला कुठलाही त्रास नसताना आपण त्यांना उगीचच छळतोय हे उमगलं तेव्हा खूप वाईट वाटलं. दुसऱ्यांची खोडी काढू नये, त्रास होईल असं वागू नये, हे सगळ्यांचे आई बाबा शिकवतात. त्यामध्ये प्राण्यांचाही समावेश करावा हे आधी जाणवलंच नाही. कॉलनीमधल्या मुलांसारखे ते प्राणी काही घरी येऊन नाव सांगू शकत नसत, त्यांच्या वतीने भांडायला त्यांचे पालकसुद्धा असमर्थ. आणि हे कोणाच्याही नजरेआड येत नसल्यामुळे आम्ही मोकाट.

पाल, कुत्रे, बेडूक हे काही चीन्कारासारखे दुर्मिळ जीव नाहीत, आणि आम्हीहि कोणी सेलिब्रिटी नाही, त्यामुळे अशा गुन्ह्यांखाली आमच्यावर पशुहक्क सारखे खटले हि भरले नाहीत कोणी.

त्यामुळेच या गोष्टी बंद व्हायला काही साक्षात्कार वगैरे झाला नाही, समज वाढत गेली तसा यातला आनंद आणि मजा आपोआप कमी होत गेले. स्वतःचे विचार आणि सद्सद्विवेकबुद्धी विकसित होईपर्यंत वेळ लागला.

आम्ही काही अपवाद नव्हे, तेव्हाहि आणि आजही मी अनेक मुलांना, असंच करताना पाहतो. आम्ही तेव्हा करत होतो, तेव्हा मजा येत होती, आज दुसऱ्यांना तशी मजा घेताना पाहतो, तेव्हा आपल्यालाहि कधी असल्या प्रकारांनी आनंद व्हायचा याची शरम वाटते. लहानपणात भूतदयेचं शहाणपण लवकर आलं असतं तर हि टोचणी मनाला लागली नसती.

Sunday, January 15, 2012

चंपक आणि रमेश मुधोळकर

औरंगाबादला जुन्या शहरात गुलमंडी, कुंभारवाडा, टिळकपथ असे भरपूर दुकानांनी गजबजलेले भाग आहेत. तिथे शहरवासीयांची खरेदीसाठी नेहमी झुंबड उडते. मोठ्या ब्रान्डची दुकाने, मॉल्स येईपर्यंत आणि अजूनही काही वेळा आमची कपडाखरेदी तिकडेच ठरलेली असते.

लहानपणी मी आणि बाबा काही कामासाठी तिकडे गेलो होतो. खरेदी उरकून आम्ही पार्किंगजवळ आलो. तिथे समोरच एक पेपर स्टाल आहे. तिथे बाबा मासिके, पुस्तक वगैरे चाळत होते. तिथे चंपक नावाचं मुलांचं मासिक पण होतं. बाबांनी ते माझ्यासाठी विकत घेतलं.

खास माझ्यासाठी असं घेतलेलं (शाळेची सोडून) ते पहिलंच पुस्तक. मासिक म्हणजे काय हे समजेपर्यंत माझ्यालेखी ते एक पुस्तकच होतं. घरी जाताना मी खूप उत्सुक होतो, घरी गेल्यावर ते वाचायला. पुढे ते वाचून संपवायला मला एक आठवडा लागला जवळपास. तेव्हा वाचनाचा वेग खूपच कमी होता.

त्या मासिकात काही गोष्टी, काही कॉमिक्स, हसू नका बरे नावाचं विनोदांच सदर असं बरंच काही होतं. त्यात एक गोष्ट होती, ती (पुढील गोष्ट पान नं अमुक वर) असं बारीक अक्षरात लिहून अर्धवट सोडली होती. मी ती सूचना वाचलीच नाही आणि सलग वाचत गेलो. ती गोष्ट अर्धवट कशी हे मला समजलं नाही, मी पान गहाळ झालाय का हे नंबरवरून तपासायचा प्रयत्न केला, पण ते तर बरोबर होतं. ते तसंच सोडून मी वाचत गेलो. पुढे जेव्हा त्या पानावर पोचलो, तेव्हा मधेच ती गोष्ट सुरु झाली.. आणि मग मला संदर्भ लागला. आणि असंच पेपरमध्येपण करतात हे हि समजलं.


ते पुस्तक संपलं तेव्हा खूप आनंद झाला. आम्ही पुढे बरेच महिने ते आणतच गेलो. कधी कधी त्यातून क्रमशः एखादी मालिका प्रसिद्ध व्हायची, तेव्हा तर पुढचं मासिक येईपर्यंत उत्कंठा लागलेली असायची. कॉमिक्सची आणि माझी ओळख चंपकमुळेच झाली. त्यातला चिकु नावाच्या सशाची कॉमिक्स मला अत्यंत आवडत. नंतर डायमंड कॉमिक्सची चाचा चौधरी, बिल्लू, पिंकी अशी सध्या माणसा-मुलांची कॉमिक्स, आणि राज कॉमिक्सची नागराज, सुपर कमांडो ध्रुव, शक्ती अशी सुपरहिरोजची कॉमिक्ससुद्धा आणून वाचायला लागलो.
कधी कधी 'चांदोबा' नावाची पौराणिक कथा, ग्रीक कथा असलेली मासिके सुद्धा वाचली जायची.

आणि मला त्यातूनच वाचनाची आवड लागली. मला वाचायला आवडतं म्हणून मग आई बाबांनी आणखी मिळतील तशी मुलांसाठीची पुस्तके आणायला सुरु केलं. आणि माझी वाचनाची आवड आणि सवय वाढत गेली.

या पुस्तकांमध्ये सुरुवातीला जास्त करून रमेश मुधोळकर यांनी लिहिलेली मोठ्या माणसांची चरित्रे, अकबर बिरबल यांच्या गोष्टी अशी होती. अकबर आणि बिरबलच्या गोष्टी तर माझ्या काकांना सुद्धा आवडायच्या, ते पुस्तक वाचायला आम्हाला त्यांच्याशीसुद्धा स्पर्धा करावी लागायची. :-D

रमेश मुधोळकरांची अशी बरीच अक्षरशः शेकडो पुस्तके आहेत. मी आत्ता हा लेख लिहितांना त्यांच्याबद्दल माहिती मिळवायला गूगल केलं तेव्हा त्यांची यासाठी लिम्का बुकमध्ये नोंद आहे असं कळलं. ते लेखक अपघातानेच झाले. कुठल्याशा पुस्तकाच्या अनुवादात त्यांनी भाग घेतला, आणि मग लिहित गेले. लहान मुलांसाठी साहित्य निर्मिती करत गेले.

या साहित्याला कोणी फार महान समजत नाही, आणि समजणारही नाही. ते तसं नाहीच. त्या वयात शाळेत कुठल्या तरी प्रश्नावलीत मी आवडते लेखक 'रमेश मुधोळकर' असं लिहिलं तेव्हा बाबा, काका हसले होते. पण लहान मुलांना वाचनाची आवड लागावी हा त्यांचा प्रामाणिक उद्देश असतो, त्यात ती सफल होतात, हे माझ्या उदाहरणावरून मी सांगू शकतो. अगदी लहान वयात कोणी शेक्सपिअर, कालिदास आणून दिला तर तो समजणारही नाही, आणि त्याची किंमतही कळणार नाही. पायाला, पहिल्या पायरीला सुद्धा महत्व आहेच.

आपल्याकडे दुर्दैवाने हा प्रकार फारसा गांभीर्याने घेतला जात नाही. लहान मुलांची पुस्तक काय, कोणीही लिहील असं अविर्भाव असतो. पु लंना देखील याची खंत होती. त्यांच्या एका मुलाखतीत त्यांनी म्हटलंय कि "आयुष्यात काही करायचं राहून गेलं असं विचार केला तर लहान मुलांना आवडेल, रुचेल असं काही माझ्या हातून घडलं नाही, याची मला खंत राहील"

पुढे मी अनेक क्लासिक्स वाचली, चांगल्या कथा, कादंबऱ्या वाचल्या. त्यांनी माझं आयुष्य नक्कीच समृद्ध झालं. पण माझं लहानपण समृद्ध करण्याचं श्रेय जातं ते या मासिकांना, आणि लेखकांना.

मी हा लेख केवळ कृतज्ञता व्यक्त करण्याच्या हेतूने लिहिला. मला वाचनाची आवड आणि सवय लावल्याबद्दल धन्यवाद आई-बाबा, चंपक आणि रमेश मुधोळकर. :-)

Thursday, January 12, 2012

Illegal Cinema

When we were in 12th, me and my friend Chetan used to call our movie going or any such activity illegal, if we did not inform our parents about it. We were involved in many illegal activities in those 2 years. But many years ago, when we were unaware of the English word illegal, we watched a movie illegally. Before that occasion we used to watch movies only with our family, but that start gave us confidence and we started watching movies on our own.

We were in 6th std or so, and our old classmate who had left school after 4th std, had come in the city. He came to meet us in school that day. We spend the entire recess time with him, chatting, but we were not satisfied with that. So we planned to watch a SRK starrer movie  ‘Baadshah’ releasing on same day.


Sumeet was on vacation anyway, and he would go and come back from his home, and inform his parents till the school end time. But asking our parents for permission was the real issue. It was very first time we were thinking about such thing, and we simply did not have any idea how would they react. Keeping that aside, communicating with them was another issue, since they were in office, and there were no cellphones at that time.

It was easier for Amit, who lived nearby. We convinced his mom, she gave us money for our  tickets also, but on a condition that we would also inform our parents. We agreed in front of her,but after some brainstorming session, we decided to go without permission, since we would not  have enough opportunity to convince them over a phone call, and if they denied, our plan would be cancelled.

We went home in a rickshaw, and made our neighbour cum tenant Saraf auntie to pay for it. Borrowed some more money from her and left for the theater in hurry. When we reached theater, tickets were sold out. But some guys were selling them in black.

I had read about such rackets in paper, and was scared of it. I was against buying tickets in black, and was suggesting to return home. But the others were not ready to waste the trip to theater, and so we bought tickets. We bought it from a scary guy, and at double the rate, because we were too scared to bargain. We got third class tickets at double rate. And to our further disappointment, the movie was already started when we entered the hall.

I watched the movie in a mix of scared and excited mood. I feared that somebody may ask us to leave our seats, as we bought tickets in black. The show was house-full, as it was a first day. We enjoyed and liked the movie (unexposed to Bond movies yet :-D). Many days later we came to know that it was a flop movie.

After reaching home, we found our moms waiting for us, aware of the fact that we borrowed money from Saraf auntie, and went somewhere. They scolded on us for every possible reason  that we went for a movie without informing them, we borrowed money without permission, we were irresponsible, etc. and ordered us to go at Grandma’s place. Wondering whats in plate for us now, we went at Grandma’s, and to our surprise, it was only food. She didn’t say much,  just served us food. Delighted with this, we then enjoyed the food, with the Popeye show on TV.

That day was a benchmark in my movie career for it started our traditions of watching movies, illegally, on first day irrespective of quality, etc. which I still cherish. :-)

चोरून पाहिलेला पिक्चर

घरी न सांगता पाहिलेल्या सिनेमाला किंवा केलेल्या कुटाण्यांना 'इल्लिगल' म्हणायची पद्धत मी आणि माझा मित्र चेतनने मिळून १२ वीच्या सुमारास सुरु केली. नुकतंच कॉलेज सुरु झालेलं असल्यामुळे आम्हाला ती हवा लागली होती, आणि ११वि १२ वीच्या दोन वर्षात आम्ही बऱ्याच illegal activities केल्या. पण काही वर्षांपूर्वी या शब्दाचा गंध नसताना आम्ही एक पिक्चर अनधिकृतपणे पाहिला, आणि नंतर घरी कळल्यावर, सरकारदरबारी अनधिकृत बांधकाम नियमित करताना होत असेल तसा त्रास आम्हाला झेलावा लागला.

आम्ही ६वि मध्ये होतो. याआधी आम्ही फक्त घरच्यांसोबतच पिक्चर  पाहायचो. फक्त मुलं जाण्याचा प्रसंग कधी आला नव्हता. आमच्या या पराक्रमानंतरमात्र आम्हाला चांगलाच आत्मविश्वास आला आणि आम्ही दर मोठी परीक्षा झाली कि पिक्चरचा बेत आखायला लागलो.

झालं असं, कि आमचा एक लहानपणीचा वर्गमित्र सुमित पगारिया, जो चौथीनंतर शाळा सोडून गेला होता. तो वर्ष-दीड वर्षाच्या अंतराने औरंगाबादला आला होता, आणि आम्हाला भेटायला शाळेत आला होता. पूर्ण मधली सुटी आम्ही त्याच्यासोबतच घालवली. बाहेर खाल्लं, गप्पा मारत बसलो. वर्गातही उशिरा आलो, पण एवढ्यावर त्याचं आणि आमचं समाधान झालं नाही. कल्पना कोणाची ते आठवत नाही, पण आमचा त्याच दिवशी प्रदर्शित झालेला शाहरुख खानचा 'बादशाह' पहायचं ठरलं. 


सुमित सुटीवरच होता, आणि शाळा संपेपर्यंत तो घरी जाऊन येणार असल्यामुळे घरी सांगूनपण येणार होता. अडचण होती ती आमची, मी, सुशांत (चुलत भाऊ), आणि अमित बरडे यांची. आमच्या घरी सांगायचं कसं हाच मोठा प्रश्न होता. आतापर्यंत आमचं आम्ही असं पिक्चरला गेलेलो नसल्यामुळे ते हो म्हणतील कि नाही याचा आम्हाला अंदाजच नव्हता. आणि ते एकवेळ बाजूला ठेवलं तरी आमचे आई-बाबा ऑफिसला गेलेले असल्यामुळे त्यांना विचारायचीही सोय नव्हती.

मुळात जायचं कि नाही यावर आम्ही खूप वेळ घोटाळत बसलो. मग जायचं ठरल्यावर अमितचं घर अगदी जवळ असल्यामुळे, त्याच्या घरी सांगणं तर भागच होतं, त्याच्या आईला विनंत्या करून आम्ही परवानगी मिळवली. पण मी आणि सुशांत घरी सांगणार कि नाही याची चौकशी करून त्यांनी आम्हीसुद्धा घरी सांगूनच जायला हवं अशी अट घातली. त्यांच्यासमोर हो ला हो लावून आम्ही परवानगी पदरात पाडली. आमच्याकडे तेव्हा पैसे तर नव्हते त्यामुळे, अमितच्या घरी सांगितल्यामुळे आमची तिकीटाची सोय झाली.

मग पुन्हा आमच्या घरी कसं सांगायचं यावर चर्चासत्र. माझी तर चांगलीच फाटली होती. आम्ही ऑफिसमध्ये फोन केला असता तर परवानगी नाकारायची शक्यताच जास्त, आणि ऑफिसमध्ये फोनवर जास्त वेळ विनवण्या करणं वगैरे तर शक्य नव्हतं, आणि ते नाही म्हणाले असते आणि आम्ही तरीही गेलो असतो, मग तर आमची पद्धतशीर खरडपट्टी काढली गेली असती. म्हणून आम्ही त्यांना न विचारताच जायचं पक्कं करून टाकलं.

पण घरी काही तरी निरोप पोचणं गरजेचं असल्यामुळे, आम्ही रिक्षा करून घरी गेलो. रिक्षाच भाडं सराफकाकूंना(आमच्या भाडेकरू) द्यायला लावलं. घरी दप्तर टाकून दिलं आणि सराफ काकूंकडून घाई-घाईमध्ये आणखी पैसे घेऊन, बाहेर जातोय असं सांगून निघालो.

एवढं सगळं करून आम्ही थियेटरला पोचलो, तेव्हा तिकिटे संपली होती, आणि ब्लैकमध्ये विक्री सुरु झाली होती. ब्लैकबद्दल पेपरमध्ये मी बरंच वाचलेलं होतं. त्यांच्या टोळ्या, पोलिसांच्या कारवाया, असं बरंच काही मी ऐकून होतो. त्यामुळे आता काय करायचं यावर पुन्हा आमचा खल सुरु झाला. मी घरी परत जायचं म्हणत होतो, घरी न सांगता, ते पण ब्लैकमध्ये पिक्चर पहायचा मला अतीच वाटत होतं. तर आता आलोच आहोत तर पाहून घेऊ पिक्चर असं बाकीच्यांचं म्हणणं होतं, असंही घरी जाऊन बोलणी खायचीच होती, तर मी नंतर तयार झालो.

ब्लैकवाला एक अगदी टिपिकल गुंड छाप माणूस होता, त्याने सांगितलेल्या दामदुप्पट भावात आम्ही थर्डक्लासची तिकिटे घेतली. भाव करायची तर आमची टाप नव्हतीच. आमचे तिकीट आणि इंटर्वल मध्ये खाण्याचे असे मोजूनमापून आणलेले पैसे त्यातच संपले होते. आत गेलो तेव्हा पिक्चर सुरु होऊन गेलेला होतं. रसभंग म्हणून तरी किती व्हावा.

तो पिक्चर मी अत्यंत उत्तेजित आणि अस्वस्थपणे पाहिला. ब्लैक्मध्ये तिकीट काढली होती तर कोणी उठवत तर नाही ना असं मला वाटत राहिलं. आणि घरी न सांगता परस्पर येण्यामधल रोमांच किंवा भीती काय म्हणता येईल ते तर होतंच. पहिला दिवस असल्यामुळे भरगच्च गर्दी होती. आणि आम्हाला पिक्चरसुद्धा आवडला. (जेम्स बॉन्ड तोपर्यंत पहिला नसावा म्हणून :-D) तो पडलेला फ्लॉप पिक्चर होता हे बरंच नंतर कळलं.

नंतर घरी पोचलो तेव्हा, सराफ काकूंकडून पैसे घेऊन आम्ही कुठेतरी गेलो, हे तर आई आणि काकूला कळलंच होतं. तर त्यामुळे आम्ही न सांगता बाहेर गेलो म्हणून, पिक्चर पाहिला म्हणून, सराफकाकू आणि अमितकडून पैसे घेतले म्हणून, बेजबाबदारपणा दाखवला म्हणून अशा प्रत्येक मुद्द्यावरून आम्हाला झापलं. आणि एवढं पुरेसं नव्हतं म्हणून कि काय, उत्तरपूजा बांधायला आम्हाला आजीकडे जायला सांगितलं.

आता तिकडे काय होणार यावर विचार करत आम्ही दोघं तिच्या घरी गेलो. तेव्हा तिथे अपेक्षेएवढं काही झालं नाही. आजी फार काही बोलली नाही. थोडंसं झापून नंतर आम्हाला शिकरण-पोळी खायला देऊन शांत बसली. आणि आम्ही यावर आश्चर्य व्यक्त करत, पोपोयचं कार्टून बघत निवांत खायला बसलो.

माझ्या चित्रपट कारकीर्दीमध्ये तो दिवस सोन्याच्या अक्षराने लिहिला जाईल. माझ्या आणि मित्रांच्या पिक्चर पाहणे, अनधिकृतपणे पाहणे, पडेल पिक्चरसुद्धा पहिल्या दिवशी पाहणे, अशा प्राणपणे जोपासलेल्या अनेक परंपरांची मुहूर्तमेढ त्यादिवशी रोवली गेली.

Sunday, January 1, 2012

Pocket Money

For many of us pocket money would be a very common thing in childhood, and also for many of us it could be non-existent. The concept is that parents give some specific amount of money to their children for their expenses weekly or monthly. And it is said that children learn the value of money, planning the expenditure, saving etc. when they start utilizing pocket money.

I never got such regular pocket money. To ask and take money from my mom whenever needed was our system. We continued with it throughout my life until I started to earn for myself. Even most of my friends didn’t have that concept, although many parents saved money for children in various ways like RD, policy etc. But very often we had a very little liquid cash to spend, and we didn’t need it that much.

We had hired a rickshaw commuting to school, and we had tiffin to eat in the recess. So, there was nothing spend for actually. I remember, we had to ask for even 2-3 rs. to buy school forms etc once in year, becase otherwise we used to have nothing.
If sometimes, we felt like eating something outside, we would plan it one day before and take money the next day. All the options available to us were simple and cheap. Dabeli, vadapav, masala-pav, etc. at the famous shop Purnanand opposite to my school. It was the one of the first shops to offer dabeli in aurangabad. Babubhai, our favourate chaatwala, chocolates and stuff at Kanta’s cart.

The average cost of these things was 2-3 rs. So even 10 rs. would be sufficient for our self treat. Our budget included two dabeli/vadapav, one for each me and my cousine Sushant. An extra dish which we would share. A jackfruit, my favorite. And ‘Ghataghat’ i.e. home made salty and sweet toffees. Some of us would buy collect WWF, or Cricket cards from Kanta, and collect them. Sushant and Yogesh were the celebrated collectors of those cards in my class.

Once, I read about a survey in paper, about the demographic study of children getting pocket money and their pattern of expenditure, across India. Except for metro cities, the number was negligible. I read that and demanded regular pocket money to my mom. She said she was ready to give it, but then I would not be allowed to ask for more, if I need to. Obviously I chose to keep it as it was. :-)

Only after we started travelling with bus or sharing rickshaws, we got to play with money regularly. And these things which used to happen once in a month before, we did almost daily. Very shortly we became friends with a man from UP named Shailesh, who just had started selling Dabeli near our bus stop. We were his regular customers for 4-5 years since then, upto my 12th std. He is a bigger player in the business now, owns 5-6 Dabeli and Pav Bhaji stalls in Aurangabad. Very rarely he works there himself, now he has all his clan settled in Aurangabad.

It’s difficult to remember names of hundreds of students that come in and go out of campus, but these people Karve Uncle of Purnanand, Kanta, Shailesh still recognize us by face. We can clearly observe the pleasure of meeting some old friend on their faces, when they smile at us. Talking to them is always a nostalgic ride to our golden school memories.

As we grew up, our activities kept widening the range. We start hotelling along with eating on street side stalls. Watching almost every new movie on its first day of release was our addiction. I have watched many movies in 12th, for which I managed money by conning my parents. I used to confess it weeks later after watching a movie.

Although we did what we wanted, and whenever we wanted, we knew our limits, and never crossed them. Whenever our high command indicated slow down in economy, we obeyed religiously.

All such things came to end, when I started to earn. But still I wish it back. I see now, how difficult it is to manage the expenses, and save money. It was really nice when mom n dad were taking care of it. I feel like handing it all over to them and start pocket money again. :-)

पॉकेटमनी

पॉकेटमनी हि गोष्ट आपल्यातल्या बऱ्याचजणांसाठी अगदी सामान्य गोष्ट असेल, तर बर्याचजणांसाठी ती अस्तित्वातही नसेल. आपल्या मुलांना त्यांच्या छोट्या-मोठ्या खर्चांसाठी पालक आठवड्याला किंवा महिन्याला एक ठराविक रक्कम देतात, आणि ती मुलांनी व्यवस्थित खर्च करून वापरायची अशी हि कल्पना. मुलांना आपले खर्च नीट विचार करून करणं, त्यातून बचत करणं अशा गोष्टी शिकायला मिळतात, असं म्हणतात.

मला असा पॉकेटमनी कधीच नव्हता. लागेल तसे पैसे आईकडून मागून घेणे, अशीच अगदी नोकरीला लागेपर्यंत आमची पद्धत होती. मलाच काय माझ्या मित्रांपैकी कोणालाच असं खर्चायला पैसा नियमितपणे मिळत नव्हता. काही जणांच्या नावे बचत खाती, आणखी काही प्रकारे पैसे ठेवत असतील, पण खर्चायला पैसे तसे कमीच मिळायचे. आणि तशी फार गरजही नव्हती.

आम्हाला शाळेत जायला यायला रिक्षा लावलेली होती, आणि शाळेत पण डबा दिलेला असायचा, त्यामुळे पैशांची गरज अशी काहीच नव्हती. लहानपणी तर, शाळेतले फॉर्म वगैरे विकत घ्यायचे असायचे, त्याचे २-३ रुपये सुद्धा आम्ही खास मागून घेऊन जायचो. कारण त्याखेरीज आमच्याकडे काहीच नसायचं.

कधी बाहेर खाण्याची हुक्की आली, तरी एक दिवस आधी ठरवून, दुसऱ्या दिवशी पैसे न्यायचो. खाण्यापिण्याचे आमच्यासमोर जे पर्याय होते ते पण अगदी साधे आणि स्वस्त. पूर्णानंद आमच्या शाळेसमोरचे प्रसिद्ध दुकान, तिथे दाबेली, वडापाव, मसाला पाव वगैरे.. माझ्या आठवणीतली पहिली दाबेली मी तिथेच खाल्ली. अजून बाबुभाई नावाचा आमचा आवडता चाटवाला होता. कांता नावाचा चॉकलेट मुरकुलछाप गोष्टी विकणारा गाडीवाला. बोरकूट, पेरू, लबदु विकणाऱ्या बायका.

या सगळ्यांकडे जे काही मिळायचं त्याची सरासरी किंमत अडीच रुपये. त्यामुळे आम्हाला जेव्हा बाहेर खायचं असायचं तेव्हा १० रुपये मिळायचे. आणि त्यात आम्ही मस्त ऐशपण करायचो. मी आणि सुशांत (माझा चुलत भाऊ) आम्ही दोघं नेहमी सोबत असे पैसे खर्च करायचो. दहा रुपयात त्याला आणि मला एकेक दाबेली/वडापाव, आणखी एखादी डिश, माझा आवडता पेरू, आणि 'घटाघट' नावाच्या खारवलेल्या आंबट-गोड गोळ्या (एका रुपयात चार-सहा :-) ) अशी फुल चंगळ असायची. आता दहा रुपये एकालासुद्धा पुरणार नाहीत.

आठवीनंतर आम्ही बस, सीटर वगैरेनी शाळेत जाणे येणे करायला लागलो, तेव्हा खरे रोजच्या रोज खिशात पैसे खेळायला लागले. मग आधी महिन्यातून एक-दोनदा होणाऱ्या या गोष्टी रोज व्हायला लागल्या, आणि त्यांची अतिपरिचयाद अवज्ञा झाली.

त्याच सुमारास, बस स्टोप जवळ शैलेश नावाच्या युपीच्या भैयाने दाबेलीची गाडी सुरु केली. त्याच्याशी आमची छान गट्टी जमली होती. पुढे माझा बारावीचा क्लाससुद्धा त्याच भागात असल्यामुळे सलग ४-५ वर्ष आम्ही त्याच्याकडे जात होतो. पाहता पाहता तो मोठा माणूस झाला, आज त्याच्या औरंगाबादमध्ये ५-६ दाबेली, पावभाजीच्या गाड्या आहेत. तो स्वतः आता फार कमी वेळा गाडीवर असतो. पूर्णानंदचे कर्वे काका, कांता, शैलेश या सगळ्यांशी कसे बंध जुळले सांगता येत नाही, इतकी मुलं दर वर्षी येतात जातात म्हणून नावाने नाही, पण चेहऱ्याने हि मंडळी आजही ओळख ठेवून आहेत. शैलेश स्वतः गाडीवर असला तर थोडा वेळ गप्पा मारतो, खुशाली विचारतो, आग्रह करतो. त्यांच्याशी बोलताना पुन्हा जुन्या दिवसात गेल्यासारखं वाटत.

जसजसे मोठे होत गेलो तसे उद्योग वाढले, गाडीवर खाण्यासोबत हॉटेलमध्ये जाणेपण व्हायला लागलं, पिक्चर पहायचा, तो पण बहुतकरून पहिल्याच दिवशी, असं व्यसन लागलं. आमच्या गरजा वाढल्या. १२वि मध्ये तर हिशोबात गफले करून मी भरपूर पिक्चर पाहिले, त्याची कबुली मी काही महिन्यांनी द्यायचो. :-D पाहिजे ते करत असलो तरी आमच्या मर्यादा आम्हाला ठाऊक होत्या. एखाद्या महिन्यात जरा कमी खर्च करा असे वरून आदेश आले कि आम्ही निमूट पाळायचो. हौसमौज मनसोक्त केली, पण कधी बेछूट नाही.

आता स्वतः कमावतोय तर ह्या गोष्टी बंद झाल्या. पण अजून तेच हवंसं वाटतं. पैशाला किती फाटे फुटतात, आणि त्यात विचार करून खर्च आणि बचत सांभाळणे किती मुश्कील आहे, हे पाहतोच आहे. हे सगळं आईबाबा करत होते तेच बरं. सगळा पगार आणि हिशोब त्यांच्याकडेच सोपवून परत पॉकेटमनी सुरु करावा वाटतोय. :-)